<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843</id><updated>2012-02-01T10:39:33.650+05:30</updated><category term='सुंदर'/><category term='माणसं'/><category term='स्टेज डेअरींग'/><category term='marathi blogs'/><category term='गझल'/><category term='गण्या'/><category term='प्रोफेसर'/><category term='दादा कोंडके'/><category term='नीतीकथा'/><category term='ओशो'/><category term='चोर'/><category term='क्रिडामहोत्सव'/><category term='कथा'/><category term='नारी'/><category term='जाहीरात'/><category term='अमीर खुसरो'/><category term='बापू भिसूरे'/><category term='समर्पण'/><category term='पती-पत्नी खेळ'/><category term='रबाई'/><category term='अमृतवलय'/><category term='नर'/><category term='छंद'/><category term='nivadung'/><category term='सम्यक जीवन'/><category term='बालकांचे मानसशास्त्र'/><category term='मटकावाला'/><category term='लोभी कुत्रा'/><category term='बबन्या'/><category term='चहा'/><category term='हसीद'/><category term='आमचे गुरुजी'/><category term='चड्डी'/><category term='जिंदगी अभी ऒर यहीं'/><category term='पती-पत्नी विनोद'/><category term='चैतन्य महाप्रभू'/><category term='गुंडबा'/><category term='पैज'/><category term='हास्यप्रवास'/><category term='ससा आणि कासव'/><category term='रामकृष्ण परमहंस'/><category term='गावठी दारुचा कारखाना'/><category term='कथाकथन'/><category term='निरागस'/><category term='दु:खाची परी'/><category term='हेडमास्तर'/><category term='शराब'/><category term='धर्माचे राज्य'/><category term='निवडूंग'/><category term='मन कुंतो मौला'/><category term='क्रिकेट'/><category term='सुफी'/><category term='गरीबी हटावो'/><category term='गोकूळ पंडीत'/><category term='साकी'/><title type='text'>त्याचं काय खरं नाही</title><subtitle type='html'>थोडं इकडचं थोडं तिकडचं...</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>53</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-3778585227625166790</id><published>2012-01-03T15:20:00.000+05:30</published><updated>2012-01-03T15:20:00.660+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मन कुंतो मौला'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अमीर खुसरो'/><title type='text'>५३. मन कुंतो मौला</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;ज्याला सुफी संगीताविषयी माहिती आहे, त्याने अबिदा परवीन हे नाव ऐकले नाही असे होणार नाही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;सुफी संगीताला ज्यांनी आपल्या गायकीने चार चांद लावले अशा अबिदा परवीन यांची मुलाखत टिव्हीवर सुरु होती.&amp;nbsp;मुलाखतीच्या अखेरीस मुलाखतकाराने अबिदा परवीन यांना विचारले की आत्ता या क्षणी तुम्हाला कोणतं गाणे म्हणावेसे किंवा गुणगुणावेसे वाटत आहे? तेव्हा त्यांनी उत्तर दिले - ’मन कुंतो मौला’ .&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मुलाखत संपली, आता मलाही ते गाणं ऐकायचं होते. मला चैन पडेना.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मी इंटरनेटवर सर्च केले तेव्हा मला "मन कुंतो मौला" हे एकच गाणे विविध गायकांनी गायलेले ऐकायला मिळाले. त्यात साब्री बंधू, उस्ताद नुसरत फतेह अली खान, झिला खान, नजर अली खान, आतिफ अस्लम आणि अरिफ लोहार आणि खुद्द अबिदा परवीन या सर्वांना ऐकायला मिळाले. प्रत्तेकाचा आवाज वेगळा, अंदाज वेगळा, &amp;nbsp;नशा वेगळी.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मला अशी गाणी एकवेळ ऐकून समाधान वाटत नाही, पुन:-पुन्हा ऐकल्याशिवाय मजा वाटत नाही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;’मन कुंतो मौला’ पुन:पुन्हा ऐकून ते आपल्या आत कुठेतरी घुमत आहे असे वाटू लागले. सकाळी जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक धुन आत वाजतच होती. सुफी संगीताची हीच तर कमाल आहे. कांही वेळानंतर, हे गाणे बाहेरून आपल्या आत गेले आहे की आतूनच बाहेर आले आहे असा प्रश्न पडतो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;हम तुम ता ना नाना तानानारे,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;यालाली यालाली आला याला अली रे,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ताना नाना ताना नाना ताना नानारे...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;सुफी आलाप मी गुनगुणतच राहीलो. आता याचा अर्थ शोधण्याची जिज्ञासा जागृत झाली.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आणखी शोधाशॊध करताना मला कळले ते असे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;’मन कुंतो मौला’ हे प्रेषीत मुहम्मदांच्या पवित्र मुखातून वदलेल्या " ’मन कुंतो मौला, फा अली-उन मौला" या संदेशावर आधारीत लिहीले गेलेले सुफी गीत आहे आणि ते अमीर खुसरो या प्रख्यात उर्दू-फारशी शायराने लिहीले आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आपले पवित्र शरीर सोडण्यापुर्वी प्रेषीत मुहम्मद आपल्या शेवटच्या धर्मयात्रेच्या एका मुक्कामात प्रवचन देत असताना त्यांनी या वाक्याचा उल्लेख आपल्या संदेशात केला आहे. याचा अर्थ असा होतो की "जो कोणी मला गुरु मानेल, त्याचा अली हा सुध्दा गुरु असेल".&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मेरी मॅग्दालीन आणि थॉमस यांना ख्रिस्त धर्मात जे स्थान आहे त्याइतकेच किंवा त्यांपेक्षा वरचे स्थान इमाम अली यांना आहे असे सुफी संत मानतात. कांही ठिकाणी स्वत: प्रेषीत मुहम्मद असे म्हणतात की ’मी ज्ञानाचा (परमसत्याचा) गाव आहे आणि अली हा त्यामधे प्रवेश करण्याचा दरवाजा आहे’.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;अशाप्रकारे इमाम अलीचे स्थान अनेक ठिकाणी उच्च असल्याचे वर्णीले आहे. अलीनेसुध्दा आपल्या ’झुल्फीकार’ नावाच्य़ा तलवारीने अन्याय आणि अनाचाराविरुध्द सत्याची बाजू बळकट केली. प्रेषीत मुहम्मदाने दिलेले प्रेम आणि परमसत्याचे ज्ञान सर्वत्र पोहचीवण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;या सर्व गोष्टींचे वर्णन अमीर खुसरो यांनी या ठिकाणी केले आहे ते कांहीसे असे आहे,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;शाह-ए-मर्दां, शेर-ए-याझदान,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;कूव्वत-ए-परवरदिगार,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ला फता इल्ला अली,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ला सैफ इल्ला झुल्फिकार&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;म्हणजे,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पराक्रमाने सम्राट, देवांचा सिंहासारखा,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;देवाची शक्ती असणा-या,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;अलीसारखा कोणी नाही,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आणि त्याच्या झुल्फिकार नावाच्या तलवारी सारखी तलवारही कोठे नाही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मन कूंतो मौला,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ख्वाजा अली-उन मौला.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;जो कोणी मला गुरु मानेल,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;त्याचा अली हा सुध्दा गुरु असेल.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;याच्या पुढे सुफी अलाप येतो,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;दारा दिल ए दारा दिल-ए दार-ए-दानी&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;हम तुम तानाना नाना, ताना नाना रे,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;हम तुम तानानाना, ताना नाना रे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;यालाली यालाली अला, याला याला रे&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ताना नाना ताना नाना तानानाना तानाना&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तुम तनन नन, ताना नाना रे...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मौला अली मौला&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मौला अली मौला&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;अली हा गुरु आहे,&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;अली हा गुरु आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;.. ... ....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;कुठेही जर कव्वालीची मैफील असेल तर या कव्वालीशिवाय ती पुरी होऊ शकणार नाही असे म्हणतात.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;एकदा जरुर ऐका.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;यू-ट्यूबवरही आपल्याला ऐकायला मिळेल.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=w_HmZF-tK3c"&gt;नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;object class="BLOGGER-youtube-video" classid="clsid:D27CDB6E-AE6D-11cf-96B8-444553540000" codebase="http://download.macromedia.com/pub/shockwave/cabs/flash/swflash.cab#version=6,0,40,0" data-thumbnail-src="http://3.gvt0.com/vi/w_HmZF-tK3c/0.jpg" height="266" width="320"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/w_HmZF-tK3c&amp;fs=1&amp;source=uds" /&gt;&lt;param name="bgcolor" value="#FFFFFF" /&gt;&lt;embed width="320" height="266"  src="http://www.youtube.com/v/w_HmZF-tK3c&amp;fs=1&amp;source=uds" type="application/x-shockwave-flash"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;a href="http://www.youtube.com/watch?v=MR5Unin8Y2o"&gt;अबीदा परवीनच्या आवाजात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;object width="320" height="266" class="BLOGGER-youtube-video" classid="clsid:D27CDB6E-AE6D-11cf-96B8-444553540000" codebase="http://download.macromedia.com/pub/shockwave/cabs/flash/swflash.cab#version=6,0,40,0" data-thumbnail-src="http://2.gvt0.com/vi/MR5Unin8Y2o/0.jpg"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/MR5Unin8Y2o&amp;fs=1&amp;source=uds" /&gt;&lt;param name="bgcolor" value="#FFFFFF" /&gt;&lt;embed width="320" height="266"  src="http://www.youtube.com/v/MR5Unin8Y2o&amp;fs=1&amp;source=uds" type="application/x-shockwave-flash"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-3778585227625166790?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/3778585227625166790/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2012/01/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3778585227625166790'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3778585227625166790'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2012/01/blog-post.html' title='५३. मन कुंतो मौला'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-4546571050973446158</id><published>2011-11-21T15:20:00.000+05:30</published><updated>2012-01-03T11:49:58.088+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='माणसं'/><title type='text'>५२. मला भेटलेली माणसं - भाग ७ -आयब्या</title><content type='html'>आयब्या जर शाळेत गेला असता तर त्याचे हजेरीतले नाव किंवा कागदोपत्री नाव आयुब बाबालाल मनेर असे असते.पण आयब्या शाळेत गेला नाही आणि शाळाही त्याच्याकडे आली नाही.&lt;br /&gt;पाणा-याच्या थडग्यातला पानारी जिवंत होता तेव्हा कधीतरी आयब्या आपल्या बापू बरोबर आमच्या गावात आला असावा. कारण आमच्या गावात मुसलमान असे नावालाच राहतात. चार पाच कुळं असतील त्यांची. ते सगळे एकदमच गावात उतरले असावेत. ठरवून केल्याप्रमाणे असे चारपाच मुसलमान कुळे आपल्याकडच्या गावात आढळतात. कोण बायकांच्या हातात काकणं भरायचं कासारकाम करतो तर कोण डोरली गाठवायचं अत्तारकाम करतो. अशाप्रकारचे किरकोळ वाटणा-या धंद्यामध्ये आपआपले कसब वापरुन मोठ-मोठे बंगले बांधले आहेत या लोकांनी.&lt;br /&gt;पांढ-या कापडाच्या विजारी आणि त्यावर घालायचे तीन बट्नांचे शर्ट शिवणे हि आयब्याची स्पेशालीटी आहे. हिरवे, निळे, पिवळे धनगरी शर्ट, पांढरी पट्टी असणा-या, नाडीच्या, निळ्या, लाल रंगाच्या जाड कापडाच्या चडडया शिवणे हा त्याचा हातखंडा. लुगडेवाल्या बायकांच्या चोळ्य़ासुध्दा तो शिवून देत असे. आम्ही लहान असताना तो आमच्या शाळेच्या युनिफॉर्माचा शर्ट आणि खाकी चड्डीही शिवून द्यायचा. त्यासाठी लागणारे कापडही त्याच्याकडे मिळायचे.&lt;br /&gt;हा झाला त्याचा एक व्यवसाय आणि त्याचा दुसरा व्यवसाय म्हणजे आपल्याकडे आलेल्या माणसांबरोबर गप्पा मारणे. त्याच्याकडे निरनिराळ्या कारणाने बाया-बापड्या किंवा बापए-लोक जमायचे. त्यांना तासनतास बसवून गोड गोड गप्पा मारण्याची कला त्याच्याकडे होती. या गप्पा ह्या नुसत्या गप्पा नसतात तर त्यातून कमाई कशी करायची हे त्याला चांगले माहीत होते. त्यामुळे त्याचा मुख्य व्यवसाय ह्या कमाईगप्पा मारणे हा आहे की कपडे शिवण्याचा हा प्रश्न पडतो. एखादा शेतीवाला आला आणि समजा त्याची शेती खडीच्या साईडला आहे. खडी म्हणजे नदीपासून थोडे लांब अंतरावरची शेते जिकडे अगोदर पाणी पोहोचले नव्हते. तर आयब्या म्हणणार, "काय बापूदा, तुझ्या खडीकडच्या शेतातल्या शेंगा. काय तेची चवच अलग हाय. गयेसाली तू दिलेल्या शेंगा खाऊन आमची अम्मी नुसती तेचीच याद करते बघ. इस साल शेंगा केल्या नाहीस काय तू?" मग काय समोरच्यानं वळखायचं आपला शर्ट पोरग्याच्या लग्नाच्या मुहुर्ताला पाहीजे असला तर घम्यालेभरून शेंगा त्या अम्मीच्या वट्यात आणुन टाकायला पाहीजेत.&lt;br /&gt;&amp;nbsp;जर कुणाचे शेत नदीजवळ असले तर आयब्या म्हणणार " इससाल भाताचं पिक जोरात आलं. पावसानं लई झ्याक काम केल्यानं भातपिकाची बरकत झाली. मागच्यापेक्षा जास्तच पोती झाली असतील नाही? किती पोती झाली यावर्षी? ." अशी येणकेण प्रकारे आयब्याची वसूली सुरु असते. त्यामूळे शिवणावळीच्या रोकडीपेक्षा हेच उत्पन्न अधिक होत असे.&lt;br /&gt;&amp;nbsp;बाहेरच्या माणसांशी अशा शुध्द मराठीत गप्पा मारणारा आयब्या भाभीबरोबर किंवा घरच्यांबरोबर त्याच्या टिपिकल मुसमानी भाषेत बोलायचा. अर्थात थोड्या सरावाने गल्लीतल्या सगळ्या लोकांना ही भाषा यायला लागली आहे. आयब्याची भाषा म्हणजे, "क्योंरे रडणेको क्या हुया? ऑं?" , यावरचे उत्तर- " हमरे परडेमें शेरडी वरड्या मै देखनेको भाग्याभाग्या गया वाटमें पड्या तो गुडघेको खरचट्या, और रोच पड्या." अशा प्रकारची त्याची ही भाषा शिकून गल्लीतले कोणतरी भाभीला विचारतो," क्यों भाभी, जेवीश क्या नई?" म्हणजे जेवलीस का? असं विचारायचे असतं. याचं उत्तर मात्र " आम्ही जेवलो नाही अजून, बापू तूम्ही जेवला का नाही?" असं येतं.&lt;br /&gt;&amp;nbsp;कापडं शिवतानं गप्पा मारत बसल्यामुळं कधी कधी त्याचं काम आवरायचं नाही. मग रात्री जागून तो आपल्या मशीनला पळवत बसे. त्यात तो इतका तल्लीन व्हायचा की सकाळ झालेली पण त्याला कळायचे नाही. एखाद्याच्या गुळ, शेंगा पोहोचत्या झाल्या असतील तर त्याची शर्ट-विजार वेळेवर द्यायला तो रात्रभर काम करत असे.एकदा म्हणे एक चोर त्याच्य़ा खोलीत आला. चोराला खरंतर त्याच्या शेजा-याच्या घरात उतरायचे असावे पण खाप-यांचा अंदाज चूकून तो आयब्याच्या घरात उतरला. आयब्या आपल्या मशिनवर, आजूबाजूला कापडाचे तुकडे पडलेले आणि चोर त्याच्या मागे कोप-यात बसलेला. आता चोराची पंचाईत झाली, बाहेर जायचे कसे? चोराने ठरविले असावे की हा जेव्हा काम संपवून झोपेल त्यावेळी निघून जावे. मग चोर कोप-यातच बसून वाट पाहू लागला. पण आयब्याला आत्ताच जोर चढला होता त्यामुळं तो मशीनला सुट्टी देत नव्हता. असं एकाच जागी गप्प बसून चोराला झोप आवरेना. चोरानं तिथच ताणून दिली. पहाट झाली तशी डेअरीचा भोगा वाजला. आयब्याची बायको गाईंला वैरण टाकायला उठली. कोप-यात बांधलेल्या शेळ्यांनी कालवा केला. तशी चोराला जाग आली. आजून आयब्या मशीनला भिडलेलाच होता, चोरानं डोक्यावर हात मारला आणि डोळे चोळीत आधीच उघडलेल्या मागच्या दाराने बाहेर पडला. चोराला हात हालवत घरला जायची पाळी आली. चोर ज्या कोप-यात लपून बसला होता तिथच दहापंधरा किल्ल्यांचा जूडगा पडलेला सापडला. पुढे गावात कुणाची किल्ली हरवली की यातली किल्ली वापरली जाऊ लागली.&lt;br /&gt;&amp;nbsp;मुसलमान असला तरी आयब्याच्या दारात गुढीची काठी उभी असायची आणि सणासुदीच्यावेळी त्याच्या घरातून पोळ्यांचा वासही दरवळत असे. दस-याचे सोने असो वा तिळगूळ त्याला कशाचे वावडे नव्हते. हे सगळे हिंदू सण सोडून ईद सुध्दा त्याच्याकडे जोरात साजरी व्हायची. ईदची खीर "शिरखुर्मा" सगळ्या गल्लीला खायला मिळायची. आयब्या गल्लीचा अविभाज्य भागच झाला होता.&lt;br /&gt;आयब्या, त्याचा कबीला, दोन-तीन गाई, एक-दोन शेळ्या आणि कोंबड्या गल्लीची अमानत होती. त्यातच आणखी एक भर म्हणजे "येशा". आपल्या दुस-या पोरीचे लग्न झाल्यावर त्यानं एक कुत्रे पाळलं होते त्याचं नाव ’येशा’. या येशावर त्याचा जीव होता. तो जाईल तिकडं हा कुत्रा त्याच्या सोबत फिरत असे. तो मशिनवर असला की हा कुत्रा मग दारात बसून येणाजाणा-यांवर नजर ठेऊन असे. मशीनवर पाय मारता मारता आयब्या येशाबरोबर बोलत असे. शहानपणा शिकवत असे. लोकांबरोबर कसे वागावे याचे पाठ येशाला शिकवत बसे. येशाने कोणाला उगाच घुरघुरावे मग आयब्याने त्याला,"येशा, क्योंरे?, कौन आया रे?" असे विचारावे मग आलेल्याने आपणच सांगावे," आयब्या, मी हाय रे."" मग ये कि गा, आत""तुझ्या रखवालदाराला बाजूला कर अगोदर".असा संवाद झाला की आयब्या खुष होऊन आलेल्याला आपल्या कुत्र्याची ओळख करुन देत असे.&lt;br /&gt;&amp;nbsp;किती झाले तरी ते गावठी कुत्रे होते. कुणाला गुरगुरेल तर कुणाबरोबर खेळत बसेल याचा नेम नाही. कोणी बोलावले की शेपूट हालवत जात असे. त्याला बघून भिण्यासारखेपण कांही नव्हते. त्यामुळे येशा सगळ्या गावाच्या ओळखीचा झाला होता.&lt;br /&gt;&amp;nbsp;त्या वर्षी ईदला आयब्या खुप खुषीत होता. गेल्यावर्षीच त्याच्या दुस-या पोरगीचे लग्न झाले होते. दोन्ही पोरी त्यांची पोरं अशी सगळे यावर्षी ईदला त्याच्या घरी जमले होते. आयब्यानं यावर्षी ईदसाठी सगळ्यांना नवी कापडं केली.&lt;br /&gt;&amp;nbsp;आयब्या स्वत:चीच कापडं शिवण्यात मग्न झाला तेव्हा लोक त्याला म्हणू लागले " आयब्या ईदला तू नवी कापडं घालून मिरिवणार आणि येशाचं काय रे? त्याला कापडं केलीस काय नाही?" यावर एक दोघं फिदी फिदी हसून गेली.&lt;br /&gt;&amp;nbsp;बोलणारा बोलून गेला पण आयब्याला गप्प बसवेना. आयब्यानं सगळ्याची कापडं बाजूला ठेवली आणि कुत्र्यासाठी कापडं शिवली. चीटाचीटाचा शर्ट आणि लाल पांढरी पट्यापट्याची विजार. विजारीला नाडी आणि शर्टाला बटणे. अगदी येशाची मापे घेऊन ड्रेस तयार केला तेव्हा त्याला बरे वाटले.&lt;br /&gt;&amp;nbsp;ईदचा दिवस उगवला तसा आयब्याला आनंद झाला.आपल्या घरच्यांबरोबर येशालाही कपडे घालून कधी एकदा गल्लीतल्या लोकांना दाखवितो असे त्याला झाले होते.सगळ्यांनी आपआपली कपडे घातली, मोठ्या लोकांनी चिल्ल्यापिल्ल्यांना कपडे चढविली. चिल्ल्यापिल्ल्यांनी येशाला कपडे चढवीली. सुरवातीला अवघडलेला येशा थोड्यावेळाने त्या कपड्य़ांना सरावला. कपडे पण एकदम मापात जमलेली होती. पुढचे पाय शर्टाच्या हातूप्यातून बाहेर आले होते तर मागचे पाय विजारीतून. शेपटीला बाहेर यायलाही जागा ठेवलेली होती.&lt;br /&gt;एकूण काय येशा एकदम ऐटबाज दिसू लागला होता. चालताना तर काय त्याचा रुबाब, व्वा. येशा जसा बाहेर पडला तसा लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.&lt;br /&gt;एक एक करत सगळ्यांना समजले. कपडे घातलेल्या येशाला बघायला खालच्या वरच्या गल्लीतल्या पोरांनी गर्दी केली. मोठी लोकं आयब्याला शाब्बासकी देत होती. येशातर सर्कशीतल्या प्राण्याप्रमाणे इकडे तिकडे ऐटीत फिरत होता. आयब्या तर त्याची दृष्ट काढावी काय याचा विचार करत होता. कोण म्हणत होतं की येशाचा फोटो काढून पेपरात देऊया. कोण म्हणत होते की नको सर्कसवाले येऊन येशाला घेऊन जाणार. कोणाचे काय तर कोणाचे काय.&lt;br /&gt;&amp;nbsp;ही सर्कस अशीच दिवसभर सुरु राहणार असे वाटत असतानाच येशाचा मूड बदलल्यासारखा वाटला.तो एकदम इकडे तिकडे धावू लागला.येशा पळू लागला की पोरं त्याच्या मागून पळू लागली.गल्लीत एकदम गोंधळ सुरु झाला.त्याला एकदम काय झाले हे कोणालाच कळेना.&lt;br /&gt;आयब्यानं त्याला येशा येशा हाका मारल्या पण येशा ऐकायच्या स्थितीत नव्हता.आयब्याला वाटलं येशाला दॄष्ट लागली. नाहीतर त्याला लागीर झाला असेल. काय गोंडस दिसाय लागलाय तो आज. एकदमच असे काय झाले कळेना. येशानं गल्लीतच तीनचार फे-या मारल्या आणि मग गल्ली सोडून चौकात आला.&lt;br /&gt;पोरं गिल्ला करुन येशाला काय सुचू देत नव्हती.&lt;br /&gt;&amp;nbsp;येशा धावत जाऊन एका झुडपात घुसला पोरं त्याच्या पाठीमागून धाऊ लागली.&lt;br /&gt;येशानं झुडपात घासाघिस करुन सगळी कापडं फाडून टाकली आणि पुन्हा जोरात पळत सुटला गावाच्या बाहेर.&lt;br /&gt;&amp;nbsp;आयब्याला काळजी वाटू लागली तोही धावत सुटला. पण येशा तोवर खुप लांब गेला होता.&lt;br /&gt;पोरं मागे पडली तसा येशा थांबला.&lt;br /&gt;जरा इकडे तिकडे घुटमळला आणि टराटरा हागला.&lt;br /&gt;शांत झाला.&lt;br /&gt;मग कांहीच न झाल्या सारखं परत घराकडे येऊ लागला.&lt;br /&gt;&amp;nbsp;वाटेत आयब्या दिसल्यावर त्याच्या पायाजवळ जाऊन घुटमळू लागला. आयब्या म्हणाला," खुदान खास्ता, आल्लानू वास्ता. मुझे छोडके कहां गया था? फिरसे ऐसे करोगे तो मै तुमसे बात नही करुंगा, ऑं"&lt;br /&gt;&amp;nbsp;इकडे ही बातमी भाभीला समजली तेव्हा तीही काळजीत पडली होती.&lt;br /&gt;आयब्या आणि येशा घराकडं येतानं बघुन तिचा जीव भांड्यात पडला. " या अल्ला" असं म्हणून तिनं दोघांच्यावरून मिठ-मिरच्या ओवाळुन टाकल्या.&lt;br /&gt;&amp;nbsp;पुढे कांही दिवसांनी येशा कुठे गेला ते कोणालाच कळले नाही.&lt;br /&gt;तेव्हापासून मात्र आयब्याने दुसरे कुत्रे पाळले नाही.येशाचा फोटॊ काढायचा राहून गेला याचे त्याला राहून राहून वाईट वाटते.&lt;br /&gt;&amp;nbsp;आता फक्त आयब्या आणि त्याचे मशिन दोघे एक-मेकांशी बोलतात.&lt;br /&gt;&amp;nbsp;बेंदराच्या बैलांना झुली घातलेल्या पाहून आम्हाला एकापेक्षा एक फक्कड झुली शिवणारा आयब्याची आणि आयब्याला येशाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-4546571050973446158?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/4546571050973446158/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/11/blog-post.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/4546571050973446158'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/4546571050973446158'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/11/blog-post.html' title='५२. मला भेटलेली माणसं - भाग ७ -आयब्या'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-1864750413698782111</id><published>2011-07-05T15:33:00.002+05:30</published><updated>2011-09-28T16:53:12.234+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पैज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बापू भिसूरे'/><title type='text'>५१. मला भेटलेली माणसं - भाग -६ -बापू भिसूरे</title><content type='html'>बापू भिसूरे हा एक इरसाल माणुस आमच्या सिध्दनेर्ली गावात होऊन गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शर्ट किंवा नुसतीच बंडी, धोतर किंवा पॅन्ट, डोक्याला पटका नेसलेला नसेल तर मफलर किंवा टॉवेल गुंडाळलेला असा सर्वसाधारन पेहराव. पटका हा लग्न इ. समारंभातच दिसायचा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बापू भिसु-याने सर्वसाधारणपणे पोटापाण्यासाठी दोनचार प्रकारची कामे केली. कोणाच्यातरी शेतात कामे केली, ऊस तोडायला किंवा गु-हाळावर फडकरी म्हणून गेला, स्वत:ची चार-दोन गुंटे जमीन पिकवली आणि खानीत जाऊन दगड फोडले. अठरा-वीस किलो वजणाच्या सुतकीने दगड फोडणारी कांही माणसे मी पाहिलीत त्यातला एक म्हणजे बापूदा. पहारीने दगडात भोक मारुन त्यात सुरुंगाची दारु भरुन त्याचा स्फोट करण्याच्या कामात बापूदाची गरज लागायची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण या उपयोगाच्या गोष्टीसाठी उपयोगाचा बापूदा कोणाच्याही लक्षात राहणार नाही. बापूदाला लोक वर्षानुवर्षे ज्यासाठी लक्षात ठेवणार त्या गोष्टीच अजब आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खेड्यापाड्यात सोंगीभजन हे एक करमणुकीचे साधन होते. त्यात ’वाल्याचा वाल्मिकी झाला’ हे नाटक असावयाचे. त्यात वाल्या कोळ्याचे स्वांग (सोंग) बापूदाकडेच असायचे. " या वडगावच्या दरीत .... " असा त्यानं ठोकलेला डॉयलाग अजून आमच्या लक्षात आहे. "आमच्या पार्टीचे पुढचे स्वांग आहे .. . " अशी एंट्री आजून दुसरीकडे कुठे पहायला मिळाली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मोहर्रमच्यावेळेस रात्री करबल सुरु असताना वेगवेगळी सोंगे आजूनही काढली जातात. त्यात काढण्या घातलेला खुणशी दरेडेखोराचे सोंग बापूदाकडे असायचे. आता यावर्षी ते काम कोण करणार असा प्रश्न आहे. कदाचीत त्यावेळेस बापूदाची सगळ्यांना आठवण येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वेगवेगळ्या विषयावर पैजा लावणे ही बापूदाची खासीयत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा म्हणे पुरणाच्या पोळ्या खाण्याची पैज लागली होती तर या पठ्याने अख्खी बुट्टी म्हणजे साधारण पन्नासभर पोळ्या खाल्या होत्या असे सांगतात. तसेच एकदा बुट्टीभर जिलेब्याही खाल्या होत्या. त्यावेळी बापूदाने कोणतीतरी मुळी आदल्या रात्री खाल्ली होती म्हणे आणि त्यामुळे त्याला हे कर्तब शक्य झाले म्हणतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;घागर भरुन ताडी पिण्याचा पराक्रम या लोकांनी केला होता. ताडीही अस्सल आणि कडक होती. चार दिवस आणि चार रात्री यांना जगाची खबरबात नव्हती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा बोलता बोलता पैज लागली की बापूदाने पादून(अपानवायू विसर्जणाद्वारे) दिवा विझवायचा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;झाले माघार घेईल तो बापुदा कसला. बापुदाने जोरात तयारी केली. (म्हणजे काय केले ते सिक्रेट आहे)&lt;br /&gt;रात्री पैजेच्या ठिकाणी सगळे जमले. (हो दिवसभर कामे करुन रात्रीचे हे उद्योग सुचायचे.)&lt;br /&gt;आमच्या गावात एमएसईबीचा उदय होण्यापुर्वीचे ते दिवस होते त्यामुळे दिवा पेटवलेलाच होता. आता बापूदाने तीन प्रयत्नात तो विझवायचा होता.&lt;br /&gt;पहिला प्रयत्न - बापूदाने पोझ घेतली आणि ताकदीने दणका दिला जोराचा आवाज बाहेर पडला, दिवा थरथरला - पण दिवा विझला नाही. दुसरा प्रयत्नातही बापूदाला यश आले नाही. मात्र खोलीत घुसमटल्यामुळे बरीच मंडळी मात्र कमी झालेली होती.&lt;br /&gt;तिसरा आणि शेवटचा प्रयत्न मात्र बापूदाने निकराचा केला आणि दिवाच मुजला. सर्वत्र अंधार आणि सारी मंडळी गायब .&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर असा हा बापूदा सदासर्वदा आपल्या करामतींनी लक्षात राहील.&lt;br /&gt;ईश्वर त्याच्या मॄतात्म्यास चिरशांती देवो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-1864750413698782111?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/1864750413698782111/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/07/blog-post_05.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1864750413698782111'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1864750413698782111'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/07/blog-post_05.html' title='५१. मला भेटलेली माणसं - भाग -६ -बापू भिसूरे'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-3557301081146168551</id><published>2011-07-02T16:06:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:53:03.716+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चहा'/><title type='text'>५०. एक कप चहा आणि गरिबी</title><content type='html'>अब्द-शब्द या नावाचा एक सुंदर ब्लॉग लिहीणा-या सविता यांनी माझ्या यापुर्वीच्या "ग्लॅमरस गरीबी" या ब्लॉगवर लिहिलेली प्रतिक्रिया अशी होती,’ स्वभावाची गरीबी, पैशाची गरीबी , विचारांची गरीबी .... असे अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत .... त्यातली फक्त पैशाची गरीबी दाखवायला आपल्याला आवडते.’&lt;br /&gt;यापुर्वी त्यांनी एक ब्लॉग लिहीला होता त्याच नाव ,’ ब्लॉग नंबर ५६. पाच रुपयांची भिंत’ दि.२०/१२/२०१०. या ब्लॉगमधला चहाचा उल्लेख आणि वरील त्यांची प्रतिक्रिया यांच्याशी संबंधीत एक घटना घडली होती ती अशी.&lt;br /&gt;खरंतर ही घटना पुर्वीच घडून गेली होती व मला त्यांचा ब्लॉग वाचताना आठवली होती. पण या कथेतील पात्राविषयीच्या माझ्या भावना व्यक्त कराव्यात की नाही किंवा मी एकांगी तर विचार करत नाही ना? अशी शंका येऊन मी लिहिण्याचे टाळले होते. पण असो, आज ती वेळ आलीच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेव्हा गडहिंग्लज येथे आमच्या कंपनीचे काम सुरु होते.&lt;br /&gt;कामावर लागणारे कामगार मुख्यत: कर्नाटकातील कणगल्ला या गावातील असावयाचे.&lt;br /&gt;गेली दोन-तीन वर्षे या गावातील पंधरा ते वीस कामगार आमच्याकडे वेगवेगळ्या साईटवर काम करत होते. नवीन साईट सुरु करताना प्रत्यक्ष त्यांच्या गावी जाऊन त्यांना घेऊन यावे लागे. कारण हे लोक दररोजच्या मोलमजुरीवर राबणारे असल्यामुळे त्यांच्याकडे एसटीसाठी जादा पैसे नसायचे. आणि घरी आठवड्याचे रेशन किराणा सामान भरण्यासाठी पैसेही त्यांना आगावू द्यावे लागत असत. दिलेले पैसे नंतर आम्ही हिशेबातून कापून घेत असतो. पण हे लोक प्रामाणिक व कष्टाळू आहेत. त्यामुळे या येरझारीचे आम्हाला काय वाटायचे नाही.&lt;br /&gt;यापुर्वी याकामासाठी कृष्णात पाटील हे जात होते त्यामूळे मला त्यांची फारशी माहीती नव्हती. यावेळेस त्यांना आणण्यास मलाच जावे लागणार होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;घरी जेवायला परत येतो असे सांगून मी गाडीला किक मारुन थेट कागल, निप्पाणी, हिटणी असे करत कणगला गाठले.&lt;br /&gt;सकाळी दहाची वेळ असेल.&lt;br /&gt;मी रवी नावाच्या कामगाराला शोधत होतो. आज गावातील कोणीच ओळखीचे वाटत नव्हते. रवीच्या घराजवळच एक ओळखीचा चेहरा दिसला. अरे हा तर आमचा गाववाला, आमचा वर्गबंधू ईश्वरच होता. ईश्वर कांबळेला तिथे पाहून मला आश्चर्य वाटले. मी अंदाजे हाक दिली तर त्यानेही मला ओळखले आणि आश्चर्य व्यक्त केले.&lt;br /&gt;मी त्याला तिथे येण्याचे प्रयोजन विचारले. आपल्या डंपरवर कामावर असलेल्या कामगाराला न्यायला आलो आहे असं त्यानं सांगितलं. मीही माझे येण्याचे कारण सांगितले.&lt;br /&gt;मी त्याला विचारले, ’तू तर शिक्षक म्हणून नोकरीवर आहेस ना? मग आज शाळेला दांडी काय ?’&lt;br /&gt;तो म्हणाला,’छे, छे, डांडी मारुन कशी चालेल. मी सकाळी जाऊन मस्टरवर सही मारुन आलोय. तिकडे मीटर सुरु आहे आणि इकडे मीटर पाडायचं आहे.’ असं म्हणून तो हसायला लागला.&lt;br /&gt;’एवढ्या सकाळी तू शाळेत गेलास कधी, आलास कधी?’&lt;br /&gt;’ आज सकाळची शाळा आहे त्यामूळे सकाळी लवकर बाहेर पडलो, गावातून सत्तर किलोमीटरवर गगनबावडा तालूक्यात शाळा आहे. तिथून मागे कागल साठ कीलोमीटर आणि तिथून हे गाव पन्नास किमोमीटर असं १८० किलोमीटर रनिंग झालं आहे आता परत दिडशे किलोमिटर जाऊन तेवढेच अंतर परत यायचं आहे.’&lt;br /&gt;मी डोक्याला हात लावला. मोटरसायकलवरुन एका दिवसात ५०० किलोमीटर? एवढा प्रवास म्हणजे रात्री झेंडू बामशी गाठ.&lt;br /&gt;तो बाहेरच आपल्या बाईकजवळ उभा होता. त्याचा डंपरड्रायव्हर घरातून बाहेर आला आणि त्याने मला पाहताच ओळखले. " परदीपसाहेब " अशी आश्चर्ययुक्त हाक मारून तो धावतच माझ्याजवळ आला.&lt;br /&gt;" तुम्ही आलायसा साहेब आज आमच्या घरचा च्या तुम्ही घेतलाच पाहिजे." त्याचा चहासाठी आग्रह.&lt;br /&gt;मी म्हंटले," चल तर चहा तर चहा आणि त्यात बुडवायलाही आण"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बुडवायलाही आण" असं मी म्हंटल्यावर तो आणि मी खळखळून हसू लागलो. याचं कारण जॅकवेलच्या कामावर असताना वर्क्या (बटर पावाचा मोठा भाऊ) संपल्या म्हणून ह्यानच नदीत सापडलेला ताजा मासा चहात बुडवून खाल्ला होता ते मला कोणीतरी सांगितले होते. ते दोघांनाही आठवले.&lt;br /&gt;"ईश्वर चल चहा घेऊया".&lt;br /&gt;"छे छे मी घरात घेऊन आलोय"&lt;br /&gt;" अरे मीही घेऊन आलो आहे, चल थोडा थोडा घेऊ"&lt;br /&gt;पण तो एकदम बावरल्यासारखा झाला.&lt;br /&gt;"अरे चल, एक कप चहाने काय होतय"&lt;br /&gt;तो जास्तच चूळबूळ करु लागला. त्याला चहा घ्यायचा नव्हता हे मला पहिल्यांदाच लक्षात आले होते पण तो इतका बावरला कशामुळे ते माझ्या लक्षात येत नव्हते.&lt;br /&gt;"अरे मला लेट होतोय साईटवर जायला"&lt;br /&gt;पण त्याचा ड्रायव्हर आल्याशिवाय तो कांही जाऊ शकत नाही हे मला माहीत होते. याला आपण चहा पाजायचाच आणि त्याचं चहा न पिण्याचं कारण शोधून काढायचं असं मी ठरवले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चहा आला आणि सोबत पार्ले बिस्किटे असलेले एक ताटही आले कदाचीत ही बिस्किटे त्याच्या लहानग्याच्या वाट्याची असावीत.&lt;br /&gt;" अरे ही लहान पोरांची बिस्कीटे आहेत, मला नकोत बाबा" असं म्हणून मी कप उचलला.&lt;br /&gt;ईश्वरने नाईलाजाने कप उचलला पण तोंडाकडे जाईना. मी चहा संपवून त्याच्याकडे पाहीले. तो चहा थंड व्हायची वाट पहात होता. चहा थंड होताच त्याने एकाच घोटात पिवून सुटकेचा श्वास सोडला.&lt;br /&gt;त्याचे हे वर्तन सगळ्यांच्याच लक्षात आले आणि खटकले.&lt;br /&gt;त्या ड्रायव्हरचा चेहरा सगळं कांही सांगत होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या कामगारासाठी मी एक मोठा माणूस होतो. एवढा मोठा माणूस आजवर त्यांच्या घरी आलेला नव्हता. त्याला माझ्यासाठी काय करु आणि काय नको असे झाले होते. हा ईश्वरही त्याचा मालकच होता पण त्याच्यासाठी त्या ड्रायव्हरच्या मनात इतका आदर का नसावा?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी मराठा आहे आणि तो ईश्वर महार आहे हेही त्या ड्रायव्हरला ठाऊक नसावे. तरीही त्याच्याकडून हा फरक का होत होता?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला वाटते की तो ड्रायव्हर आमच्या वर्तणुकीवरुनच हा भेदभाव करत असावा.&lt;br /&gt;आम्ही साईटवर गेलो की नेहमी त्यांनी साईटवर शिजवलेलेच जेवत असू. एकाच ताटातली भाकरी वाटून खात असू. भले आम्ही मारुतीगाडीतून फिरू, उंची ड्रेस वापरु पण हा समोरचा इसम कोणत्या जातीचा असेल हा विचार आमच्या मनात येत नाही. ते कामगारही आमचा आदर करत आणि आम्ही त्यांची काळजी घेत असू. कदाचीत या वर्तणूकीने ते आम्हाला उच्चवर्णीय मानत असावेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमचे इतके मित्र आहेत त्यात वेगवेगळे जातीधर्माचे , पंथाचे सगळे आहेत. आम्ही एकमेकांची चेष्टा मस्करी जरुर करु पण असा भेदभाव आम्ही कोणी केल्याचे मला आठवत नाही. जाती धर्माच्या नावाने चालणा-या चेष्टे वरून हेच लक्षात येईल की आम्ही त्याला फारसे महत्व देत नाही. याउलट ईश्वर हा जातीने महार होता(त्याआधारेच नोकरीवर होता), फारतर माझ्यापेक्षा जास्त पैसेवाला होता असं म्हणता येईल. याच्याकडे आलेल्या पैशामुळे तो स्वत:ला कोणीतरी समजायला लागला होता का? कालपर्यंत हा त्यांच्यातलाच एक होता आज काय झाले? आणि एक कप चहाने त्याचे काय बिघडणार होते. गरीब किंवा खालच्या जातीच्या माणसाघरचा चहा इतके वाईट तोंड करुन पिण्याचे कारण काय? हा माणूस एक सरकारी नोकरी असताना मिटर पाडायचे म्हणुन ५०० किमी प्रवासाला तयार होतो पण त्याला आपल्या कामगाराच्या घरचा एक कप चहा जड होतो?&lt;br /&gt;आणि खरं सांगायचं झालं तर तो चहाही उत्तम होता. त्यात साखर, चहा पावडर आणि दुधही होतं. कारण कांही उच्च किंवा श्रीमंता म्हणविनारांच्या चहात सगळं कांही मोजून मापून घातले जाते. असा चहा प्यायल्यानंतर मला बाहेर जाऊन चॉकलेट खायची इच्छा होते.&lt;br /&gt;मला सनक आली होती त्याच्या थोबाडीत मारावी असे वाटत होते पण कारण काय सांगणार? की तू चहा घेत नाहीस म्हणून मारले?&lt;br /&gt;&lt;br /&gt;तो ड्रायव्हर माझ्याकडे अगतिकतेने पहात पहात त्याच्या सोबत निघुन गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिथल्या लोकांनी नंतर मला सांगीतले की मी आलो म्हणून तो घरात आला आणि चहा घेतला नाहीतर तो नेहमी गल्लीच्या टोकावर उभा रहायचा आणि लांबूनच हाका मारायचा. साईटवर पाणी उष्ठे का केले म्हणून त्याच्यात आणि ड्रायव्हरच्यात भांडण झाले होते. आणि त्यानंतर घरी आलेल्या ड्रायव्हरला साईटवर न्यायला ईश्वर आला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;नंतर कांही आठवड्यांनी ईश्वर गावात भेटला. आमच्या घरी चहा घेता घेता ईश्वरला मी त्या दिवसाबद्दल छेडले. तर म्हणाला" नाही रे माझे मनच होत नाही अशा ठिकाणी चहा प्यायला, मला ओकारी येते"&lt;br /&gt;&lt;br /&gt;तो गेला तेव्हा मी बाहेर जाऊन चॉकलेट खरेदी केले.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-3557301081146168551?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/3557301081146168551/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/07/blog-post.html#comment-form' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3557301081146168551'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3557301081146168551'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/07/blog-post.html' title='५०. एक कप चहा आणि गरिबी'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-3628229047938551391</id><published>2011-02-09T14:31:00.000+05:30</published><updated>2011-09-28T16:52:55.071+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गरीबी हटावो'/><title type='text'>४९. ग्लॅमरस गरिबी</title><content type='html'>आपल्या देशात "गरीब" आणि "गरिबी" या दोन शब्दांइतके ग्लॅमर दुस-या कोणत्याही शब्दांना नसेल.&lt;br /&gt;आपल्याकडे सहज जाताजाता तुम्ही कुणाला विचारले," काय हो, कसं काय चाललंय?"&lt;br /&gt;"काय चालायचं, गरिबाचं?" असंच उत्तर आपल्याला मिळेल.&lt;br /&gt;स्वत:च स्वत:ला गरीब म्हणवून घेण्यात काय मजा आहे ठाऊक नाही.&lt;br /&gt;बरं दुस-या कोणी या लोकांना तोंडावर गरीब म्हणू शकेल असंही नाही.&lt;br /&gt;दुकानातला प्रसंग घ्या.&lt;br /&gt;" काय साहेब(किंवा शेठ/मालक/सावकार), बोला काय देऊ आपल्याला?"-दुकानदार आदबीने.&lt;br /&gt;" आम्ही कसले साहेब (किंवा शेठ/मालक/सावकार), आम्हा गरिबाला काय लागतय़ं ? बरं द्या दोन किलो साजूक तूप आणि बदाम एक किलो ...."&lt;br /&gt;त्या दुकानदाराने शेठ किंवा साहेब म्हंटले की यांना आतून बरेच वाटते पण आपल्याला डायरेक्ट शेठ म्हंटलेलं यांना धोक्याचं वाटतं. आपल्या श्रीमंतीचा उल्लेख डायरेक्ट व्हायला हवा की नको याच्या संभ्रमातच हे लोक असावेत. जर तोच दुकानदार यांना जर असे म्हणाला असता की काय हो काय हवे ते लवकर लवकर बोला माझ्याकडे तुम्हासारख्य़ांसाठी वेळ नाही. किंवा काय रे गरीब माणसा तुला काय करायचे आहेत तूप आणि बदाम? तर याच माणसाची अवस्था बघण्य़ासारखी झाली असती.&lt;br /&gt;आपली श्रीमंती आपला पैसा दिसला पाहीजे त्याचा उल्लेख दुस-याने केला पाहीजे पण आपण मात्र आपल्या तोंडाने ’आम्ही काय गरीबच हो’ असा सुर हे लोक पकडून असतात.&lt;br /&gt;कदाचीत स्वत:च स्वत:ला गरीब म्हणवून घेत हे लोक नम्रपणा किंवा विनयशिलता दाखवत असतील. पण यांच्याकडे आलेला पैसा कसा आलेला आहे ते सर्वांना माहीत असतेच ना.&lt;br /&gt; &lt;br /&gt;हा गरीब शब्दच मोठा जादूमय आहे.&lt;br /&gt; &lt;br /&gt;कॉंग्रेसने तर ’गरीबी हटाव’ या ना-यावर कितीतरी निवडणुका जिंकल्या आहेत आणि कितीतरी लोकांची गरीबी हटविलेली आहे जे आज त्यांच्या पक्षात किंवा विरुध्दपक्षात आहेत.&lt;br /&gt; &lt;br /&gt;’गरीबी हटाव, गरीबी हटाव’ म्हणजे काय? यापेक्षा ’श्रीमंती वाढवा’ असे म्हणू शकतो पण त्या ना-यात एवढा दम नाही.&lt;br /&gt; &lt;br /&gt;बरे श्रीमंत व्हायचे कशासाठी? कारण आपल्याकडे श्रीमंताना न्याय कमीच आहे. आपल्या देशातील सिस्टिम, न्याययंत्रणा, सोई-सुवीधा या सर्वांपासून श्रीमंताना वंचीतच ठेवले गेले आहे.&lt;br /&gt;बघा रेशनवरचे धान्य असो वा सरकारी दवाखाने असोत ते सगळे गरीबांसाठी. आणि हे दवाखाने कुणाच्या पैशातून निर्माण झाले तर श्रीमंतांनी भरलेल्या कराच्या उत्पनातून. हे सगळं अन्यायकारक आहे. शिक्षणक्षेत्रातील अनुदाने असोत व्यावसायीक अनुदान असोत की अंध-अपंग असोत त्यामध्ये गरीबांनाच प्रथम हक्क मिळतो प्रत्तेक ठिकाणी श्रीमंताना डावलले गेले आहे. आणि हे आज काल नाही खुप पुर्वी पासून म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरु आहे.&lt;br /&gt;निवडणुका असोत की पोलिस भरती पहिला हक्क गरीबाचा.&lt;br /&gt;प्रत्तेक नेता म्हणतो मी दुस-या नेत्यापेक्षा गरीब आहे मलाच मते द्या. आजपर्यंत आम्ही गरिबालाच मते दिली आहेत तरीही गरीबी हटत नाही म्हणजे काय?&lt;br /&gt; &lt;br /&gt;आपण श्रीमंतीच्या कीती विरोधात आहोत याचे आणखी एक उदाहरण आहे.&lt;br /&gt;रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला की पहा. लोक लगेच तेथे जमतात. कोणत्या वाहनांची धडक आहे हे पाहतात आणि कोणी कोणाला धडक दिली हे न पाहता,&lt;br /&gt;१) जर धडक सायकल आणि मोटरसायकलची असेल तर मोटरसायकलवाल्याला बदडून काढतात.&lt;br /&gt;२) जर धडक मोटरसायकलची आणि कारची असेल तर कारवाल्याला बदडून काढतात.&lt;br /&gt;३) जर धडक लहानकार आणि ट्रकची असेल तर ट्रकवाल्याला बदडून काढतात.&lt;br /&gt;तात्पर्य काय गरिबाला न्याय देण्य़ाचा प्रयत्न सर्व थरावर दिसून येतो.&lt;br /&gt; &lt;br /&gt;एवढे सगळे या गरीबीचे महात्म्य असताना तिकडे ७०,००,००० कोटी की कितीतरी डॉलर पैसे स्वीस बॅंकेत आहेत म्हणे. असतील बुवा कोणातरी गरिबाचे. कारण आम्ही फक्त गरीबांना निवडून देतो. गरीबांना अनुदान देतो. जिथे तिथे गरिबांना संधी देतो. गरीबांना नोकरी देतो. गरीबांना उद्योगधंदे सुरु करुन देतो. साधे दानही गरीबालाच मिळेल असे पाहतो. मग यातल्याच कोणा गरीबाचा पैसा असेल तिकडे स्विसबॅंकेत.&lt;br /&gt; &lt;br /&gt;बाकी सगळे विसरलो तरी महात्मा गांधीनी दिलेला हा गरीबीचा मंत्र आपण विसरलो नाही. त्यामुळेच आज आपल्याला हे सोनियाचे दिवस पाहायला मिळत आहेत.&lt;br /&gt;ज्याप्रकारे मायकल जॅक्सनमुळे डान्सला, सचीनमुळे क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त झाले त्यापेक्षाही कितीतरी अधीक पटीने एकट्या म. गांधींमुळे गरीबीला प्राप्त झाले आहे.&lt;br /&gt;महात्मा गांधींनी देशाच्यागरीबीला आपला आत्मा बनविला आणि त्या गरीबांसाठी आपले प्राण पणाला लावले. पण याउलट येथील त्यांच्या अनुयायांनी आपला आत्माच गरीब बनविला. अनुयायांच्या आत्म्यात देशासाठी जागाच नव्हती. फक्त मी, माझे वंशज, माझी खुर्ची आणि ती टिकवण्यासाठी आवश्यक असलेले उद्योगपती आणि त्यांचा पैसा.&lt;br /&gt; &lt;br /&gt;श्रीमंत असणे हे पाप आहे का? नाही. पण कांही श्रीमंत बनलेल्या लोकांमूळे ते पापच वाटू लागले आहे.&lt;br /&gt;जर आपण श्रीमंताना योग्य न्याय दिला, श्रीमंत नेत्यांना निवडून दिले आणि त्यांच्यासाठी योग्य सुविधा निर्माण केल्या तर हा बाहेर जाणारा पैसा देशातच राहील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जर श्रीमंतीला मान्यता मिळू लागली तर लोक आपला पैसा स्वीसबॅंकेत का लपवून ठेवतील?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-3628229047938551391?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/3628229047938551391/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/02/blog-post_09.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3628229047938551391'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3628229047938551391'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/02/blog-post_09.html' title='४९. ग्लॅमरस गरिबी'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-1061355744813628375</id><published>2011-02-07T14:48:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:52:45.346+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रामकृष्ण परमहंस'/><title type='text'>४८. भक्ताच्या हाकेला देव धावतो</title><content type='html'>एका निवांत क्षणी रामकृष्ण परमहंस आपल्या अनुयायांसह बसलेले होते तेव्हा एका भक्ताने त्यांना विचारले," ठाकूरजी, आम्ही सर्वचजण देवाची भक्ती करतो, नित्यनियमाने पुजाअर्चा करतो, देवाचा धावा करतो, पण अजुनही तो आम्हाला का भेटत नाही?"&lt;br /&gt;रामकृष्णांनी यावर स्मितहास्य केले आणि डोळे मिटले. कांही वेळाने ते बोलू लागले.&lt;br /&gt;ते म्हणाले,&lt;br /&gt;’अरे, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे तो प्रसंग.’&lt;br /&gt;सगळ्यांनी कान टवकारले.&lt;br /&gt;’ लहान मुल खेळत असते आणि आई तिकडे आपले काम करत असते. मुलाला खेळवत खेळवतच तिला आपले कामही करावे लागते. ती चुलीवर भाकरी करत असते, मुलासाठी खाऊ शिजवत असते. पण त्याबरोबरच तिचे लक्ष नेहमी आपल्या बाळाकडे असते.&lt;br /&gt;कांही वेळाने बाळ रडू लागते तेव्हा ती आई त्याला खेळण्यासाठी एखादे खेळणे देते. खेळणे मिळताच बाळ त्या खेळण्य़ाबरोबर गुंगून जाते. आईचे काम सुरुच असते. ती इकडे चुलीत लाकूड टाकते तिकडे बाळाला खेळणे दाखविते. दोन्ही कामे सुरुच असतात.&lt;br /&gt;असाच कांही वेळ गेला की बाळ पुन्हा रडू लागते. आता आई त्याला खायला लाडू देते. बाळ पुन्हा लाडू खाण्यात दंग होऊन जाते. आईचे काम सुरुच राहते. तिचे बाळाकडे पुर्ण लक्ष असते की आपला बाळ खेळतो आहे का? त्याला भुक लागली आहे का? तो कुठे पडणार तर नाही ना? पण तीचे कामही सुरु असते.&lt;br /&gt;लाडू खाऊन झाल्यावर कांही वेळ बाळ खेळते पण नंतर पुन्हा रडू लागते. आई त्याला खेळणे देऊन पाहते, पुन्हा लाडू देऊ पाहते पण बाळ आता रडायचे थांबत नाही. यावेळेस त्याला ना खेळणे हवे ना लाडू त्याला आता आईच हवी असते. बाळाचे रडणे थांबत नाही तेव्हा आईला हातातील काम खाली ठेवावेच लागते. ती काम बंद करते आणि बाळाला उचलून पटापट मुके घेते. आईच्या कुशीत गेल्यावर बाळ लगेच खुदूखुदू हसू लागते. आता त्याला ना खेळणे हवे ना लाडू.&lt;br /&gt;तुम्हा आम्हा भक्तांचे तसेच आहे.&lt;br /&gt;कालीमाता म्हणजे आपली सर्वांची आईच आहे. ती आई आपल्या कामात आहे, तीला खुप काम असते. पण तीचे आपल्यासर्वांकडे खुप लक्ष असते. आपल्याला काय हवे नको ते तीच तर पाहते. ती आपल्याला हा संसाररुपी खेळणे देते आणि आपण त्यातच रमून जातो ह्या संसारातच आपण गुंगून जातो. आपली बायको, मुले, घर, पैसा, जमीन, बंगला हेच सर्वस्व मानतो. त्यातच रमून जातो आणि आपल्या आईला म्हणजे परमेश्वराला विसरून जातो. ती एका पाठोपाठ एक अशी खेळणी आपल्याला देते आणि आपण त्यातच गुंगून जातो. संसाराचा खेळ खेळताना खोटे बोलतो, लांडी लबाडी करतो, हे माझे ते माझे असे करतो त्यातच रमून जातो. कधी कधी आईची आठवण करतो आणि पुन्हा आपल्या खेळण्य़ात रमतो. आपल्याला वाटते की आईचे लक्ष आपल्याकडे नाही. पण तसे कधीही होत नाही तिला आपलीच काळजी लागून राहीलेली असते. फक्त ती दुरुन पाहत असते की आपण कसे खेळतो.&lt;br /&gt;याच्याउपरांत एखादा भक्त हे सगळे सोडून द्यायला तयार झाला आणि आईसाठी रडू लागला तर ती त्याला लगेच दर्शन देईल त्याला जवळ घेईल.&lt;br /&gt;असे म्हणतात की एखादा भक्त निस्सीम भक्तीने आणि दृढ निश्चयाने तीन दिवस आणि तीन रात्री रडला तर देव त्याला दर्शन देतो.&lt;br /&gt;भक्ताच्या हाकेला देवालाही हातचे काम टाकून धावावे लागते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-1061355744813628375?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/1061355744813628375/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/02/blog-post_07.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1061355744813628375'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1061355744813628375'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/02/blog-post_07.html' title='४८. भक्ताच्या हाकेला देव धावतो'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-7448852335947763704</id><published>2011-02-04T15:30:00.002+05:30</published><updated>2011-09-28T16:52:36.873+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ओशो'/><title type='text'>४७. कशासाठी नावासाठी</title><content type='html'>एके काळी एक सम्राट चक्रवर्ती होऊन गेला. चक्रवर्तीचा होण्याचा अर्थ आहे जगज्जेता होणे. असे चक्रवर्ती कधी कधीच जन्मतात. त्यांच्याबाबतीतली ही एक खुप जूनी कथा आहे. तर या चक्रवर्ती होणा-या राजांना एक वरदान होते जे दुस-या कोणालाही प्राप्त होऊ शकत नव्हते. चक्रवर्ती झालेल्या राजाला स्वर्गातील महान अशा सुमेरु नावाच्या पर्वतावर आपले नाव कोरण्याचा अधिकार होता. त्यांच्या व्यतिरिक्त दुस-या कोणाला तो अधिकार प्राप्त नव्हता. खरंतर शतकानुशतकानंतर एखादा राजा चक्रवर्ती बनतो जो सर्व पृथ्वी जिंकतो. आणि अशा चक्रवर्तीलाच या महान सुमेरु पर्वतावर आपले नाव कोरण्याचा अधिकार मिळू शकतो.&lt;br /&gt;तो चक्रवर्ती राजा खुपच खुष झाला होता कारण त्याला हे भाग्य प्राप्त झाले होते. तो स्वर्गातील सुमेरु पर्वतावर आपले नाव कोरणार होता. तो आपली सारी फौज घेउन शस्त्राअस्त्राबरोबर पोहोचला स्वर्गाच्या दारावर.&lt;br /&gt;स्वर्गाच्या दरवाज्यावर पोहोचताच त्याला तेथील द्वारपालाने अडविले.&lt;br /&gt;तो द्वारपाल म्हणाला," आपण आलात ठिक आहे, पण हा सारा लवाजमा, बाडबिस्तारा तुम्हाला मागे पाठवावा लागेल कारण तुम्हाला एकट्यालाच प्रवेश मिळेल. आणि आपण सोबत कांही चिन्ही-हातोडावगैरे साहित्य आणले आहे ना नाव कोरण्यासाठी?"&lt;br /&gt;राजा म्हणाला," होय मी घेऊन आलोय"&lt;br /&gt;" मग ठिक आहे. प्रथम आपल्याला थोडं काम करावे लागेल ते म्हणजे, हा जो सुमेरु पर्वत आहे तो जरी महान आणि खुप अनंत, विशाल असला तरी आता पर्यंत इतके राजे चक्रवर्ती होऊन गेले की तुमचे नाव लिहायला आता जागाच उरली नाही. तेव्हा आपल्याला प्रथम कोणाचे तरी नाव खोडावे लागेल आणि नंतरच तुमचे नाव लिहावे लागेल. सारा पर्वत नावांनी भरुन गेला आहे."&lt;br /&gt;तो राजा आत गेला. पर्वत अनंत होता त्यामध्ये कितीतरी हिमालय सामावले असतील इतका मोठा. आणि तरीही त्यावर एक इंचभर जागा शिल्लक नव्हती. तो विचार करु लागला. शतकानुशतकानंतर एखादा राजा चक्रवर्ती होतो. आणि तरीही हा पर्वत चक्रवर्ती राजांच्या नावांनी भरुन गेला आहे. कमाल आहे. एवढे चक्रवर्ती होण्य़ासाठी किती काळ लोटला असेल. अनंत अनंत काळ लोटल्यानंतर एक चक्रवर्ती होतो आणि तरिही जागा नाही. तो उदास झाला त्याला काय करावे हे कळेना. तो द्वारपाल आला आणि म्हणाला," हे राजन आपण दुखी होऊ नका. हे फार पुर्वीपासून घडत आले आहे. माझे बाबा, त्यांचे बाबा आणि त्यांचेही बाबा असे सर्व खुप काळापासून हेच काम करत आहोत. पिढ्यानपिढ्या पुढ्च्या पिढीला ते हेच सांगत आले आहेत की जेव्हा कोणी राजा चक्रवर्ती होऊन येईल तेव्हा त्याला दुस-याचे नाव खोडून आपले नाव लिहावे लागते. रिकामी जागाच मिळत नाही.&lt;br /&gt;चक्रवर्ती राजा मागे परतू लागला. तो म्हणाला," जर दुस-याचे नाव खोडून आपले नाव लिहावे लागत असेल तर हा वेडेपणाच आहे. कारण आज मी नाव लिहून गेलो तर उद्या दुसरे कोण चक्रवर्ती येऊन ते खोडून आपले नाव लिहील आणि हा पर्वत एवढा विशाल आहे आणि त्यावर एवढी अनंत नावे आहेत ती वाचतो तरी कोण? येणारा चक्रवर्ती आपले नाव लिहीण्याकरताच येतो. मग याला काय अर्थ राहीला. सगळे कांही व्यर्थच गेले."&lt;br /&gt;. . .&lt;br /&gt;&lt;br /&gt;परंतू त्या चक्रवर्तीइतके समजूतदार लोक कमीच असतात. लोक दगडावर नावे कोरुन घेतात. मंदीरावर नावे कोरुन घेतात. स्मारक बनवतात, आपले नाव लिहून घेतात आणि विसरतातच की नावाशिवाय जन्माला आलो होतो. नावतर आपले नव्हतेच ते कोणीतरी दिलेले होते. नाव दगडावर लिहीले काय आणि वाळूवर लिहीले काय, ते किती काळ टिकणार?. दगड खराब केला ती गोष्ट वेगळीच आणि मेहनत केली ती वेगळीच.&lt;br /&gt;- ओशो (साधना पथ)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-7448852335947763704?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/7448852335947763704/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/02/blog-post.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/7448852335947763704'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/7448852335947763704'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/02/blog-post.html' title='४७. कशासाठी नावासाठी'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-6357102764872437909</id><published>2011-01-25T16:30:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:52:27.443+05:30</updated><title type='text'>४६. पापाचे धार्मिक महत्व</title><content type='html'>ख्रिश्चन हा आपल्या हिंदू धर्मासारखा सरळ आणि साधा धर्म नाही.&lt;br /&gt;त्यातून कॅथॉलीक ख्रिश्चन हा तर आचरावयास खुपच कठीन धर्म म्हणावा लागेल.&lt;br /&gt;आपल्या हिंदू धर्मात करण्यासारखं ’असं’ खुप कमीच असतं. दिवाळी, दसरा, गणेशोत्सव हे सगळे सण समारंभ. ते साजरे करणे म्हणजे धर्माचरण करणे असं आम्हाला वाटतं. पण तसे काही नाही. धर्म ह्या शब्दाची व्याप्ती खुप मोठी आहे. ख्रिस्तांच्या धर्मात करण्यासारखे खुप कांही असते. हा धर्म जरा इव्हेंटप्रिय असावा. आणि त्यांना असं कांही केल्याशिवाय आपण धार्मिक आहोत असं वाटत देखील नसावं. दर रविवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करा. फादरसमोर कंफेशन करा (त्याअगोदर थोडीफार पापं करा) दुस-यावर प्रेम करा. शेजा-यांवर प्रेम करा. गरीबांना मदत करा. (जमलंतर त्यांना धर्मांतर करायला भाग पाडा) इ.इ.&lt;br /&gt;नित्से म्हणतो की हे ख्रिश्चन लोक शेजा-यावर प्रेम करतात कारण त्यांना स्वत:ला स्वर्गात पोहोचायचे असते आणि पापी शेजा-यांना नरकात यातना भोगताना पहायचे असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"पाप" वरून आठवलं.&lt;br /&gt;एकदा एका शाळेत लहान मुलांना ख्रिश्चन धर्माविषयी माहीती दिली जात होती. कार्यक्रमाच्या शेवटी त्या नननी विचारले," सांगा पाहू कोणाकोणाला स्वर्गात जायचे आहे?"&lt;br /&gt;बहूतेक सर्व मुलांनी हात वर केले मात्र एका मुलीने केला नाही. तीला विचारले तेव्हा ती म्हणाली," मम्मीने मला शाळा सुटल्यावर दुसरीकडे कुठे न जाता सरळ घरी ये असं सांगीतलं आहे."&lt;br /&gt;मुलं किती सरळमार्गी असतात नाही?.&lt;br /&gt;त्या ननने पुढचा प्रश्न विचारला," सांगा बरे मुलांनो, स्वर्गात जाण्यासाठी अगोदर काय केले पाहीजे?"&lt;br /&gt;" पाप" एका मुलीने उत्तर दिले.&lt;br /&gt;ती मुलगी पुढे म्हणाली" कारण, पाप केल्यानंतर आपण जेव्हा प्रभूची क्षमा मागतो तेव्हाच आपल्याला स्वर्गाचा दरवाजा उघडतो."&lt;br /&gt;लहान मुले प्रत्तेक गोष्ट सरळ सरळ पाहतात. लहान मुलांना आपल्यासारखे "अनुभव" नसतात व "ज्ञान" कमी असते, त्यामूळे ते पुर्वानुमानाने किंवा पुर्वग्रहाने कोणतीही गोष्ट पहात नाहीत.&lt;br /&gt;हां एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे ’पाप’ म्हणजे काय हे त्यांना इतक्यात कळत नाही. ते कळण्यासाठी त्यांना थोडे मोठे व्हावे &lt;br /&gt;लागते.&lt;br /&gt;"पाप" वरून आणखी एक कथा आठवली.&lt;br /&gt;एकदा एका ख्रिश्चन पाद्र्याची (फादरची) सायकल हरवलेली असते.&lt;br /&gt;आपली सायकल हरवल्यामुळे ते खूप बचैन झाले होते. सायकलीमुळे त्यांची कामे वेळेवर व्हायची.&lt;br /&gt;आज रविवार त्यांना सायंकाळच्या प्रार्थनेसाठी वेळेवर पोहोचायचे होते. म्हणून ते घाईघाईने चालत जात होते. चालता चालता सायकल चोराला दुषणे देत होते. एका फादरची सायकल चोरायची म्हणजे काय?&lt;br /&gt;आज प्रार्थनेनंतरच्या प्रवचनादरम्यान आपण पाप-पुण्य इ. विषयी चांगले भाषण ठोकायचे असे त्यांनी ठरविले. आपले भाषण ऐकून त्या चोराला आपल्या अपकृत्याची आठवण होऊन त्याने आपली सायकल परत करावी असा त्यामागे हेतू होता.&lt;br /&gt;प्रवचनादरम्यान ते पाप-पुण्य, चोरी, सत्य-असत्य, प्रेम-इर्षा असे करत करत ते व्यभिचार-वेश्यागमनपर्यंत आले. वेश्यागमन, परस्त्रीगमन या शब्दांनंतर ते एकदम थांबले आणि त्यांनी प्रवचन संपवले.&lt;br /&gt;ते चर्चबाहेर पडले आणि तडक चालू लागले. आत्ता त्यांना आठवले की त्या रात्री त्यांची सायकल कोठे विसरली होती.&lt;br /&gt; &lt;br /&gt;(मी या कथा कोठेतरी वाचल्या आहेत. कोठे? ते नक्की आठवत नाही.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-6357102764872437909?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/6357102764872437909/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_25.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/6357102764872437909'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/6357102764872437909'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_25.html' title='४६. पापाचे धार्मिक महत्व'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-6507925296626522710</id><published>2011-01-22T15:25:00.000+05:30</published><updated>2011-09-28T16:52:17.974+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='प्रोफेसर'/><title type='text'>४५. लबाड प्रोफेसर</title><content type='html'>प्रोफेसर श्री. प्रभाकर जोशी एम. ए. पी. एचडी. कांही कामानिमीत्त आपली इंपोरटेड कार घेऊन शेजारच्या शहराकडे जात होते.&lt;br /&gt;रस्ता खेडेगावातून जात होता. रस्त्यावरून जाणारी येणारी गुरे, कुत्री आणि रस्त्यावर मध्येच उभा राहून गप्पा मारणारे गावकरी यांच्यामुळे प्रोफेसर महाशयांना खुपच मन:स्ताप सहन करावा लागत होता. मन शांत ठेऊन कशीतरी आपली इंपोर्टेड कार त्या भिकार रस्त्यांवरून पुढे नेताना त्यांचा जीव मेटाकूटीला आला होता. ड्रायव्हरला सुट्टी दिल्याबद्दल स्वत:ला टॊचण्या देत देतच ते पुढे जात होते.&lt;br /&gt;वाटेत एक मेंढ्यांचा कळप आला. त्यांनी करकचून ब्रेक लावला पण गाडी थांबे पर्यंत एका मेंढीच्या पायावरून चाक गेलेच.&lt;br /&gt;मेंढीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लगेचच तीचा मालक तेथे आला.&lt;br /&gt;एका जातीच्या धनगराला त्यांनी इतक्या जवळून कधी पाहीले नव्हते. ते सहाफूट उंच आणि दोनफूट बाय दिडफूट रुंद अखंड धूड पाहून पहील्यांदा त्यांना धडकीच भरली.&lt;br /&gt;आपला चष्मा पुसून त्यांनी डोळ्यावर लावला आणि गाडीतून खाली उतरले. तो धनगर तोपर्यंत गाडीच्याजवळ पोहोचलाच होता त्याने विचारले," काय साहेब हे काय केलंसा? गरीब मुका जीव, बघा कसा ओरडतोय तो?"&lt;br /&gt;प्रोफेसर स्वत:ला सावरुन म्हणाले," छॆ, छे, काही नाही, कांही नाही फक्त पायावरुन गाडी गेली आहे बाकी कांही नाही. तो पाय लवकरच दुरुस्त होईल कांही काळजी करण्यासारखं नाही"&lt;br /&gt;" म्हणे काळजी करण्यासारखं काही नाही," त्या धनगराला आता राग आवरेना. तो धनगर पुढे म्हणाला," या, साहेबराव इकडे या."असं म्हणून त्याने प्रोफेसर महाशयांना गाडीजवळून बाजूला ओढून उभा केले आणि त्यांच्या पायाभोवती एक रिंगन आखले आणि म्हणाला," हं, गप्प गुमान या रिंगणात उभा -हायाचं, रिंगणाच्या बाहीर पाय ठेवल्याला दिसलास तर तुझा पायच काढून हातात देतो."&lt;br /&gt; &lt;br /&gt;" बघ आता काय काळजी करण्यासारखं आहे का नाही ते?" असं म्हणून त्याने आपल्या हातातल्या काठीने एका घावातच त्या इंपोर्टेड कारची पुढची काच फोडून टाकली.&lt;br /&gt;" बघीतलस काय?" असं म्हणून त्याने प्रोफेसरसाहेबांकडे पाहीले तर ते हसत होते.&lt;br /&gt;त्याने रागाने मागची काच फोडली तरी प्रोफेसर हसत होते.&lt;br /&gt;" काय हसतोस रे माकडीच्या" असं म्हणून त्या धनगराने गाडीच्या सगळ्या काचा फोडल्या तरिही प्रोफेसर हसतच होते.&lt;br /&gt;धनगराला काही कळेना त्याने प्रोफेसर साहेबांची कॉलर धरुन विचारले," कायरे भुसनळ्या तुझ्या या मोटारीचे एवढे नुस्कान झालं आणि तुला दात इचकायला काय झालं?"&lt;br /&gt;प्रोफेसर साहेब आपलं हसू आवरत म्हणालं," तूला . . . तूला माहीत नाही , तूला माहीतच नाही"&lt;br /&gt;"आरं, काय माहीत नाही सांगशिल काय नाही"&lt;br /&gt;" तूला माहीत नाही मी दोनवेळा या रिंगणातून बाहेर आलो होतो आणि तूझं लक्षच नव्हतं माझ्याकडे!!" आणि पुन्हा ते जोर जोरात हसू लागले.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-6507925296626522710?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/6507925296626522710/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_22.html#comment-form' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/6507925296626522710'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/6507925296626522710'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_22.html' title='४५. लबाड प्रोफेसर'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-5212104080714366322</id><published>2011-01-20T15:25:00.000+05:30</published><updated>2011-09-28T16:52:09.302+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ससा आणि कासव'/><title type='text'>४४. ससा आणि कासव</title><content type='html'>ससा आणि कासव ही कथा आपल्याला माहीत असेलच.&lt;br /&gt;पंचतंत्रात किंवा इसाप यांनी ही कथा लिहील्यानंतरच्या काळातील घडून गेलेली आणखी एक कथा फारशी प्रसिध्द नाही ती आज मी तुम्हाला सांगणार आहे.&lt;br /&gt;एका रम्य सायंकाळी ससा, कासव आणि उंदीर हे तिघे मित्र फिरायला बाहेर पडले होते. फिरता फिरता शहरापासून खुप बाहेर पोहोचले. आज चालणे खुप झाल्यामुळे त्यांना आता कांहीशी भूक लागल्याची जाणीव झाली. तिथून जवळच त्यांना एक हॉटेल दिसले. तिघेही खुषीतच तिकडे वळले. नवीनच दिसणारे ते हॉटेल खुप महागडे असावे असा त्यांनी तर्क केला. दरवाजावरच त्यांचे स्वागत करण्यात आले.&lt;br /&gt;एक टेबल निवडून ते स्थानापन्न झाले आणि सुरवातीला तीन कॉफीची ऑर्डर दिली. कॉफी पिऊन खायला कांहीतरी मागवू असे ठरले. कॉफी येईपर्यंतच्या गप्पांमध्ये त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यापैकी एकाकडेही पैसे नव्हते. ते तिघे फिरायला सहजम्हणून बाहेर पडलेले त्यामुळे पैशाचे पाकीट कोणीही सोबत घेतले नव्हते. आता कॉफीचे बील कसे द्यायचे?&lt;br /&gt;कोणी तरी घरी जाऊन पैसे घेऊन आले पाहीजे त्याशिवाय बील भागवता येणार नव्हते. एवढ्या लांब चालत कोण जाणार? प्रत्तेकजण दुस-याकडे बोट दाखवू लागला.&lt;br /&gt;उंदीर म्हणाला," माझा जीव तो केवढा? एवढे चालल्यावर मीतरी मरुन जाईन तेव्हा तुम्हा दोघांपैकी कोणीतरी जायला पाहीजे"&lt;br /&gt;त्याचे म्हणणे बरोबर असल्याचे त्या दोघांना पटले. पण ससा आणि कासव यापैकी कोण जाणार हे अजून ठरत नव्हते.&lt;br /&gt;कासव सशाला म्हणाले," तू खुप वेगाने धावू शकतोस तेव्हा तूच जाऊन लवकर पैसे घेऊन ये."&lt;br /&gt;तेव्हा ससा म्हणाला," छे, छे मी नाही जाणार एवढ्या लांब, मला कंटाळा आलाय."&lt;br /&gt;उंदीर कासवाला म्हणाला," आता तूलाच जायला लागणार, हे ससे खूप आळशी असतात. मध्येच कुठेतरी झोपतील. मागे नाही का एक ससा शर्यतीत मध्येच झोपला होता आणि त्या कासवाने शर्यत जिंकली होती."&lt;br /&gt;आता यावर त्या कासवाचा नाईलाज झाला.&lt;br /&gt;कासव घरी जाऊन येण्यास तयार झाले पण त्याने अट घातली की मी आल्या शिवाय ही कॉफी कोणी प्यायची नाही. आणि ही अट मान्य नसेल किंवा कोण पाळणार नसेल तर ते घरी जाणारच नाही. शेवटी ही अट सर्वानी मान्य केली आणि कासव घरी जायला निघाले.&lt;br /&gt;कॉफी टेबलवर आलेली होती आणि थंड होत होती पण ती पिता येत नव्हती.&lt;br /&gt;कासवाला जाऊन बराच वेळ झाला तरी ते अजून परतले नव्हते.&lt;br /&gt;कॉफी टेबलवर येऊन तासभर होऊन गेला पण कासव काय येईना तेव्हा कॉफी पिऊन टाकावी की काय असे त्यांना वाटू लागले.&lt;br /&gt;ससा उंदराला म्हणाला," दोस्ता, हे कासव म्हणजे अगदीच संथ चालीचे त्याला पाठवून आपण चूकच केली, मला आता राहवत नाही आपण ही कॉफी आता पिऊन टाकूया."&lt;br /&gt;उंदरानेही त्याला होकार देऊन कॉफीचा कप उचलला. तेवढ्यात मागून आवाज आला," हुं, मला माहीतच होते तुम्ही असे करणार, म्हणून मी घरी गेलोच नाही!!" " मला चुकवून कॉफी पिता काय चोरांनो? मी तुम्हाला ओळखत नाही की काय?"&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-5212104080714366322?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/5212104080714366322/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_7163.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/5212104080714366322'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/5212104080714366322'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_7163.html' title='४४. ससा आणि कासव'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-4988350858931352209</id><published>2011-01-18T15:23:00.000+05:30</published><updated>2011-09-28T16:51:59.877+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नीतीकथा'/><title type='text'>४३. नीतीकथा Vs अनीतीकथा</title><content type='html'>नीती आणि अनीती हे दोन एकमेकांचे विरुध्दार्थी शब्द आहेत.&lt;br /&gt;नीतीची बाजू म्हणजे चांगली बाजू आणि अनीती बाजू म्हणजे वाईट बाजू असे आपण मानतो.&lt;br /&gt;नीतीमानता याप्रमाणेच प्रामाणिकपणा, नम्रपणा, विनयशिलता, सत्यप्रियता असे आणखी कांही समानधर्मीय शब्द आहेत.&lt;br /&gt;ग्रीक कथाकार इसाप याने लिहीलेल्या कथा या नीतीकथा म्हणून सर्वांना सुपरिचीत आहेत. इसाप या महाशयांनी प्राणी पक्षी यांच्या माध्यमातून विविध प्रसंगाच्या आधारे अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. ज्यामधून आपल्याला नीतीच्या अनेक गोष्टी कळतात असे म्हंटले जाते. पण यावर माझा आक्षेप आहे. या आणि अशाच प्रकारच्या कथामधून एखाद्याला नीतीने कसे वागावे यापेक्षा अनितीने कसे वागावे यावरच जास्त मार्गदर्शन मिळते असं मला वाटते. उदाहरनार्थ एकदा एक कोल्हा करकोच्याला घरी मेजवानीस बोलावीतो आणि उथळ थाळीत खीर देऊन त्याला उपाशीच राहावयाला भाग पाडतो. त्यानंतर तो करकोचा त्याच कोल्ह्यास आपल्या घरी मेजवानीस बोलावितो आणि एका उभट भांड्यात खीर देतो. त्यामूळे तो कोल्हा उपाशी राहतो.&lt;br /&gt;याकथेवरून कोणती नीतीची गोष्ट आपल्याला कळते?&lt;br /&gt;आपण दुस-याशी वाईट वर्तन केल्यास कधीतरी आपल्यावरही तशीच वेळ येऊ शकते. तेव्हा घरी येणा-या पाहूण्यांशी योग्यप्रकारे वर्तन करावे. असा निष्कर्ष खूप कमी लोक घेतात. तर एखाद्याला घरी बोलावून त्याची कशी फजीती करावी हेच जास्तजण शिकतात. जर एकादा सरळमार्गी असेल तर त्याला वाममार्गाचा परिचय करुन देण्याचं काम या गोष्टीद्वारे होते असे मला वाटतं. मोठ्या मानसांची ही गत तर आपण या गोष्टी लहान मुलांना वाचायला लावतो. अशाप्रकारे जाणीवपुर्वक लहान मुलांमध्ये आपण चालूगीरी, लूच्चेगीरी शिकवितो असं मला वाटते. मग या कथांना नीतीकथा असे कसे म्हणायचे, यांना अनीतीकथा असे म्हणावे लागेल.&lt;br /&gt;त्यामानाने भारतीय पंचतंत्रामधील गोष्टी या जास्त उजव्या आहेत.&lt;br /&gt;इसापनीतीमधील कांही कथा खुप सुंदर आहेत तर कांही कथातून गुप्तपणे वाईट शिक्षण मिळते. जाणत्या माणसांना वाचायला ठिक आहेत पण अजाणत्या आणि लहान मुलांना या वाचायला देणे हितावह नाही असे मला वाटते. या आणि अशा कथांमुळेच मुले स्वार्थी आणि आळशी होण्याची शक्यता जास्त असते.&lt;br /&gt;यापुर्वी मी लोभी कुत्र्याची कथा यावर लिहीलेला लेख काहींना आवडला तर कांहीजणांनी त्यावर आक्षेप घेतला. एका वाचकाने तर मला ती कथाच कळली नाही असा आक्षेप घेतला. पण आपण जरा माझ्या दृष्टीतून या कथांकडे पाहीले तर या कथांमधील खोट आपल्या ध्यानात यायला सुरुवात होईल.&lt;br /&gt;या असल्या नीती कथा लहान मुलांना सांगणे म्हणजे औषधापेक्षा रोग बरा म्हणावा लागेल. फार तर काय सगळी मुले सरळमार्गी होतील. जगातला खोटेपणा, चालूगिरी कमी होईल&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-4988350858931352209?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/4988350858931352209/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/vs.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/4988350858931352209'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/4988350858931352209'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/vs.html' title='४३. नीतीकथा Vs अनीतीकथा'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-8765670689718737724</id><published>2011-01-15T15:17:00.000+05:30</published><updated>2011-09-28T16:51:39.561+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गावठी दारुचा कारखाना'/><title type='text'>४२. इनक्रेडीबल मोरेवाडीकर</title><content type='html'>मोरेवाडी ता. करवीर जिल्हा कोल्हापूर हे गाव कोल्हापूर शहराच्या करंगळीजवळ वसलेले आहे आणि ते भटाला दिली ओसरी या चालीवर हळूहळू तळहाताकडे सरकत आहे.&lt;br /&gt;उजळाईवाडीकडून शहरात येणा-या रस्त्याने शाहू जकात नाक्यापासून थोडे पुढे आले की डाव्याबाजूस इंग्रजी "व्ही" आकारात एक रस्ता जातो. शांतीनिकेतनकडे असा बोर्डही तेथे दिसतो. त्या रस्त्याने आपण गेलात तर आपल्याला या गावाकडे जाता येईल. हे सगळे सविस्तर वर्णन वाचून आपल्याला वाटेल की मोरेवाडीला मोरगावचा गणपती आहे किंवा मोरेवाडीला निर्मल ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला आहे किंवा मोरेवाडीला कांही प्रेक्षणीय ठिकाण आहे किंवा असेच कांही तरी.&lt;br /&gt;पण मी आपल्याला मोरेवाडीचा पत्ता देण्य़ामागे वेगळेच एक कारण आहे.&lt;br /&gt;आपण गावठी दारुचा कारखाना पाहीला आहे का?&lt;br /&gt;पाहीला असेल किंवा नसेल आपण जरुर येथे येऊन येथील गावठी दारुचे उत्पादन कसे केले जाते हे पाहू शकता. वर्षभर अखंडीतपणे सुरु असलेला या दारुच्या भट्ट्या आपल्याला रस्त्याच्या कडेलाच दिसतील. आपण कोणत्याही मौसमात या येथील भट्ट्या नेहमी धगधगतच असतात.&lt;br /&gt;आपण म्हणाल की आम्ही पहायला आलो आणि पोलिस आले तर ?&lt;br /&gt;त्याची काळजीच करु नका. पोलिस येथे दररोज येऊन जातात. दारुवाल्यांना आपली भिती वाटणार नाही याची ते काळजी घेतात.&lt;br /&gt;एक-दिड वर्षापुर्वी येथे दर पंधरादिवसांनी पोलिसांची धाड(?) पडायची, पुन्हा या भट्ट्या तेवढ्याच तावाने पेटायच्या.&lt;br /&gt;पुन्हा धाड पडायची पुन्हा भट्ट्या सुरुच.&lt;br /&gt;मला वाटायचे की पोलिस दर पंधरा दिवसांनी येऊन त्यांना दारुच्या धंदा कसा करावा याचे शिक्षणच देत असावेत. येथील नवतरुणांचे प्रबोधन (?) करुन धंद्यातील बारकावे व नवनवीन तंत्रज्ञानाविषयी शिक्षण देत असावेत.&lt;br /&gt;कालांतराने तेथील तरुणच या पोलिसी शिक्षणाला कंटाळले आणि तेथील बायाबापड्या तरुण मुले लहान-मोठ्ठे सगळ्यांनी मिळून पोलिसांचा धंद्यातील हस्तक्षेप दुर करण्याचा निर्णय घेतला.&lt;br /&gt;अशाच एका धाडीच्या वेळी काहीतरी कारणावरुन त्यांच्या बिनसले. तेव्हा तेथील सगळ्यांनी मिळून आलेल्या पोलिसांना काठ्या, लाकडाची फोके इत्यादी जे काय हाताला मिळेल त्याने फोकळून काढले.&lt;br /&gt;त्या समरप्रसंगी बरेच वरिष्ठ कनिष्ठ पोलिस बांधव तेथे उपस्थीत होते. पण मोरेवाडीच्या बहाद्दरांनी कोणताही भेदभाव न पाळता सगळ्यांना एकच न्याय हे धोरण राबवून चांगलेच बदडून काडले. त्यांचा मार इतका व्यवस्थीत होता की काही पोलीसांना दोन-तीन दिवस इस्पितळात काढावे लागले. ( त्यानिमीत्ताने त्यांना सुट्टी मिळाली, त्यांच्यावर अशा धाडी टाकण्याच्या कामांचा खुप ताण असतो)&lt;br /&gt;या प्रसंगाने येथील दारुभट्टीधारक बांधवामध्ये एकी निर्माण झाली असून येथून पुढे येणा-या वाईट प्रसंगात असेच धैर्य दाखवण्याचे त्यांनी आता ठरविले आहे.&lt;br /&gt;याउलट पोलीसबांधवांचा मात्र "कॉन्फिडन्सच गेला" आहे. येथून पुढे मोरेवाडीकरांचा "नाद करायचा नाय" हे त्यांनी मनोमन ठरवीले आहे.&lt;br /&gt;त्यानंतर त्या भट्ट्या आजतागायत धडाधड धगधगत आहेत, त्यातून उत्तमप्रतीची गावठी दारु तयार होते आहे. त्यांचे एकदम कसे झकास सुरु आहे.&lt;br /&gt;दारू वाले, त्यांच्य़ा शेजारीच असणारे रिव्हेन्यू कॉलनीतील सरकारी नोकर, पोलिस, रस्त्याने येणारे जाणारे पुढारी, नेते हे सगळेच सुखी आहेत.&lt;br /&gt;येता जाता त्या भट्ट्या पाहून आम्हा सगळ्यांच्या मनाला कसा आल्हाद वाटतो. मनाला एक उभारी प्राप्त होते.&lt;br /&gt;कधी कधी पोलिसांबद्दल वाईट वाटते पण म्हणतो जाऊदे ते तरी काय करणार?&lt;br /&gt;दारुवाल्यांसमोर कोणाचे काय चालणार ??&lt;br /&gt;आता पोलिस त्याऐवजी फक्त तुम्हा-आम्हाला किंवा एखाद्या आमदाराला मारण्य़ासाठी आपली ताकत वापरतात. ते सोपे आहे त्यात रिस्क नाही.&lt;br /&gt;दारुवाले, साठेबाज व्यापारी, मशिदीत हत्यारांचा साठा करणारे, मटका घेणारे यापेक्षा सामान्य माणसावर आपला ताव काढणे कधीही सोपे.&lt;br /&gt;याच पोलिसांनी मिरजेत गणेशोत्सवात झालेल्या दंग्याचे पडसाद उचगावात उमटले तेव्हा तेथील लोकांना घरातून ओढून काढून मारहाण केली. त्यावेळी लहान-मोठे स्त्री-पुरुष या सगळ्यांनाच पोलिसी अत्याचार सहण करावे लागले. मुख्यमंत्र्याच्या सभेत घोषणाबाजी केली म्हणून त्या मुख्यमंत्र्यासमोरच कांही विद्यार्थ्यांना कोल्हापूरात अमानुष्य मारहान झाली. तेथे कायदा इत्यादीसाठी वेळ नसतो.&lt;br /&gt;शेवटी हे कायद्याचे राज्य आहे. देशद्रोही असला तर त्याच्या शिक्षेआड कायदा कसा आणावा हे या सरकारकडून शिकावे.&lt;br /&gt;तात्पर्य एवढेच की सामान्य माणसाने पोलिसांच्या वाट्याला जाऊ नये.&lt;br /&gt;(आपण जरी नाही गेलो तरी ते आपली वाट आडवून पैसे मागतातच.)&lt;br /&gt; &lt;br /&gt;टीप: वरील लेखातील प्रसंग, व्यक्ती विषयी कायदेशीर पुरावे माझ्याजवळ असतीलच असे नाही पण त्या त्या ठिकाणच्या लोकांना भेटून आपण याविषयी खात्री करु शकता.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-8765670689718737724?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/8765670689718737724/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_15.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/8765670689718737724'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/8765670689718737724'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_15.html' title='४२. इनक्रेडीबल मोरेवाडीकर'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-7629412929842265275</id><published>2011-01-12T16:45:00.000+05:30</published><updated>2011-09-28T16:51:49.146+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पती-पत्नी विनोद'/><title type='text'>४१. पती-पत्नी विनोद</title><content type='html'>१)&lt;br /&gt;एकदा मुल्ला नसरुद्दीन रस्त्याने जात असता त्याला एक आरसा सापडला. पहिल्यांदाच पाहील्यामुळे आरसा ही काय चीज असते त्याला माहीत नसते. त्याने आरश्यात पाहीले आणि अवाक होऊन म्हणाला," हुं बडे मिया, यह तो मेरे पिताजीकी तस्वीर है, ये तो मैने कभी सोचाही नही था की मेरे पिताजी इतने शौकीन होंगे की अपनी तस्वीर भी उतरवाये, बरं झालं मलाच सापडले ते आणि घरात त्यांची तस्वीर पण नाही. ही तस्वीर घरीच जपून ठेवीन म्हंतो." त्याने खुप आदरपुर्वक व जपून तो आरसा घरी आणला आणि बायकोपासून लपवून माळ्यावर एका कपड्याच्या गाठोड्यात दडवून ठेवला. त्याने विचार केला की बायकोला ही गोष्ट दृष्टीस पडता कामा नये, कारण तीचा आणि पिताजींचा छत्तीसचा आकडा सगळ्य़ा गल्लीला माहीत आहे. अब्बूजान गेल्यावर तिने सगळ्यांना वाटलेले बुंदीचे लाडू अजून कोण विसरेल बरे? आणि ही तस्वीर पाहून ती भडकली तर काय खरं नाही.&lt;br /&gt;पण पुरुष कितीही लपविण्याचा प्रयत्न करो तो आपल्या बायकोपासून काही लपवू शकत नाही. तो ज्याप्रकारे लपवन्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तो लगेचच सापडतो. मुल्लाचे चोरुन घरात येणे दबल्या पावलांनी चालणे पाहून पत्नीने बरोबर ओळखले की मामला कुछ खास आहे.&lt;br /&gt;मुल्ला खाऊन पिऊन घराबाहेर पडेपर्यंत तिने कड काढला आणि त्यानंतर लगेचच तिने त्यावस्तूचा शोध लावला. तिने ते गटळे उघडले आणि आरसा काढून पाहीला आणि किंचाळलीच," अच्छा, तो अब इस चुडैल के पिछे पडे है मियां?"&lt;br /&gt; &lt;br /&gt;२)&lt;br /&gt;आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशी सांयंकाळी मुल्ला नसरुद्दीनने आपल्या घरी एक माकडाचे पिल्लू घेऊन जायचा निर्णय घेतला. त्याने विचार केला की हे माकडाचे पिल्लू पाहून बायकोला आश्चर्याचा धक्का बसेल.&lt;br /&gt;यावेळेस त्याचा अंदाज खरा ठरला.&lt;br /&gt;ते माकडाचे पिल्लू पाहून त्याची पत्नी किंचाळली, आणि म्हणाली: "व्हाट द हेल आर यु डुईंग विथ धीस दर्टी अनिमल? या माकडाच्या पिल्लाचं तू काय करणार आहेस, मुल्ला?"&lt;br /&gt;" अं . . . ते दिवसभर आपल्यासोबत खेळेल आणि रात्री आपल्या बिछान्यात दोघांच्यामध्ये झोपेल."&lt;br /&gt;" आणि वासाचं काय ? "&lt;br /&gt;" अं ? "&lt;br /&gt; &lt;br /&gt;" ते आपल्याजवळ झोपणार मग वासाचं काय, मुल्ला?"- पत्नीने पुन्हा विचारले.&lt;br /&gt; &lt;br /&gt;" होईल त्यालाही सवय, मला आता झालीच आहे त्यालाही होईल. तू वासाची काळजी करु नको."- मुल्ला म्हणाला.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-7629412929842265275?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/7629412929842265275/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_12.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/7629412929842265275'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/7629412929842265275'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_12.html' title='४१. पती-पत्नी विनोद'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-207943608974894405</id><published>2011-01-10T15:45:00.000+05:30</published><updated>2011-09-28T16:51:30.173+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पती-पत्नी खेळ'/><title type='text'>४०. नात्यांमधील खेळ</title><content type='html'>पिटर वाडेन व जॉर्ज बाख या दोन मनोवैज्ञानिकांनी मिळून एक पुस्तक लिहिले आहे.&lt;br /&gt;त्याचे नाव - ’ दि इंटिमेट एनिमी’ ज्याचा मराठीत भावानुवाद केला तर कांहीसा "सख्खा शत्रू" असा होईल.&lt;br /&gt;१९६८ साली अमेरिकेत प्रकाशित झालेल्या या पुस्तकात स्त्री आणि पुरुष यांच्यातील जटील नातेसंदर्भाविषयी खुप विस्मयकारी गोष्टी लिहीलेल्या सापडतात.&lt;br /&gt;ओशो आपल्या प्रवचनात या पुस्तकातील दाखले नेहमी देतात.&lt;br /&gt;आसपास जर बारकाईने पाहीले तर आपल्याला असं पाहायला मिळेल की स्त्री आणि पुरुष विषेशत: पती-पत्नी या नात्यातले, नेहमी आपआपसात  डाव-पेंच खेळतात.याबाबतीत त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात दुसरेच असतात. कारण दोघेही सत्याला सामोरे जायला घाबरतात. दोघांमध्ये खूप राजकारण चालते. एकमेकांपासून दुर पळण्याचे प्रयत्न असतो आणि स्त्रिया यामध्ये खूप वाकबगार असतात.&lt;br /&gt;पहिला डाव- डोकेदुखी&lt;br /&gt;१) पती जोपर्यंत घरी नसतो तोपर्यंत ती टिव्ही पाहत असते, टेलीफोनवरून आईशी किंवा मैत्रीणीशी गप्पा मारत असते सगळ कसं ठिक ठीक सुरु असतं. पण जेव्हा पती घरी येतो ती डोके हाताने धरून कन्हू लागते.&lt;br /&gt;ही डोकेदुखी पतीची सहानुभूती मिळविन्यासाठी असते. बघा मी दिवसभर किती काम केले, घर सांभाळणे किती अवघड आहे हे तिला दाखवायचे असते.&lt;br /&gt;२) डोकेदुखी -२- या डोकेदुखीचे प्रयोजन ठिक उलटे असते. ती बरोबर मध्यरात्री सुरु होते आणि ती पतीच्या प्रेमापासून बचाव करण्यासाठी असते.&lt;br /&gt;विजयकुमार शास्त्री जेव्हा रात्री उशीरा आपल्या मित्रांबरोबर गप्पा संपवून घरी येत तोपर्यंत पत्नी झोपलेली असायची किंवा झोपण्याची तयारी करत असायची. कपडे बदलून ते अंथरुनात घुसून आपल्या पत्नीला म्हणत ," काय राणी, कसं कायं?" तेव्हा पत्नी लगेचच म्हणते,"इथे माझे डोके ठणकत आहे, डोक्यात नुसते घन बडवल्या सारखे दुखते आहे . . . " इ.इ.&lt;br /&gt;अशाप्रकारे ती आठवडेच्या आठवडे त्यांना आपल्यापासून दूर ठेवते. प्रेमापासून वंचीत ठेवते.&lt;br /&gt;विजयकुमार खुप उदास आहेत. ही नाजूक समस्या कोणाला आणि कशी सांगायची? शेवटी त्यांनाही कोणीतरी गुरु भेटलाच.&lt;br /&gt;त्यानंतर ते रात्री घरी गेले. अंथरुनात जाताना हातात एक ग्लास पाणी आणि ऍस्प्रिनच्या दोन गोळ्या घेऊनच गेले. ती गडबडली व म्हणाली ," हे काय हो?"&lt;br /&gt;ते म्हणाले," ऍस्प्रिन आहे, तुझे डोकं दुखत आहे ना राणी? त्याच्यासाठीच आहे हे सगळं."&lt;br /&gt;त्यावर ती एकदम म्हणाली," छे छे कोण म्हणालं की माझं डोकं दुखतयं म्हणून?"&lt;br /&gt;विजयकुमार म्हणाले," तो फिर आज क्या खयाल है? ... हो जाय?"&lt;br /&gt; &lt;br /&gt;दुसरा डाव -&lt;br /&gt;हा डाव पती आपल्या पत्नीबरोबर खेळतात.&lt;br /&gt;दोन मित्र रात्री उशीरा पार्टीतून घरी परतत होते. त्यापैकी एकजन म्हणाला," मी जेव्हा कधीही रात्री उशीरा घरी पोहोचतो तेव्हा मला खुप भिती वाटते. मी हळूच गाडी स्टँडला लावतो, हळूच दार बंद करतो, हळूहळू बूट काढून बायकोला न उठवता आपण झोपण्याचा प्रयत्न करतो. पण तिला जाग येतेच आणि ती उठून माझी चांगलीच खातीरदारी करते.&lt;br /&gt;यावर दुसरा म्हणाला," तुझी आयडीया चुकीची आहे. मलातर काही प्रॉब्लेम येत नाही. मी घरी पोहोचल्यावर जोरात हॉर्न वाजवतो, लाथ मारुन दरवाजा उघडतो, गाणी गुणगुणत कपडे बदलतो आणि अंथरुणात शिरुन बायकोला विचारतो," काय म्हणतेस डार्लिंग आज काय खयाल आहे?" आणि ती नेहमी झोपण्याचे नाटक करते.&lt;br /&gt;- सौजन्य - Osho Times&lt;br /&gt;visit - www.osho.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-207943608974894405?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/207943608974894405/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_10.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/207943608974894405'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/207943608974894405'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_10.html' title='४०. नात्यांमधील खेळ'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-1104258505082459804</id><published>2011-01-08T15:50:00.002+05:30</published><updated>2011-09-28T16:51:20.020+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सुफी'/><title type='text'>३९. कथा: सुफी शिक्षणाचा मार्ग</title><content type='html'>शाह फ़िरोज हे एक सुफी संत होते आणि त्यांना विशेषत: सुफी संतांचे गुरु म्हणून ओळखले जात होते. त्यांना नेहमी विचारले जाई की आपण शिक्षण देण्य़ास इतका वेळ का लावता. तेव्हा ते म्हणत,"अगदी समर्पित व्यक्तिसुध्दा जोपर्यंत समजण्याच्या एका खास पातळीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो शिक्षण प्राप्त करण्यास योग्य ठरत नाही. इथे फक्त त्याचे शरीर हजर असते बाकी कांही नाही."&lt;br /&gt;त्यांनी एक कथा सांगितली ती अशी...&lt;br /&gt;एकदा एका सुलतानाला सुफी व्हायचे होते.&lt;br /&gt;जेव्हा तो यासाठी एका सुफी संताला भेटला तेव्हा तो सुफी म्हणाला," बाद्शहा सलामत, आपण निवडलेल्या बाकीच्या लोकांबरोबर तोपर्य़ंत शिक्षण घेऊ शकत नाही जोपर्यंत आपण बेशुध्दीतून बाहेर येत नाही."&lt;br /&gt;"बेहोशी!," सुलतान म्हणाला," मी माझी धार्मिक कर्तव्ये पार पाडतो, प्रजेकडे लक्ष देतो, आणि कोण आहे जो मला बेहोश समजतो?"&lt;br /&gt;" बस! हीचतर खरी समस्या आहे", सुफी संत म्हणाला," कारण सजगतेला लोकांनी अशा गोष्टीबरोबर जोडले आहे की ते स्वत:ला सजग मानून जगत आहेत."&lt;br /&gt;" मी आपली ही दुर्बोध भाषा समजू शकत नाही आणि म्हणूनच आपण मला अयोग्य समजत असाल."&lt;br /&gt;" बिलकूल नाही, परंतू एक भावी शिष्य आपल्या भावी गुरुबरोबर वादविवाद करु शकत नाही. सुफी लोकांचे कार्यक्षेत्र हे प्रज्ञा असते, तर्क नाही. परंतू तुला मी तुझ्या बेहोशीचा प्रत्यक्ष दाखलाच देतो. तू माझ्या म्हणन्यानुसार एक परिक्षा दिलीस तर तूलाही समजेल."&lt;br /&gt;सुलतान तयार झाला.&lt;br /&gt;सुफी संताने सांगितले की पुढे कांही काळासाठी ते जे कांही म्हणतील त्यावर सुलतानाने फक्त इतकेच म्हणायचे आहे की,"माझा आपल्यावर विश्वास आहे"&lt;br /&gt;सुलतान म्हणाला," जर हीच परिक्षा असेल तर सुफी होण्याची सुरवात तर खुप सोपी आहे."&lt;br /&gt;परिक्षेला प्रारंभ झाला.&lt;br /&gt;सुफी संत म्हणाला,"मी विश्वाहून मोठा आहे"&lt;br /&gt;सुलतान म्हणाला,"माझा आपल्यावर विश्वास आहे"&lt;br /&gt;"मी खोटा आहे"&lt;br /&gt;सुलतान म्हणाला,"माझा आपल्यावर विश्वास आहे"&lt;br /&gt;"जेव्हा तू जन्मलास तेव्हा मी तिथे उपस्थीत होतो"&lt;br /&gt;सुलतान म्हणाला,"माझा आपल्यावर विश्वास आहे"&lt;br /&gt;"आणि तुझे वडिल एक सामान्य शेतकरी होते"&lt;br /&gt;"खोटे आहे! खोटे आहे" सुलतान ओरडला.&lt;br /&gt;सुफी संतांनी त्याच्याकडे दुखी नजरेने पाहीले आणि म्हणाले," आपण इतके बेहोश आहात की एक क्षणभरसुध्दा आपले मन मध्ये आणल्याशिवाय फक्त ’ माझा आपल्यावर विश्वास आहे" असं म्हणायचे आहे हे विसलात, आणि म्हणूनच आपल्याला कोणीही दिक्षा देऊ शकणार नाही"&lt;br /&gt;सुफी लोकांचे कार्यक्षेत्र प्रज्ञा आहे. ते तुम्हाला मार्ग दाखवू शकतात, जो त्यांनी जाणला आहे. परंतू ते तर्क-वितर्क करत बसत नाहीत. ते तुम्हाला कोणताही नियम, सिध्दांत देत नाहीत. ते निष्णात वैद्य आहेत. ते औषध देतात. जसा रोग तसे औषध. आणि ते औषधच तुमचे डोळे उघडते.&lt;br /&gt;- ओशो (जो बोलें तो हरीकथा)&lt;br /&gt;visit www.oshoworld.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-1104258505082459804?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/1104258505082459804/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_08.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1104258505082459804'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1104258505082459804'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_08.html' title='३९. कथा: सुफी शिक्षणाचा मार्ग'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-6487654583187793576</id><published>2011-01-06T15:32:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:51:09.840+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='हसीद'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रबाई'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सम्यक जीवन'/><title type='text'>३८. यशाचे रहस्य - सम्यक जीवन</title><content type='html'>ऒशो-&lt;br /&gt;एकदा हसीदियम आपल्या लवाजम्यासह बसलेली होती, हातात चिलीम घेऊन रबाई इजरायल तिथे येऊन बसला...&lt;br /&gt;एखादा संत हातात पाईप घेउन आलेला असा विचार तुम्ही कधी केला आहे का? हसीद म्हणतात साधारण जीवनालाच दिव्यरुप द्यायचे आहे, पवित्र बनवायचे आहे. तुम्ही चिलीम ओढतानासुध्दा ती देवाची प्रार्थना करत असल्यासारखी ओढाल किंवा प्रार्थनासुध्दा चुकीच्या पध्दतीने कराल. तुम्ही मंदिरात जाऊनही प्रार्थनेपासून वंचीत राहू शकता.&lt;br /&gt;तेव्हा रबाई स्नेहपुर्ण वातावरणात बसलेला पाहून त्यांनी विचारले, "प्रिय रबाई, आम्हाला सांग की आम्ही ईश्वराची सेवा कशी करावी बरे?"&lt;br /&gt;दृढ मैत्रीच्या ठिकाणीच असे प्रश्न आपण विचारू शकतो, नाही का? गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये अशीच दृढ मैत्री असते.&lt;br /&gt;रबाई या प्रश्नावर चकीत झाला आणि म्हणाला," मला काय माहीत?"&lt;br /&gt;पण त्यानंतर त्याने एक कथा सांगितली ती अशी.....&lt;br /&gt;सगळे शिष्य एकत्रीत जमले व लक्षपुर्वक ऐकू लागले. वातावरण स्नेहपुर्ण व तणावरहीत होते. कथाकथनाचे हेच वैशिष्ठ्य असते की ऐकणारा लक्षपुर्वक ऐकतो पण त्याच्यावर तणाव येत नाही. आतमध्ये सजगता असते की आता पुढे काय होणार पण गंभीरता नसते. या तणावरहीत सजगतेमुळे तुम्ही ध्यानात उतरू शकता.&lt;br /&gt;रबाई: " एका राजाचे दोन मित्र असतात आणि दोघेही एका गुन्ह्यात अपराधी सिध्द झालेले असतात. राजाचे दोघांवरही प्रेम असते त्यामुळे तो त्यांच्यावर दया दाखवू इच्छीत होता. परंतु राजा त्या दोघांना शिक्षेशिवाय सोडूही शकत नव्हता. न्यायासमोर सगळे समान असतात.&lt;br /&gt;त्याने निकाल ऐकवला की एका खोल दरीवर रस्सी बांधली जावी व दोघे एकापाठोपाठ त्या रस्सीवरुन चालतील. जो दरी पार करेल त्याला जीवदान मिळेल.&lt;br /&gt;राजाच्या हुकुमाची लगेचच अम्मलबजावणी केली जाते.&lt;br /&gt;पहिला मित्र दरी सुरक्षीतपणे पार करतो.&lt;br /&gt;दुसर-या मित्राने आपल्या जागेवरुनच त्याला ओरडून विचारले," माझ्या मित्रा मला सांग की तू ही दरी कशी पार केलीस?"&lt;br /&gt;पहिला जोराने ओरडून त्याला म्हणाला, " मला एवढेच माहीत आहे की जेव्हा जेव्हा एका बाजूला माझा तोल जात होता तेव्हा तेव्हा मी दुस-या बाजूला झुकत होतो."&lt;br /&gt;कथा संपली.&lt;br /&gt;सामन्यपणे दोनप्रकारचे लोक असतात. पहिला सरळ पार झाला. दुसरा विचारू इच्छीतो की कसं पोहोचायचं? खोल दरीवर बांधलेला दोर, खतरा आहे. कांही रित, पध्दत, टेकनिक ? ...&lt;br /&gt;पहिला सरळ चालत गेला खुप श्रध्दावान मनुष्य असणार तो. तो यासाठी थांबला नाही की प्रथम दुसरा पोहचू देत, मग पाहू. त्याने जीवनात एकच गोष्ट शिकली असेल, शिकण्याची एकच गोष्ट- स्वानुभव. कारण दुस-याला चालताना पाहून आपण रस्सीवरुन चालू शकत नाही.&lt;br /&gt;आणि हा दुसरा मनुष्य म्हणजे गर्दीचा प्रतिनिधी आहे. हा आपल्या पूर्वज्ञानावर अवलंबून आहे. हा आपल्या भुतकाळावर अवलंबून आहे.&lt;br /&gt;पोहोचल्यावरसुध्दा पहिला म्हणाला की मलाही माहीत नाही की मी कसा पोहोचलो ते. फक्त एवढेच म्हणाला की जेव्हा जेव्हा एका बाजूला माझा तोल जात होता तेव्हा तेव्हा मी दुस-या बाजूला झुकत होतो.&lt;br /&gt;या कथेद्वारे रबाई सांगत आहे की मध्य साधा.&lt;br /&gt;सम्यक रहा.&lt;br /&gt;न जादा त्याग ना जादा भोग.&lt;br /&gt;त्याने एक सुंदर कथा निवडली. ना त्याने ईश्वराच्या गोष्टी केल्या ना ईश्वरसेवेच्या.&lt;br /&gt;त्याने प्रश्नाचे उत्तर सरळ सरळ दिले नाही, कदाचीत शिष्यच आपला प्रश्न विसरले असतील.&lt;br /&gt;- ओशो (दि आर्ट ऑफ डाईंग)&lt;br /&gt;visit www.oshoworld.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-6487654583187793576?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/6487654583187793576/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_06.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/6487654583187793576'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/6487654583187793576'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post_06.html' title='३८. यशाचे रहस्य - सम्यक जीवन'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-3136346283162614725</id><published>2011-01-05T12:44:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:51:00.475+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथाकथन'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>३७. कथा - सांगू तरी कोणाला? ऐकतो कोण?</title><content type='html'>साधू-संतांनी सांगितलेल्या किंवा पुस्तकातून वाचलेल्या छोट्या छोट्या कथा मला खुप आवडतात. त्या इतरांना सांगून सांगता सांगता त्यातील मर्म जाणण्याचा प्रयत्न मी करतो. कथा ऐकण्यातून जसा आनंद मिळतो, खुप शिकण्यास मिळते तसे सांगतानाही मिळते. ओशोंनी कथांचा खुप चांगला आणि परिणामकारक वापर आपल्या प्रवचनांमध्ये केलेला आहे. आपल्या कथांबद्दल ते एके ठिकाणी म्हणतात -&lt;br /&gt;कथाकथनाच्याद्वारे त्या गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात ज्या गोष्टी सरळ सरळ सांगितल्या जाऊ शकत नाहीत. कथा सांगणे म्हणजे हाताच्या बोटांनी चंद्राकडे केलेला इशारा. बोटाला विसरा व चंद्राकडे पहा. बोटाला पकडून राहू नका, बोटाचे दोष काढू नका. कथेला पकडा तिचा आत्मा शोधा.&lt;br /&gt;कथेमध्ये हेच सौंदर्य आहे. जेव्हा तुम्ही कथा एकत असता तेव्हा तुम्ही ती ध्यानपुर्वक ऐकता कारण तुमची उत्सुकता जागविली जाते. "पुढे काय होणार?" हे ऐकण्य़ासाठी तुमचे कान टवकारले जातात. तुम्ही गुंग होता, आतूर होता, ग्रहणशील होता. तुम्ही आपेक्षेने भरुन जाता, "पुढे काय होणार?". कथा रहस्यमय वातावरण निर्माण करते. ती शिखराकडे जात असते आणि अचानक कथेचा गाभा समोर येतो. कथेचा निष्कर्ष समोर येतो. अशाप्रकारे अचानक निष्कर्षापर्यंत पोहोचता तेव्हा तुम्ही एकदम उद्यपित होता आणि कथेचा निष्कर्ष तुमच्या ह्र्दयापर्यंत पोहोचतो.&lt;br /&gt;सत्य, आध्यात्म यांच्याविषयी काही सांगणे सोपे नाही. त्यासाठी कथा, कविता आणि कांही इतर मार्ग शोधावे लागतात म्हणजेच ऐकणारा ऐकता ऐकता उत्कंठीत होईल, ग्रहणशील होईल आणि जे होणार आहे त्यासाठी प्रतिक्षारत होईल.&lt;br /&gt;आणि फक्त मीच (ओशो) नाही की जो कथांचा वापर करतो तर असे खुप पुर्वीपासून होत आले आहे. बुध्द, चांगत्सू, ख्रिस्त या सर्वांनी कथांचा वापर ध्यानविधीसारखा केला आहे. युगायुगांपासून कथांचा वापर उपयोगी ठरलेला आहे आणि भविष्यातही तो ठरेल.&lt;br /&gt;कथा म्हणजे केवळ चुटका नाही. कथा तुमचे केवळ मनोरंजन करत नाही तर ती मनोभंजन करते. कथेच्या आत एक संदेश दडलेला असतो तो तुम्हाला शोधायचा आहे. कधी कधी कथेचे अंतरंग समजण्यासाठी पुर्ण जीवन लागेल. पण कथेचे अंतरंग उघडता उघडता तुम्ही रुपांतरीत व्हाल.&lt;br /&gt;- ओशो ( दि सोक्रेट ऑफ सिक्रेटस)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-3136346283162614725?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/3136346283162614725/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3136346283162614725'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3136346283162614725'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2011/01/blog-post.html' title='३७. कथा - सांगू तरी कोणाला? ऐकतो कोण?'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-5203279420488476966</id><published>2010-11-13T13:30:00.000+05:30</published><updated>2011-09-28T16:50:51.527+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='क्रिडामहोत्सव'/><title type='text'>३६. शाळेतला एक प्रसंग</title><content type='html'>मी इयत्ता आठवीत शिकत होतो तेव्हाची गोष्ट.&lt;br /&gt;उद्यापासून वार्षिक क्रिडामहोत्सव सुरु होणार म्हणून सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते.&lt;br /&gt;आमच्या शाळेचे राष्ट्रीय खेळ ( भारतात वर्डफेमस या चालीवर) खो-खो, कबड्डी, रिले २०० मी.- ४०० मी., लांब उडी, उंच उडी, धावणे, भाला फेक, गोळा फेक इ. इ.&lt;br /&gt;यावर्षी कबड्डीत नसेना का पण खो-खो मध्ये आमची टीम चांगली होती व आम्हीच पहिला नंबर मिळवू असा उघड दावा आम्ही करत होतो.&lt;br /&gt;तसा खो-खो हा गेम त्याचे नियम ३-८, साखळी इ, डाव आम्हा सर्वांनाच माहीत होते पण खो-खो च्या फायनल टीममध्ये स्थान मिळवण्या इतके प्राविण्य माझ्याकडे नव्हते. कबड्डीच्या फायनल टिममधून खेळण्यासाठी चांगली तब्येत हे मेन क्वालिफिकेशन, त्यातही आम्ही नापास. राहता राहीले वैयक्तिक खेळ धावणे इ. पण धावणे, लांब उडी, उंच उडी यांना खेळ कसे म्हणायचे. फार झालेतर त्यांची स्पर्धा असे म्हणता येइल. या विभागात इ. १० च्या मुलांच्या समोर आमचा टिकाव कसा लागणार ? या सर्व कारणांनी म्हणा किंवा ’किलींग इंस्टींक्ट’, जिंकण्याची भावना इत्यादींचा अभाव म्हणा शेवटपर्यंत कोणत्याच खेळात माझे नाव राहीले नाही. त्यामुळे स्पर्धेचे कोणतेच बर्डन माझ्यावर नव्हते. एकूण काय मी खुपच खुषीत होतो.&lt;br /&gt;जोशी सरांचा इतिहासाचा तास सुरु असतानाच अचानक पी.टी. च्या मदारे सरांची एंट्री वर्गात झाली.&lt;br /&gt;उद्याच्या दिवसाबद्दल काही माहीती मिळणार म्हणून सगळेजन कान टवकारून ऐकू लागले. मदारे सरांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये फर्मावले&lt;br /&gt;"हे बघा, सर्वांना एक सुसना आहे, (सरांना सुचना असा उच्चार जमत नाही ते एकतर सुसना म्हणतात किंवा चुचना तरी म्हणतात) ज्या कोणी उद्याच्या स्पर्धेत भाग घेतला नसेल त्यांनी उभे रहायचे आहे".&lt;br /&gt;असं म्हंटल्याबरोबर मी उभा राहीलो. पण पहातो तर काय सगळ्या वर्गात मी एकटाच उभा होतो. मला काही कळेना काहितरी चुकल्या चुकल्या सारखे वाटू लागले. मी एकटाच? म्हंजे सगळ्या वर्गात मी एकटाच असा होतो? सगळा वर्ग माझ्याकडे कुचेष्टेने पाहू लागला. त्यांच्या नजरेत "हा पहा बावळट" असा भाव होता.&lt;br /&gt;मदारे सरांनी माझे नाव लिहून घेतले व त्यांची त्यांनीच माझी स्वयंसेवक म्हणून निवडपण करून टाकली.&lt;br /&gt; &lt;br /&gt;सर गेले. शाळा सुटली.&lt;br /&gt; &lt;br /&gt;मला हे स्वयंसेवक वगैरे कांहीही व्हायचे नव्हते. मला फक्त क्रिडामहोत्सवाचा आनंद माझ्यापध्दतीने घ्यायचा होता. पण आता ते कसे काय शक्य होणार?&lt;br /&gt;आणि मला हे कळत नव्हते की स्वयंसेवक म्हणून काम करण्यास मी तयार आहे की नाही? हा प्रश्न मला न विचारताच माझी डायरेक्ट नेमणूक करणे बरोबर आहे का?&lt;br /&gt;मग स्वयंसेवक ह्या शब्दाचा अर्थ काय होतो?&lt;br /&gt; &lt;br /&gt;दुसरी गोष्ट अशी की मी सोडून बाकी सर्वांनी खेळात भाग घेतला होता असे मला तरी वाटत नव्हते. कारण सुन्या घोटुगडेला दहा फुटावरचे दिसत नव्हते तो काय धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणार? असे बरेचजन होते जे पी.टी.च्या तासाला नेहमी बाजूला बसलेले असायचे. आणि मुली त्या कोणत्या स्पर्धेत भाग घेणार होत्या? पण कोणीच कसे उभे राहीले नाही? आणि सरांना पण ही शंका का आली नाही? माझ्या डोक्यात विचारांचे काहूर माजले. मला आता उद्याच्या कार्यक्रमात रस वाटेनासा झाला. उद्या शाळेला दांडी मारावी असा पण विचार करुन पाहीला परंतु माझे नाव लिहून घेतल्यामूळे हा विचारही कांही कामाचा नव्हता.&lt;br /&gt;मी ज्याला त्याला विचारत सुटलो, खुप चौकशी केली की कोणी कशात भाग घेतला तेव्हा काहिंनी खेळांची नावे सांगितली काहीं खरे काहीं खोटे, तर काहींनी सरळ सरळ नाही म्हणून सांगितले.&lt;br /&gt;मी खरोखरच बावळट होतो. बाकी सर्वांना खोटे बोलता येत होते मला ते जमले नाही. पण खरे बोलन्याची शिक्षाही मिळेल असे वाटले नव्हते. ते स्पर्धेच्या दिवशी कळाले.&lt;br /&gt;दुसरा दिवस उजाडला मी शाळेत पोहचलो.&lt;br /&gt;सुरवातीला झेंडा वंदन , राष्ट्र्गीत इ. कार्यक्रम झाल्यावर इतर स्वयंसेवकांसोबत माझ्यानावाची अनाऊंसमेन्ट झाली.&lt;br /&gt;आम्हाला इतरांपासून वेगळे ओळखता यावे यासाठी आमच्या सर्वांच्या खिशाला लालरंगाचा रिबनचा बँड बांधण्यात आला.&lt;br /&gt;आतापर्यंत फक्त वर्गापूरती असलेली बातमी सर्वांना माहीत झाल्यामूळे आमची बढती झाली व आमच्या बावळटपणाला सार्वजनीक मान्यता मिळाली.&lt;br /&gt;ग्राउंडवर सगळेजण आमची कुचेष्टा करु लागला. जो-तो आम्हाला काही ना काही कामे लावू लागला. पडेल ते काम करणे आमचे नेमून दिलेले कर्तव्यच होते ना. कोण चाकपिठच्या रेषा मारण्यास सांगे तर कोणी ग्राउंडवर पाणी मारण्यास, कोणाला पिण्यास पाणी हवे तर कोणाची कपडे सांभाळावी लागत. कर्तव्यात कसुर करणे बावळटांना कधी जमणार?...&lt;br /&gt;कामात टाळाटाळ करताच मुले सरांकडे तक्रार करत व सर आमचे कान उपटत, " नालायकांनो स्वयंसेवक आहात आणि कामे करत नाही?". "मग स्वयंसेवक कशाला झालात?" इ.&lt;br /&gt;गल्लीतील आमचे इतर वर्गातील सोबतीही माझी टर उडवू लागेले. जणूकांही ’स्वयंसेवक’ म्हणजे एकप्रकारचा जोकरच.&lt;br /&gt;मला आता रडू येण्याचे बाकी होते. काय करावे काही सुचत नव्हते. सर्वांनी माझी चेष्टामस्करी करुन आपली मौज करून घेतली.&lt;br /&gt;पळून जाणे एवढाच आता मार्ग राहीला होता.&lt;br /&gt;दुपारी जेवणासाठी घरी गेल्यावर एका शुभचिंतक मित्राने मला तो खिशावरचा बँड काढुन ठेवण्यास सांगितले.&lt;br /&gt;तो म्हणाला आता तू स्वयंसेवक नाहीस. तेव्हा मला खुपच धीर वाटला. मी त्याच्याच सोबतीने शाळेत पोहोचलो. हळूहळू वातावरणाचा अंदाज घेत गर्दीत मिसळून गेलो.&lt;br /&gt;काही मुलांनी मला विचारले पण मी साफ इन्कार केला. त्यांना मी आता स्वयंसेवक म्हणून काम करणे बंद केल्याचे सांगितले. तरीही आत कोठेतरी भितीही वाटत होती. सरांना माहीत झाल्यास सर रागावतील असे वाटत होते.&lt;br /&gt;आश्चर्य म्हणजे दुपारनंतर ग्राउंडवर एकही स्वयंसेवक हजर नव्हता. सर्व कामे खेळाडू व प्रेक्षक मिळून मिसळून खेळीमेळीने स्वत:च्या स्वत: करत होते. स्वयंसेवक हजर नाहीत ही गोष्ट सरांच्या ध्यानात येउनही सरांनी तिकडे दुर्लक्षच केले.&lt;br /&gt;पूढचे अडीच दिवस नेमून दिलेल्या एकाही स्वयंसेवकाशिवाय सर्व खेळ अगदी सुव्यवस्थितपणे नियोजनबध्दपणे पार पडले.&lt;br /&gt;मला बेडकीला दगड मारुन खेळणा-या मुलांची आठवन झाली. त्यादिवशी ती मुलें बेडकीला दगड मारण्याचा खेळ सोडून मलाच दगड मारत आहेत असं मला वाटत होतं.&lt;br /&gt;या गोष्टीला आता पंधरा सोळा वर्षे झाली तरीही मी कधी कधी यावर खुप विचार करतो की या सर्वातून काय साध्य झाले?&lt;br /&gt;पुढे कितीतरी दिवस मला ते प्रसंग मनाला टोचत होते. मनातील घृणा कमी होत नव्हती. त्यानंतर इतर कारणांसाठी शाळेत झालेले माझ्या सत्काराचे प्रसंगही आले पण त्याप्रसंगातही माझे हातपाय लटलट कापत असत.&lt;br /&gt;स्वयंसेवक काय किंवा सरळमार्गी माणूस काय तो खुपदा चेष्टेचाच विषय असतो. त्यामूळे आपण सरळमार्गी राहणे ही आपली चॉइस असावी, असं मला वाटतं.&lt;br /&gt;कांही शिक्षकांच्याकडून अजानतेपणी झालेल्या अविचारी वर्तनामुळे किंवा अदुरद्रुष्टीमुळे संवेदनशील मुले नाउमेद होतात.&lt;br /&gt;आज मनात कुणाविषयी राग द्वेष उरला नसला तरी हा प्रसंग कांही केल्या विसरता येत नाही&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-5203279420488476966?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/5203279420488476966/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/11/blog-post_13.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/5203279420488476966'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/5203279420488476966'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/11/blog-post_13.html' title='३६. शाळेतला एक प्रसंग'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-3743949108003862415</id><published>2010-11-03T16:11:00.003+05:30</published><updated>2011-09-28T16:50:25.341+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गुंडबा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चड्डी'/><title type='text'>३५. मला भेटलेली माणसं - भाग-५ - गुंडबा</title><content type='html'>कांही लोकांना आतला कप्पाच नसतो. म्हणजे एखादी गोष्ट कितीही खाजगी असो, गुप्त असो त्यांच्या मनात लपून राहू शकत नाही. आपला फायदा होवूदे की नुकसान या लोकांना आपल्या मनातला कोणताही विचार लपवून ठेवता येत नाही. आपल्याला लोक हसतील किंवा नावे ठेवतील याची या लोकांना तमा नसते. आपल्या जीवनात जे कांही घडले ते दुस-याला सांगितल्याशिवाय या लोकांना चैनच पडत नाही. अशा लोकांचे जीवन म्हणजे एखादे खुले पुस्तकच, कोणीही या आणि वाचा.&lt;br /&gt;अशाप्रकारचे जीवन जगण्य़ासाठी तेवढेच मोठ्ठे मन असावे लागते. देवाने या लोकांनाही ’देढ हात कलीजा’ दिलेला असला पाहीजे, त्याशिवाय अशाप्रकारचे आपल्याबाबतीत घडलेले प्रसंग ही लोकं जणू दुस-याचे असल्यासारखे सांगू शकली नसती.&lt;br /&gt;त्या लोकांपैकीच एक नाव म्हणजे गुंडबा.&lt;br /&gt;गुंडबाचे पुर्ण नाव गुंडोपंत असे असले तरी गावाच्या रितीप्रमाणे ते गुंडबा असे झाले आहे.&lt;br /&gt;हा प्रसंग खुप वर्षापुर्वी घडला असून जवळजवळ सर्व गावाला हा माहीत आहे. पहिल्यांदा तो कसा, कोणी आणि कोणाला सांगितला हे माहीत नाही पण आज तो सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे&lt;br /&gt;दिवस उन्हाळ्याचे होते. गुंडबाचे लग्न होऊन आता दहा-बारा वर्षे होत आली होती. गुंडबाच्या घरी लहान थोर अशी जवळ-जवळ वीसएक मानूस होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी गुंडबाला घरात खाली झोपण्यासाठी जागाच उरत नसे. तो घरातच पोटमाळ्यावर झोपत असे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्याच्या अंगावर चड्डीशिवाय दुसरा कपडा नव्हता. उकाड्याने हैरान झाल्याने त्याला झोप येत नव्हती. त्यातच त्याला खालच्या खोलीत झोपलेल्या आपल्या बायकोची आठवण झाली. त्याला उकाडा आणि बायकोचा विरह अनावर होऊ लागला. त्याने खाली जावून आपल्या बायकोला हळूच जागे करून वरती घेऊन यावे किंवा जमलेच तर तिथेच कार्यक्रम आवरुन यावे असा विचार केला.&lt;br /&gt;मागच्यावेळेसारखं खाली गेल्यावर काढलेली चड्डीची नाडी शोधायला वेळ लागू नये म्हणून त्याने वरच ती काढून ठेवली आणि नागव्यानेच तो शिडीवरुन उतरु लागला.&lt;br /&gt;त्याच्या हालचालीने गोठ्यातील जनावरे उठून उभी राहीली आणि त्या आवाजाने गुंडबाची म्हातारी जागी झाली. म्हातारीला पहिल्यांदा बोका किंवा मांजर आले असे वाटले. तिने हुश हुश शू शू असे करुन पाहीले तिच्या आवाजामुळे आणखी कुणाकुणाला जाग आली.&lt;br /&gt;अंगावर एकही कपडा नसलेल्या गुंडबाला धोक्याची जाणिव झाली तसे त्याने सगळ्यांना मोठ्या आवाजात दम भरला ," लाईट लावायचे काम नाही, मी जनावरांना वैरण टाकायला उठलोय, कोण लाईट लावेल त्याच्या ..... " त्याच्या या धमकावण्यामुळे कोणी लाईट लावण्य़ाच्या भानगडीत पडले नाही. अशाप्रकारे अंगावर आलेला बाका प्रसंग त्याने कसातरी टाळला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरंतर हा प्रसंग दुस-या कुणाला माहीत व्हायची शक्यताच नव्हती पण मग गुंडबा तो कसला?&lt;br /&gt;&lt;br /&gt;असाच तो एकदा गोव्याला गेला होता, फिरायला.&lt;br /&gt;बदलीसाठी अंडरवेअर न्यायला विसरल्यामुळे, त्याला अंडरवेअर खरेदी करायची होती. बाकीच्यांना सोडून एकटाच खरेदीला बाहेर पडला. शोधता शोधता त्याला एके ठिकाणी स्टॉलवर खुपशा वेगवेगळ्य़ा डिझाइनमधल्या अंडरवेअर ठेवलेल्या दिसल्या. त्याला आनंद झाला. तो त्या दुकानदाराला म्हणाला," एक चड्डी द्या. "&lt;br /&gt;" बोला मामा, कसली देऊ"&lt;br /&gt;गुंडबाला त्या नाडीच्या चड्डीचा कंटाळा आला होता त्यामुळे त्याला नवीन प्रकारची चड्डी हवी होती पण त्याप्रकारच्या चड्डीला नेमके काय म्हणावे हे त्याला माहीत नव्हते.&lt;br /&gt;" ती मधनं बाहेर येते बघा ती दाखवा"&lt;br /&gt;त्या दुकानदाराने हसून त्याला त्याप्रकारची चड्डी दाखविली. एक पसंत पडल्यावर तो दरासाठी घासाघिस करु लागला.&lt;br /&gt;" ते नव्हं, ही चड्डी टिकावू हाय नव्हं? आम्ही काय कवा असली वापरल्याली नाही तवा ... "&lt;br /&gt;" बिनधास्त वापरा की मामा, अजिबात फाटनार नाही."&lt;br /&gt;" पर एवढी महाग हाय त्यामानानं टिकल तरी का?"&lt;br /&gt;गुंडबाचे तुणतुणे सुरुच होते.&lt;br /&gt;आता तिथे गर्दी सुरु झाली होती. त्या दुकानदाराने चड्डी हाताने ओढून तानवून दाखविली तरी गुंडबाचे धाडस होईना.&lt;br /&gt;" म्हणजे अंगात घातल्यावर टिकल नव्हं?"&lt;br /&gt;" मामा, चड्डीची गॅरंटी मी देतो. ही चड्डी घालून घालून एकवेळ तुमची .... फाटेल पण चड्डी फाटणार नाही, मग तर झालं."&lt;br /&gt;त्यावर गुंडबाने ती चड्डी निम्म्या किमतीत खरेदी केली आणि उड्या मारत परत येऊन घडलेला प्रसंग सर्वांना सांगितला अगदी शेवटच्या ’गॅरंटी स्लोगन’सह.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गुंडबाची शेती आहे त्यात ऊस होता. कारखान्याने आपला ऊस लवकर तोडून न्यावा म्हणून गुंडबाने ऊसाला आग लावायचे ठरवले.&lt;br /&gt;एकेदिवशी भल्या पहाटे जावून त्या ऊसाच्या चारी बाजूने रॉकेल डिझेल ओतले आणि पेटवून दिले. ऊस लवकर पेटावा म्हणून एका बाजूने पेटवून न थांबता दुस-या बाजूनेही पेटवून दिले. असं करता करता ऊसाला सगळ्याच बाजूनी आग लागली गुंडबा मध्येच राहीला. सगळीकडे आग लागलेली पाहून आतल्या आत सैरावैरा धावत सुटला. त्याला बाहेर पडायला जागाच नव्हती. शेवटी त्याने विहीरीत उडी टाकली आणि पाण्यातच पडून राहीला.&lt;br /&gt;नंतर लोकं त्याला शोधत होती तर हा विहीरीच्या पाण्यात. पाण्यात राहूनच त्यानं घडलेली गम्मत लोकांना सांगितली. बाहेर ये म्हटल्यावर यायला तयार नाही. त्याच्या अंगावर कपडेच शिल्लक नव्हती. आग जवळ येईल तशी त्याने एक एक अंगवस्त्र आगित दान केले होते. शेवटी कुणीतरी टॉवेल दिला आणि तो टॉवेल लावूनच तो बाहेर आला.&lt;br /&gt;असा हा गुंडबा आजही तसाच नवनवीन गमती जमती करतो आणि त्या लोकांनाही सांगतो अगदी इमानदारीने.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-3743949108003862415?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/3743949108003862415/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/11/blog-post.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3743949108003862415'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3743949108003862415'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/11/blog-post.html' title='३५. मला भेटलेली माणसं - भाग-५ - गुंडबा'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-7379385543438118977</id><published>2010-11-02T17:29:00.000+05:30</published><updated>2011-09-28T16:49:53.882+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='जाहीरात'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गण्या'/><title type='text'>३४. मला भेटलेली माणसं - भाग-४ - गण्या</title><content type='html'>"आमचं गण्या sss शानं, म्हंणतयं.." अशी सुरवात केल्याबरोबर आपल्याला प्रा. कोष्टींची आठवण होईल.&lt;br /&gt;पण आमच्या गल्लीत पण एक गण्या राहतो आणि तो प्रा. कोष्टींच्या गण्याचा साढ्भाउ शोभेल असाच आहे.&lt;br /&gt;त्याच्या नाना करामतीमूळे तो जिथे असेल तिथे त्याचंच राज्य असतं. जमलेले लोक आपलंच बोलणं ऐकायला आले आहेत असा त्याचा गोड गैरसमज झालेला होता. त्यामूळे गण्य़ा हजर असला की गप्पांचा फड उभा राहत असे. &lt;br /&gt;ही गोष्ट जरा जूनी, काही वर्षापूर्वीची आहे. पूर्वी म्हणजे कोल्हापूर एफएम रेडीओ सूरू होण्यापूर्वी आमच्याकडे सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकले जात होते तेंव्हाची.&lt;br /&gt;सांगली आकाशवाणीवर काही ठरावीकच जाहीराती लागत असत. पैकी "मगदूम चहा"ची जाहीरात जरा वेगळीच होती. त्यावेळी आम्हाला जाहीरातीसुध्दा ऐकायला आवडत होत्या. पण "मगदूम चहा"ची जाहीरात अजून लक्षात राहीली त्याला कारण म्हणजे आमचं गण्या.&lt;br /&gt;तर आमचं हे गण्या रेडिओला लागलेली सगळी गाणी त्या गायकासोबतच अगदी तालासूरात म्हणायचं. गायकपण ह्योच गायीकापण ह्योच आणि म्युझीक पण ह्योच द्यायचा. तोंडाने पिटिक-पिटिक , झुम-चाक-झुम असं ह्याच म्युझिक. गण्याला सगळी गाणी तोंडपाठ आणि सगळ्या जाहीरातीपण.&lt;br /&gt;गण्याला ही "मगदूम चहा"ची जाहीरात खुपच आवडली होती. साधारणपणे पूढील प्रमाणे ती आम्ही ऐकत असू.&lt;br /&gt;"सखू, च्या टाक पावण्यास्नी" एक प्रौढ पूरुषाचा जाडाभरडा आवाज.&lt;br /&gt;" जी" - सखूचा नम्र आवाज&lt;br /&gt;"नगं" दूसरा एक प्रौढ पूरुषाचा आवाज&lt;br /&gt;"अहो सुवासनीनं कुक्कवाला आणि मर्दानं चहाला नगं म्हणू नये!"&lt;br /&gt;" पण, आम्ही नेहमी मगदूमचा कडक चहाचं पितो?"&lt;br /&gt;" आणि आम्ही काय उन पाणी पितो काय? आमीबी आमच्या आबाआज्यापासून मगदूमचा कडक चहाचं पितो!"&lt;br /&gt;" मग, होवून जाउदे, डब्बल"&lt;br /&gt;तर अशी ही जाहीरात गण्यानं आम्हाला शेकडोवेळा ऐकवीली असेल.&lt;br /&gt;एवढ्यानं थांबेल तो गण्या कसला? काही दिवसांनी त्यानं या जाहीरातीची एकापाठोपाठ दोन विडंबन तयार करून ऐकवीली. ती अशी.&lt;br /&gt;"सखू, च्यात टाक पावण्यास्नी" एक प्रौढ पूरुषाचा जाडाभरडा आवाज.&lt;br /&gt;" जी" - सखूचा नम्र आवाज&lt;br /&gt;"नगं" दूसरा एक प्रौढ पूरुषाचा आवाज&lt;br /&gt;"अहो सुवासनीनं न्हायाला आणि मर्दानं पवायला नगं म्हणू नये!"&lt;br /&gt;(न्हायाला- नहायला म्हणजे अंघोळ करायला आणि पवायला म्हणजे पोहण्याला)&lt;br /&gt;" पण आम्हाला पोहायला येत नाही?"&lt;br /&gt;असं म्हणत म्हणतच गण्या समोरच्या माणसाकडे हात पुढे करुन टाळी मागायचा व ती त्याला हमकास मिळायची. मग गण्या यापाठोपाठ त्याची दूसरी जाहीरातही ऐकवायचा.&lt;br /&gt;"सखू, आत घे पावण्यास्नी" एक प्रौढ पूरुषाचा जाडाभरडा आवाज.&lt;br /&gt;" जी" - सखूचा नम्र आवाज&lt;br /&gt;"नगं" दूसरा एक प्रौढ पूरुषाचा आवाज&lt;br /&gt;"अहो ----- नं पावण्याला आणि मर्दानं -----ला नगं म्हणू नये!"* (* समजून घ्या)&lt;br /&gt;" पण, आम्ही नेहमी डिलक्सचा निरोध वापरतो?"&lt;br /&gt;"आणि आम्ही काय फाटके फूगे वापरतो काय? आमीबी आमच्या आबाआज्यापासून डिलक्सचाच निरोधचं वापरतो!"&lt;br /&gt;" मग, होवून जाउदे, डब्बल"&lt;br /&gt;-----&lt;br /&gt;मग आहे की नाही आमचं गण्या इरसाल? मगदूम चहावाल्यांनी किंवा डिलक्सवाल्यांनी ही जाहीरात ऐकली नाही म्हणजे बरं.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-7379385543438118977?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/7379385543438118977/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/04/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/7379385543438118977'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/7379385543438118977'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/04/blog-post.html' title='३४. मला भेटलेली माणसं - भाग-४ - गण्या'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-3276952335131629226</id><published>2010-10-31T13:57:00.006+05:30</published><updated>2011-09-28T16:49:44.081+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मटकावाला'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गोकूळ पंडीत'/><title type='text'>३३. मला भेटलेली माणसं - भाग-३-गोकुळ पंडीत</title><content type='html'>त्यादिवशी बसमध्ये जेमतेम गर्दी होती.&lt;br /&gt;त्याने उठून त्याबाईला जागा दिली आणि तिथेच बाकाला रेलून उभा राहीला.&lt;br /&gt;त्याची ही नेहमीची स्टाईल होती. खरंतर तो कागलमध्ये म्हणजे अगदी पहिल्या स्टॉपवर नेहमी ठरावीक जागा हेरून बसत असे. त्यानंतर अगदी दुस-या किंवा तिस-या स्टॉपवर जरी कोण बाई चढली तरी तो उठून लगेच आपली जागा द्यायचा आणि तिथेच बाकाला रेलून उभा रहायचा. नंतर जागा झाली की शेजारी बसायचा. त्यानेच जागा दिलेली असल्यामूळे ती स्त्री अगोदरच त्याच्या उपकाराखाली असते त्यामूळे ती त्याला "नीट उभा रहा" असं फणका-याने म्हणत नाही. मग तोही त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेत मिळेल तसा ’चान्स’ घ्यायचा.&lt;br /&gt;लवकरच ही गोष्ट माझ्या लक्षात आली. त्याचा हा नेहमीचाच उद्योग असल्यामूळे तो कधीतरी बसमधल्या लोकांचा मार खाणार हा अंदाज मी बांधून होतो. त्यादिवशी मीही लोकांच्यात सामील होऊन त्याला मारावे काय? असा विचार माझ्या मनात येऊन गेला. पण दुस-या क्षणी माझ्या लक्षात आले की साधारण सहा फूट तीन इंच उंच आणि एकशे दहा ते पंधरा किलो वजनाच्या या पोत्याला बसमधल्या सगळ्या लोकांनी मिळून एकदम जरी मारले तरी त्याच्यावर काय परीणाम होणार नव्हता.&lt;br /&gt;एक दिवस तो बसमध्ये लवकर येऊन बसला होता. मी त्याच्या जवळ जाऊन बसलो. तो उठून दुसरीकडे बसला. नंतर एक मुलगी बसमध्ये चढली, मी तिला माझी जागा दिली आणि मी त्याच्या जवळ जाऊन बसलो. त्याला हे थोडे खटकले पण तो याबाबतीत काय करु शकत नव्हता. त्यादिवशी त्याच्याकडे पाहिल्यावर मला काजोलच्या दुश्मन चित्रपटातला गोकूळ पंडित हा पोष्ट्मन आठवला.&lt;br /&gt;एके दिवशी सकाळी आमची नेहमीची बस कागलमध्ये नटून-थटून उभी होती. बसला फूलांच्या माळा लावलेल्या होत्या, आतमध्ये रंगी-बेरंगी कागदी झिरमुळ्या लावलेल्या होत्या, सुंदर-सुंदर चित्रे लावलेली होती. बसमध्ये नविन म्युझिक सिस्टीमही बसवलेली होती. मी कंडक्टरला विचारले तर तो म्हणाला, "आज ही १८८२ क्रमांकाची बस कागलला सुरु होऊन एक वर्ष झाले म्हणे."&lt;br /&gt;" मग, हे डेकोरेशन कोणी केले आणि ती सिस्टिम कुणी बसविली?"&lt;br /&gt;" हे सगळं मनोजचं काम."&lt;br /&gt;" कोण मनोज ?"&lt;br /&gt;" तो नाही का तो जाड्याला नेहमी याच बसमध्ये असतो की तो..."&lt;br /&gt;माझ्या लक्षात आलं की त्याचंच नाव मनोज. माझ्या मनातली त्याच्याबद्दलची उत्सूकता वाढली.&lt;br /&gt;थोड्यावेळाने ड्रायव्हरबरोबर चहा घेऊन तो आला. मी त्याला विचारले," काय मनोज आज काय खुष आहेस वाटतं? कुठं जोराचा मटका लागला काय?"&lt;br /&gt;तो जरा बावरला, म्हणाला," नाही, नाही, आपली एक इच्छा होती ती पुर्ण केली. आपण नेहमी या बसने प्रवास करतो, ऐकायला गाणी आणि सजवलेली गाडी असली की कसं बरं वाटतं."&lt;br /&gt;या निमित्तानं मी त्याच्याशी ओळख करुन घेतली. त्यादिवशी तो स्वत: माझ्याजवळ बसला. मी त्याला काय करतोस असे विचारले तर म्हणाला की मी उद्यमनगरात स्पेअरपार्टच्या दुकानात नोकरीला आहे. त्याच्याजवळ नेहमी ’मुंबई चौफेर’ किंवा ’पुण्यनगरी’ असले पेपर असत त्याचे कारण विचारले तर म्हणाला टाईमपासला शब्दकोडे सोडवतो. मी पाहीले तर एवढ्या सकाळीही त्याच्यातले कोडे पुर्ण सोडवलेले होते. माझ्यामूळे तो आता माझ्या इतर मित्रांच्यात मिसळू लागला. दररोज गप्पा-टप्पा, थट्टा-मस्करी सुरु झाली. तो सर्वात अगोदर येत असल्याने सगळ्यांच्यासाठी जागा धरुन ठेवत असे. यामध्ये पुढे पुढे बसमधल्या नेहमीच्या मुली व स्त्रीया ही सामील झाल्या. आता मनोजने बसमधला त्याचा नेहमीचा उद्योग पुर्णपणे सोडला होता. कधी कधी मी त्याला पुर्वीच्या त्याच्या उद्योगाबद्दल छेडत असे तेव्हा हसत हसत तो विषय टाळत असे.&lt;br /&gt; &lt;br /&gt;मी ती बस बदलली व दुस-या मार्गावरच्या बसने प्रवास करू लागलो. कांही दिवसांच्या अंतराने तो पुन्हा मला दुस-या बसमध्ये भेटू लागला. मी त्याला विचारले तर म्हणाला, "मी ती नोकरी सोडली, मी आता वीजबीले वाटायचं काम करतो."&lt;br /&gt;" मग हा उद्योग तूला आवडला असेल. बिले द्यायला दुपारच्या वेळीच जात असशील."&lt;br /&gt;" होय, त्यावेळी घरी बहूदा बायाच असतात. खुप ठीकाणी चहा प्यायला लागतो राव!"&lt;br /&gt;" आणि तू नाही म्हणतच नसशील"&lt;br /&gt;" नाही कसं म्हणायचं, एवढा आग्रह करत्यात म्हटल्यावर ..."&lt;br /&gt;मी त्याच्याविषय़ी विचार करू लागलो.&lt;br /&gt;एक दिवस त्याने माझी ओळख एका ठिकठाक दिसणा-या महिलेची ओळख करुन दिली. ही डॉक्टरांकडे नर्स म्हणून काम करते एवढेच सांगितले आणि मी त्याचा मित्र आहे आणि मोठ्या ऑफिसात साहेब आहेत अशी माझी ओळख सांगितली. या प्रसंगात मी अवघडून गेलो होतो.&lt;br /&gt;नंतर मी त्याच्याबरोबर सविस्तर बोललो तेव्हा समजले की ती सध्या एकटीच राहते आणि तिलाही कोणीतरी आपले असावे असे वाटते. हा आठवड्यातून एक-दोन वेळा तिच्या रूमवर जातो. जाताना मटन, स्वत:साठी एक तुंब्या व तिच्यासाठी गजरा न्यायला विसरत नाही. कधी एकत्र सिनेमाला जातात तर कधी बाजारात फिरून येतात. सध्या तो खुप खुष दिसत होता आणि नेहमीपेक्षा नीटनेटका पण रहात होता. मी त्याला म्हटले की तू तिथे एकटाच असतोस ना? तर म्हणाला," मी असताना तर तिथं दुसरं कोणी नसलं म्हणजे झालं. स्वत:च्या बायकोबद्दल तर कुठं खात्रीने सांगता येतं?" असं म्हणून तो हसू लागला.&lt;br /&gt;त्यानंतर त्याची माझी भेट ब-याच कालावधीनंतर झाली. मधल्या काळात ती नर्सबाई बसमध्ये दिसली होती मी ओळख दाखवायचे टाळले तरी तिने भावोजी म्हणून हाक मारलीच. मी तिला बसायला जागा दिली आणि पुढे जावून बसलो.&lt;br /&gt;त्याला मी तिच्याबद्दल विचारले तेव्हा तो एकदम चिंताग्रस्त झाला. म्हणाला," साहेब, वीस-बावीस हजार रुपये खर्च केले पण तीचा रोग हटत नाही. कसला रोग झालाय कुणाला माहीत. तिला मटण खाऊ नको असं डॉक्टरांनी सांगितले आहे, त्यामूळे मीही मटन सोडले आहे. आता मी तिच्या घरी जात नाही, आम्ही फक्त सिनेमाला जातॊ आणि बाजार करतो. परवा दिवाळीला नवी साडी घेऊन दिली."&lt;br /&gt;मी त्याला असं भावविवश होताना पहिल्यांदाच पाहीलं होतं.&lt;br /&gt;मी त्याला विचारले," तुमच्या घरी कोण कोण असतं?"&lt;br /&gt;"साहेब, बाकीच्यांना सांगू नका, खुप दिवसांनी मी कुणाला तरी हे सांगत आहे, मी अनाथ आहे, पडेल ती कामं करुन मोठा झालो अंदाजानेच लिहायला वाचायला शिकलो आणि मी कुठली नोकरीही करत नाही, मटका गोळा करतो. लहान असल्यापासून जवळचं असं कोण नव्हतंच साहेब. मग कुठलं लग्न आणि कुठली बायको. बसमध्ये असलो की घरी असल्यासारखं वाटतं तुम्ही सगळेजण भेटत होता माझे दिवस कसे झपाट्याने जात होते. कधी दुसरा दिवस उजडेल आणि कधी तुम्ही भेटता असं होईल. त्यातूनच जयाची ओळख झाली आतातरी जगण्याचे काहीतरी निमित्त सापडेल असं वाटलं होतं पण . . . जाऊ दे." त्यानं एक लांब उसासा टाकला.&lt;br /&gt;थोड्यावेळाने म्हणाला," मग साहेब, तुमचे कसं? घरी कोण कोण असतं?"&lt;br /&gt;" तू आमच्या घरीच ये एक दिवस"&lt;br /&gt;मी त्याला माझ्या घरी येण्यासाठी पत्ता दिला. त्याचे डोळे भरुन आले.&lt;br /&gt;तो येतो येतो म्हणाला पण आजपर्यंत आला नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-3276952335131629226?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/3276952335131629226/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/10/blog-post_31.html#comment-form' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3276952335131629226'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3276952335131629226'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/10/blog-post_31.html' title='३३. मला भेटलेली माणसं - भाग-३-गोकुळ पंडीत'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-5946880982690004361</id><published>2010-10-29T15:48:00.002+05:30</published><updated>2011-09-28T16:49:31.620+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दादा कोंडके'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निरागस'/><title type='text'>३२. मला भेटलेली माणसं - भाग-२ - पकादादा</title><content type='html'>पकादा ही एक अजब वल्ली आहे.&lt;br /&gt;त्याचे नाव प्रकाश असं असले तरी त्याला आम्ही पकादा असंच म्हणतो.&lt;br /&gt;एखाद्याच्या नावाला दादा लागण्यामागे त्या व्यक्तीचे लहानांच्यात वावरणे कारणीभूत असावे.&lt;br /&gt;हे लोक आपल्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांशी जरा फटकूनच असतात. त्यामानाने लहानांच्यात जास्त रमतात. लहान मुले त्यांना दादा, काका असे संबोधन जोडतात आणि तेच त्यांच्या नावाला चिकटून राहते. (स्वत:ला दादा, बापू म्हणवून घेणा-यांचे हे गुपित असते. लहान असल्यापासूनच ही लोकं आपल्यापेक्षा लहानांच्यात वावरतात म्हणजे मग ते दादा वगैरे होतात. नाहीतर मग मोठ्या मुलांत वावरले की मग चिंट्या, पिंट्या इत्यादी नावे चिकटतात.)&lt;br /&gt;पण पकादाचे लहानांच्यात वावरणे हे त्याचे निरागसपण आहे. मोठी लोकं त्याची चेष्टा करतात त्याची टर उडवतात त्यामुळे तो त्यांच्या नादाला जास्त लागत नाही.&lt;br /&gt;वडील आर्मीतून रिटायर होऊन आले आणि पकादाचे लग्न झाले. लग्नानंतर पोटापाण्य़ासाठी पकादाने अनेकप्रकारचे उद्योग केले. कधी एम.आय.डी.सी. ला जाऊन कारखान्यात नोकरी केली तर कधी वॉचमन म्हणून कुठेतरी उभा राहीला. कधी कुठल्या रंगा-याच्या हाताखाली इमारती रंगवायचे काम केले तर कधी गवंड्याच्या हाताखाली दगडे उचलली. काम कोणतेही असो ते नेकीने करणे हाच त्याचा गुण आणि कामातल्या खाचाखोची माहीत नसणे ही त्याच्यातली उणीव. ज्यांच्याकडे त्याने काम केले त्या सर्वांनी त्याला कसे कसे फसवले ते फक्त त्याच्या तोंडूनच ऐकावे. ते ऐकताना आपल्याला वाटेल की हा कुणा दुस-या पकाचीच गोष्ट सांगतो आहे इतकी त्रयस्तता. दहा ठिकाणी फसला तरी आत्ताच्या ठिकाणी मी कसा सुखी आहे, काम कसे सोपे आहे, मालक किंवा साहेब कसे चांगले आहेत हेच तो भेटलेल्याला सांगतो. एवढेच नाही तर आपण जास्तीचा पगार कसा मिळवतो याची गुपिते तो हळू आवाजात सांगतो. पण हाय ! काही दिवसांनी पुन्हा ’येरे माझ्या मागल्या’, त्याच मालकाने मला कसे फसविले ते त्याच्या तोंडून ऐकावे लागते.&lt;br /&gt;पकादाने एकदा आमच्या शाळेजवळ पानटपरी सुरु केली होती. तिथे पकादाने दुकान उघडणेची व बंद होण्याची वेळ तसेच जेवण्याच्या सुट्टीची वेळ आपल्या ग्राहकांच्या सोईसाठी लिहून ठेवली होती. ती अशी - उघडणेची वेळ सकाळी ११.०० वा. जेवणाची सुट्टी- दु. १ ते ३.३० व बंद करणेची वेळ साय़ं. ५.१० वा. या वेळा निवडण्यामागचे त्याचे लॉजिक एवढेच की शाळेचे टायमिंग व आपले टायमिंग एकच असावे. शाळा भरली की दुकान सुरु, शाळा सुटली की दुकान बंद. आता तुम्हीच विचार करा मुले वर्गात गेली दुकान सुरु. शाळा सुटली की दुकान बंद मग ते चालणार कसे? पण याचे पकादाला काही नाही, ’नियम म्हणजे नियम’. दुकान म्हणजे एक ड्यूटीच होती मग त्याला काळवेळ पाहीजेच की- असं त्याचें म्हणणं.&lt;br /&gt;बरे कोणी गुटखा उदार मागीतला की तो लिहिलेली पाटी दाखवत असे "आज रोख, उद्या उदार" आणि वर त्या गि-हायिकाला सांगत असे ’दोस्ती हमसे करो धंदेसे नही’. गुटखा खाणार हे घे असं म्हणून आपणच एक पूडी सोडून त्याला अर्धी व आपण अर्धी खात असे, पण उधार नाही म्हणजे नाही. भले मग तो मनुष्य दिवसातून पाचसहा वेळा का येईना. गुटखा खाऊन जा पण उधार मिळणार नाही. दिवसाच्या एकूण खपातला निम्मी पानं, तंबाखू, गुटखा याच मार्गाने जात होता. हा बिझीनेस त्याला फार मानवला नाही. लवकरच त्याला आपले दुकान गुंडळावे लागले.&lt;br /&gt;एकदा हा एम.आय. डी. सी. तून रात्री वेळाने घरी येत होता. रात्रीच्या वेळी गावाकडे जाण्यासाठी वाहणे कमीच असतात त्यामुळे तो कागलच्या नाक्यावर वाट पहात थांबला होता. एक बाचणीला जाणारा टू-व्हीलरवाला आला आणि त्याने पकादाला लिफ्ट दिली. थोड्यावेळाने पकादाच्या लक्षात आले की गाडी रस्त्यावरून इकडे तिकडे झोले खात जात आहे आणि पुढच्या मानसाने थोडीशी लावलेली आहे. त्यातच निम्मे अंतर पार झाल्यावर गाडीचे मागचे चाक पंक्चर असल्याचे कळले. मग काय पकादाने तिथून ती गाडी ढकलत ढकलत गावात आणली. रात्री १ ते १.३० च्या दरम्यान दादू कुंभाराला उठवून ते पंक्चर काढायला लावले त्याचे पैसे त्यानेच भागविले हे वेगळे सांगायला नकॊ. त्यामानसाला जेवणाविषयी विचारले आणि मगच त्याला मार्गस्थ केले. बरे पकादाला गाडीही चालविता येत नाही. पण आपल्यासाठी गाडी थांबविणा-यासाठी एवढेतरी करणे हे त्याला आपले कर्तव्यच वाटले.&lt;br /&gt;पकादाला सिनेमाची खुप आवड आहे आणि त्याचा आवडता नट आहे एक- मिथून चक्रवर्ती आणि नंबर दोन - दादा कोंडके. त्याला या दोघांचे चित्रपट व त्याचे डॉयलागही पाठ आहेत. पकादा या दोघांची मिमिक्री खुप चांगली करतो. "ज्याच्याजवळ आय (आई) हाय, त्याच्याजवळ सगळ हाय" हा दादा कोंडकेंचा डॉयलाग त्याचा फेवरीट आहे. गणपतीच्या स्टेजवर तो बेफाम नाचतो, कधी मिथून बनून डिस्को डान्स करतो तर कधी उषा नाईक बनून लावणीवर नाचतो.&lt;br /&gt;पकादासारख्या लोकांना हे दादा कोंडके किंवा मिथून चक्रवर्ती टाईपचेच चित्रपट आवडतात. कारण त्यातला नायक हा त्यांच्यासारखाच एकवचनी, खरे बोलणारा, सरळमार्गी असतो. जसे दादा कोंडकेचे पात्र हे स्वत:ला सेल्फ कॉन्फिडंट समजत असते, इतरांची खिल्ली उडवत असते पण आपल्याला त्याचा बावळटपणा प्रत्तेक ठिकाणी दिसून येतो. त्याचप्रकारे हे लोकही स्वत:ला चालू समजत असतात पण त्यांना सर्वजन फसवत असतात. त्यांनी स्वत:ला चालू समजणे किंवा तसे दाखविन्याचा प्रयत्न करणे हेच त्यांच्या निरागसतेचे प्रतिक आहे. कारण खरा चालू मनुष्य कधीही स्वत:ला चालू म्हणवून घेत नाही व तसे दाखवतही नाही.&lt;br /&gt;असे जरी असले तरीही ज्याप्रकारे या चित्रपटातला हिरो त्याच्या चांगुलपणामुळे, बावळटपणामुळे तर कधी धांदरटपणामुळे सर्व संकटांवर मात करतो किंवा त्याच्यावरील सर्व संकटे आपोआप दूर होतात त्याचप्रकारे पकादासारख्या लोकांचे जीवन अनंत अडचणीतूनही पुढे पुढे सरकत असते. पकादाला दोन मुले आहेत व ती आता कर्ती-सवरती झाली आहेत. पण पकादा तोच आहे हसत हसत बोलनारा, आपल्या गप्पांनी वातावरण नेहमी ताजे ठेवणारा, नेहमी स्वत:कडे लहानपण घेणारा अगदी तस्साच. आंधळ्याच्या गाई देव राखी असं म्हणतात ते कांही खोटं नाही&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-5946880982690004361?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/5946880982690004361/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/10/blog-post_29.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/5946880982690004361'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/5946880982690004361'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/10/blog-post_29.html' title='३२. मला भेटलेली माणसं - भाग-२ - पकादादा'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-878927207617059772</id><published>2010-10-27T16:02:00.002+05:30</published><updated>2011-09-28T16:49:19.001+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चोर'/><title type='text'>३१. मला भेटलेली माणसं - भाग-१ - चोर</title><content type='html'>के.एम.टीच्या बसमध्ये तो चढला आणि माझ्या नजरेत लगेचच भरला.&lt;br /&gt;खलीसारखा राकट चेहरा, कानावर घनदाट केस, डोक्यावरचेही केस घनदाट आणि तितकेच जाडजूड, हात हातोड्यासारखे असा तो आत येताच गर्दीतही लोकांनी त्याला वाट दिली पण तो सगळ्यांना ढकलीत ढकलीतच मागच्यादाराने चढला आणि पुढच्या दारापर्यंत गेला. काहीवेळ चूळबूळ करुन पुढच्याच स्टॉपवर उतरून गर्दीत नाहीसा झाला.&lt;br /&gt;काही दिवसानंतर मी त्याला विसरण्याच्या जवळपास होतो तोपर्यंत तो पुन्हा मला दिसला. त्यादिवशीही त्याने तोच पट्यापट्याचा लाल ढगळ शर्ट घ्यातला होता. चढताना तो गर्दित तसाच मागच्यासारखा चढला पण आज त्यादिवशीइतकी गर्दी नव्हती. सर्वात पुढच्या सीटवर एक आजीबाई बसल्या होत्या जवळच्या सीटवर त्यांची बास्केट होती. ती बास्केट उचलून त्याने आजीबाईच्या हातात दिली आणि तो तेथे बसला. पण त्याच्याकडे पाहिल्यावर त्याला कुणीतरी जुलुमाने बसविले आहे किंवा त्याच्या नको त्याठिकाणी बेंड आले आहे असेच वाटले असते. जेव्हा आजीबाई उतरू लागल्या तेव्हा तोही पाठोपाठ उतरला. बसल्यानंतर तो आजीबाईंकडे पाहत स्वत:शीच बोलल्यासारखा कांहीतरी बडबड करत होता त्यावरुन तो विक्षिप्त असावा असे मला वाटले.&lt;br /&gt;नेहमी त्याच त्या मार्गावरुन प्रवास केल्यामुळे बसचे कंडक्टरलोक मला ओळखत होते. मी कंडक्टरला त्याच्याबद्दल विचारले तेव्हा मला शॉकच बसला. कंडक्टर म्हणाला तुम्हाला म्हणून सांगतो साहेब तो एक सराईत खिसेकापू आहे. त्याचे फोटो सगळ्या पोलीसस्टेशनमध्ये आहेत. मी कंडक्टरला विचारले मग तूम्ही त्याला बसमध्ये कसे काय घेता? त्याच्याबद्दल पोलीसांना का सांगत नाही? तर तो म्हणाला साहेब त्याचा काही उपयोग नाही पोलीसलोक त्याला घेउन जातात आणि तिस-या दिवशी हे महाशय पुन्हा बसमध्ये हजर असतात. आम्ही फक्त आमचे पैसे सांभाळतो.&lt;br /&gt;एक दिवस हे महाशय बसमध्ये एकटेच गाणे गुणगुणत बसले होते. मी सरळ जाऊन त्याच्याशेजारी बसलो आणि त्याच्या मांडीवर थाप मारून त्याला विचारले," काय रे बरेच दिवस कुठे दिसला नाहीस, आत होतास काय?"&lt;br /&gt;" नाही, जरा परगावी गेलो होतो."&lt;br /&gt;" कुठं?"&lt;br /&gt;" आषाढ वारीला, पंढरपूरला?"&lt;br /&gt;" इतके दिवस?"&lt;br /&gt;" तिथून तुळजापूरला, तिकडे दसरा सण मोठा असतो ना ! परवाच परत आलो"&lt;br /&gt;त्याचे बोलणे खरे मानावे की खोटे हे माझ्या लक्षात येईना.&lt;br /&gt;" का? सगळं करून भागलो आणि देवमार्गाला लागलो असं झालयं काय?"&lt;br /&gt;" होय, जसा पांडूरंग तुम्हाला पावतो तसा आम्हालाबी पावतो" असं म्हणून तो हसू लागला.&lt;br /&gt;त्यानंतर कंडक्टर आला व त्याने तिकीट विचारले तेव्हा त्याने आपला वनडे पास दाखविला. मला कंडक्टरने काही विचारले नाही पण तो एक मिस्कील हास्य करीत गेला ते त्याने कदाचीत पाहीले असेल. कारण त्याने मला नंतर विचारले," साहेब तुम्ही आता कुठे असता? बरेच दिवसांनी भेट झाली." मी त्याला सांगितले की मी आता ड्रेसात नसतो. " तरीच, नाहीतर आपली नजर आणि मेमरी एकदम फिट्ट आहे. एकदा मानसाला बघितले की त्याची कुंडलीच छापतो आपण. "&lt;br /&gt;मी आश्चर्य वाटल्याचे दाखविन्यासाठी म्हणालो," म्हणजे, मी नाही समजलॊ?"&lt;br /&gt;"साहेब तुमच्या पाकीटात आत्ता शंभराच्या पाच नोटा आहेत की नाही?"&lt;br /&gt;खरेच माझ्या पाकीटात शंभराच्या पाच नोटा होत्या.&lt;br /&gt;" पण मी बसमध्ये पाकीट उघडले नाही मग तुला कसे कळले?"&lt;br /&gt;" थोड्यावेळापुर्वी तुम्ही पाचशेची मोड घेतली होती ना मी तिथेच होतो."&lt;br /&gt;आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला.&lt;br /&gt;" आपला अभ्यासच आहे तसा साहेब, बरं एक शंभर रुपये द्या की कालपासून काय कमाई झाली नाही. सकाळपासून काय खाल्यालं पण नाही."&lt;br /&gt;मला जरा हे वेगळंच प्रकरण वाटू लागले, अगदी कादंबरीतल्यासारखं. तो एकदम बिछडेहूये दोस्तासारखं बोलू लागला.&lt;br /&gt;" बघा साहेब मी उपकार विसरनार नाही?"&lt;br /&gt;" अरे मग, तुला पैश्याची काय कमी आहे, सध्या दिवाळी सुरु आहे लोकांच्याकडे पैसा आलाय, मग तुझी चांदीच झाली असेल, नाही का?"&lt;br /&gt;" कसली चांदी आणि कसलं सोनं, हा उद्योग घाईगडबडीचा नाही साहेब, त्याला खुप दम लागतो. प्रत्तेक गोष्ट दमानं घ्यायला लागती. कुठं गडबड झाली की लोकांचा मार ठरेलेलाच असतो. म्हणून म्हणतो साहेब पन्नास तरी द्या."&lt;br /&gt;मला काय करायचे समजेना. सरळ सरळ नाही म्हणणं म्हणजे केव्हातरी खिशाला भोक पडलेले दिसणार. मी त्याला शंभराची नोट आहे, सुट्टे नाहीत, असं सांगून टाळण्याच प्रयत्न केला पण त्याने शंभराची नोट घेउन आपल्याजवळचे पन्नास रुपये परत दिले. मग मी त्याला विचारले अरे मग तुझ्याकडे पन्नास होते की तेवढे पुरेसे नव्हते का? तेव्हा त्यानं सांगितलं ," साहेब पन्नास रुपयात नाश्तापाणी करायला मी काय हातगाडीवर जाणार नाही मी एसटी स्टॅंण्डवरच्या हॉटेलात जाऊनच नाश्ता करणार, कारण तिथूनच ब-याचवेळा माझी भवानी होते."&lt;br /&gt;मी डोक्यावर हात मारुन घेतला. मी कधी त्या हॉटेलात जाऊन काही खाल्ल्याचे मला आठवत नाही, कारण ते खुपच महाग आहे आणि फक्त आडले नडले लोकच तिथे जातात. पण त्याचे लॉजीक बरोबर होते त्या हॉटेलात जाऊन टेहळणी करायला आणि सावज हेरायला खुप चांगली जागा होती.&lt;br /&gt;लवकरच स्टॅण्ड आले आणि तो नेहमीच्या स्टाईलने उतरला, इतरांना ढकलत, शिव्या खात.&lt;br /&gt;नंतर माझे मलाच सगळं आश्चर्य वाटू लागले. एक अट्टल चोर दिसतो काय, मी स्वत:हून त्याच्याजवळ जाऊन बसतो काय? तोही अगदी घरच्यासारखा माझ्याबरोबर बोलतो काय? सारेच अकल्पित. हा कसला चोर म्हणावा? जो मनात काहींच लपवत नाही. जणू आपल्या बायकोला किंवा मित्राला आपली गुपिते सांगावी तसे सगळे सांगून मोकळा.&lt;br /&gt;त्यानंतर कागलचा उरुस सुरु होता, तेव्हा एक दिवस तो हायवेला थांबून कोल्हापूरला जाण्यासाठी लिफ्ट मागत होता. मी त्यादिवशी बाईकने कोल्हापूरला जात होतो. त्याला पाहून गाडी बाजूला घेतली आणि म्हटले, " काय रे, इथे काय करतोस?".&lt;br /&gt;" पोटापाण्याचा उद्योग"&lt;br /&gt;" चल, मी तुला कोल्हापूरात सोडतो"&lt;br /&gt;" तुम्ही जावा साहेब, उगाच गरिबाच्या पोटावर पाय आणू नका, मी येईन दुस-या कोणाच्यातरी गाडीवरून." आणि पाठोपाठ येणा-या एका मध्यमवयीन काकाच्या गाडीवर बसला. मी मनातल्या मनात म्हटले ’बिचारा काका, काकाजवळ पेट्रोलपुरते तरी पैसे उरले म्हणजे बरे.’&lt;br /&gt;अशी माणसं भेटतात. तिही अपवादानेच. कारण भेटतो म्हटलं तरी त्याला भेटता येत नाही. ही मस्त कलंदर मानसं आपल्याच राज्यात गुंग असतात आणि सुखीही. आपल्या उद्योगाबद्दल ना अहंकार ना पश्चाताप. पोटापाण्यापुरता पैसा मिळाला की खुष. त्यापेक्षा अधिक मिळावा अशी त्यांची इच्छा नाही, आणि अधिक पैसे मिळाले तरी त्याचे करायचे काय ? ना घर ना संसार.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-878927207617059772?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/878927207617059772/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/10/blog-post_27.html#comment-form' title='4 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/878927207617059772'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/878927207617059772'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/10/blog-post_27.html' title='३१. मला भेटलेली माणसं - भाग-१ - चोर'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-1923393446699506229</id><published>2010-10-13T16:29:00.005+05:30</published><updated>2011-09-28T16:49:07.356+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सुंदर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नारी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नर'/><title type='text'>३०. नर सुंदर की नारी ?</title><content type='html'>कोण म्हणतं की स्त्री ही पुरुषापेक्षा सुंदर दिसते म्हणून?&lt;br /&gt;स्त्री ही पुरुषापेक्षा सुंदर दिसू शकत नाही. जर कोणी तसे म्हणत असेल तर तो एखादा पुरुष असेल ज्याला स्त्रियांची खोटी प्रशंसा करुन त्यांना खुष करायचे असावे. किंवा एखादी उतावीळ स्त्री तरी असेल असेल जिला आपल्याशिवाय इतर कांही दिसत नाही.&lt;br /&gt;आपण म्हणाल की याला काय पुरावा आहे? काय दाखले आहेत? की पुरुषच स्त्रीपेक्षा जास्त सुंदर आहे म्हणून. मग पुरुष स्त्रीयांच्यामागे का लागतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या आवती भोवतीच आहेत.&lt;br /&gt;निसर्गाकडे पहा फार लांब नाही जरा मोर आठवून पहा. मोर सुंदर की लांडोर. लांडोर हा काय प्रकार असतो बुवा? मी नाही पाहीला लांडोर - असं कोणी तरी म्हणेल कारण, मोरांच्या सौदर्यापुढे मोराची मादी लांडोर अगदीच फिक्की आहे. याबद्दल आपले दुमत नक्कीच नसणार.&lt;br /&gt;कोकीळचा आवाज आपण कधीतरी ऐकला असेल. हा मंजूळ आवाज नर कोकीळचाच असतो. मादी बहूदा घुम्मीच असावी.&lt;br /&gt;बैल पहा कसा डौलदार आहे. आपले डोलणारे वशींड घेऊन चालणारा बैल म्हणजे डब्लू डब्लू एफ मधला "द रॉक". त्यामानाने गाय अगदीच बापूडवाणी दिसते. ना ऐट ना बाज.&lt;br /&gt;सिंह हा जंगलचा राजा पहा त्याला आपल्यासारखीच दाढी असते पण तो कोरत वगैरे बसत नाही. आपली आयाळ तो भरमसाठ वाढवीतो आणि त्यामुळे त्याचे पुरुषत्व आनखीनच उठून दिसते.&lt;br /&gt;त्याच्या मादीला आयाळ नसते व ती अगदीच मऊ मांजर दिसते.&lt;br /&gt;मांजरातही बोका हा खुपच सुंदर असतो. याबाबतीत आपल्यापेक्षा स्त्रियांचे जास्त एकमत होईल कारण ब-याच श्रीमंत स्त्रीयांना आपल्या कुशीत बोका नसला की कसे ओके-बोके वाटते.&lt;br /&gt;शेळपट शेळी समोर बोकड पहा कसा कर्ता पुढारी असल्यासारखा मिरवत असतो आणि शंभर शेळ्यातूनही एक बोकड उठून दिसतो.&lt;br /&gt;शंभर कोंबड्यात फिरणारा एकटा कोंबडा हा पुर्वीच्या जमीनदारासारखा किंवा पाटला सारखा ऐटबाज दिसतो. त्याच्या डोक्यावरचा तुरा पाहूनतर त्याची दृष्टच काढायला हवी.&lt;br /&gt;बाकी आता डिस्कव्हरी चैनलपर्यंतही जायला नको. ज्याप्रमाणे बाकीच्या वर्गातील माद्यांपेक्षा नरच अधिक सूंदर आहेत त्याप्रमाणेच आपल्यातही नरच जास्त सुंदर आहे. बैलाप्रमाने फूरफूरनारे बाहू, सिंहासारखी आयाळ,वाघाची चाल, कोंबड्याचा तोरा, मोराची ऐट, बोक्याची मिजाशी  असणा-या पुरुषासमोर स्त्रीया म्हणजे किस झाडकी पत्ती. होय ना?&lt;br /&gt;एवढ्यातच आपली शंका दुर झाली असणार की पुरुषच जास्त सुंदर आहेत. पण तो स्त्रीयांच्या मागे का लागतो किंवा स्त्रीयांनाच सुंदर का मानतो याचे उत्तर आजून बाकी आहे.&lt;br /&gt;त्याचे उत्तर आहे ते म्हणजे स्त्रीय़ांकडे असणारा अनमोल दागिना - त्यांचे "स्त्रीत्व".&lt;br /&gt;त्यांचे स्त्रैनपणा. उदाहरनच द्यायचे झाले तर त्यांचे लाजणे, आहाहा . . . .&lt;br /&gt;कोणीतरी म्हटले आहे" एक नूर आदमी दस नूर कपडा तसेच एक नूर नारी हजार नूर नखरा" खरं आहे ना? (चूक भूल द्यावी घ्यावी)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-1923393446699506229?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/1923393446699506229/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/10/blog-post_13.html#comment-form' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1923393446699506229'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1923393446699506229'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/10/blog-post_13.html' title='३०. नर सुंदर की नारी ?'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-8092031923590822557</id><published>2010-10-11T13:45:00.000+05:30</published><updated>2011-12-19T15:20:07.609+05:30</updated><title type='text'>२९. गाव तिथे रित</title><content type='html'>"ठिक पाटील" ही एक बडी आसामी आमच्या गावात होऊन गेली.त्यांना कुणीही विचारले की ," काय पाटील कसे काय आहात?" किंवा " काय चाललयं, पाटील?" तर ते " ठीक " असे उत्तर देत त्यामुळे कालांतराने त्यांना "ठिक पाटील" असे नावच पडले.ते बहुदा पुर्वी दुस-या महायुध्दाच्यावेळी सैन्यात होते व तेथून रिटायर होऊन आल्यावर त्यांनी एक मोटरकार विकत घेतली होती. ९५१८- पंचान्नऊ-अठरा अशा क्रमांकाची ही गाडी त्या काळात कागलहून सिध्दनेर्लीला येण्यासाठीचे एकमेव स्वयंचलीत या प्रकारातील वाहन होते. कागल-सिध्दनेर्ली हा सातआठ किमीच्या प्रवासात ती गाडी पंधरावेळा ब्रेक घ्यायची आणि ढकलल्याशिवाय चालू व्हायची नाही. त्यामुळे कुणाची गाडी सुरु व्हायला कां-कू करू लागली की आम्ही म्हणतो ’तूझी गाडी पंच्यानऊ-अठरा झाली बघ’."ठिक पाटलांविषयी इतकाच त्रोटक इतिहास मी कोणाकडूनतरी ऐकला आहे. मी त्यांना पहील्यांदा पाहीले तेव्हा ते खुप म्हातारे झाले होते व स्वत:ची तब्बेत सांभाळणे ही एकमेव ड्युटी ते करत होते. त्यांचे मुख्य वैशिष्ठ्य किंवा त्यांचा हातखंडा म्हणजे त्यांना दुस-याचे मरण समजत होते असं म्हणतात.&lt;br /&gt;संध्याकाळी पाचाच्या सुमारला ते आपली काठी सांभाळत गावातून चालत चालत मुख्य रस्त्याने कागल-मुरगुड राज्यमार्गापर्यंत जायचे व अंधार पडण्यापुर्वी परत आपल्या घरी परतायचे. त्यांच्या या नेहमीच्या रुटवर जर कोणी म्हातारा म्हातारी अंथरुनावर असेल (व कुणाला त्यांची सुश्रूषा करायचा कंटाळा आला असेल तर) ते लोक आवर्जून ठिक पाटलांना घरी घेऊन जात असत.&lt;br /&gt;आंथरुनावरच्या म्हाता-याला ते पाहायचे, एक दोन हाका मारायचे व बाहेर येऊन जाता जाता फक्त इतकेच म्हणत " कांही नाही, दोन दिवस..., ठीक आहे?".&lt;br /&gt;याचा अर्थ दोन दिवसात अंथरुन रिकामे होणार. घरचा कर्ता मनुष्य लगेचच पै-पाहूणे बोलवून घ्यायचा.हा अनुभव गावातील ब-याच लोकांनी घेतला आहे. ठिक पाटलांचा अंदाज सहसा चुकत नसे.&lt;br /&gt;एकदा ठिक पाटलांनी सांगितल्यावर मग काय गावातील सगळ्या बायकांचा लोंढा त्या घराकडे वळू लागतो. कोण आजारी आहे?, कोणाला ’जास्ती’ झालय? कोण गचकले? याची बातमी पसरण्याचे दुध डेअरी हे अधिकृत केद्रच बनले आहे. सकाळी सहा ते साडे -सात व संध्याकाळी पाच ते सात हे न्यूज चॅनल सुरु असते. दुध घालायला आलेल्या बायका रांगेने जाणा-या मुंग्याप्रमाणे वाटेतच थांबून एकमेकींची खबर पास करतात. (कोण कुणाबरोबर पळून गेले, कोण नांदणं टाकून गेले असल्या बातम्या प्रथम याच चॅनलवर झळकतात.) त्यामुळे कुणाच्या घरी बायकांचा लोंढा वाढला की आपण ओळखायचे की कोणालातरी ’जास्ती’ झालेलं आहे. कदाचीत यासगळ्या गोष्टीमूळे त्या आंथरुनावरच्या माणसालाही मग हे कळत असावे की मला जरा "जास्ती" झालेलं आहे. बरं या बायका तिथं जाऊन काय पाहतात, देव जाणे.&lt;br /&gt;एकदा का कोणी वारले की मग पुढची कार्यवाही सुरु. यामध्येही प्रत्तेक ठिकाणची स्वत:ची अशी वेगळी पध्दत असते.तिकडे मुरगुडकडे कोणी वारले की कांही लोक म्हणे "आमक्या तमक्याच्या म्हाता-याने उडी मारली" असं सांगतात. इथे उडी मारली याचा अर्थ उडी मारून स्वर्गात गेली असा असावा.याचप्रमाणे गचकली, खपली, पोहचली, निवर्तली, मेली, मातृशोक झाला, निर्वाण झाले, माती झाली, कालवश झाली, देवाला गेली, कैलासाला गेली असे अनेक वाक्यप्रयोग आढळतात.&lt;br /&gt;मी एकदा अमरच्या गावी हसूरला गेलो होतो. हे हसूर गाव कागल-गडहिंग्लजच्या सिमेवर आहे. तिथे फटाक्यांचा आवाज ऐकू आला. अमरची आई म्हणाली, "कोणतरी वटलं वाटतं." वटणे याचा अर्थ पैसे वटणे, चेक वटणे यावरून देवाच्या दारात माणूस वटणे असा होत असेल. जशी मानंसं तशी त्यांची भाषा. तिथे घरे एकमेकांपासून अंतरावर आहेत तेव्हा अशी काही बातमी सर्वांना कळण्यासाठी फटाके वाजविणे हा पर्याय त्यांनी निवडला आहे.&lt;br /&gt;अंतू बरवासारखा कोणी असला म्हणजे मग ’अमक्यानं-तमक्यानं दसयाच्या अगोदरच शिलंगण केलं’ असंही म्हणेल.पुण्य़ाकडचा कोणी नाटकाशी संबंधीत मेला की ’... यांनी लवकरच एक्झीट घेतली’ असं म्हणतील. हा खुप मोठा विषय आहे, एकाचवेळी त्यावर लिहून संपणार नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-8092031923590822557?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/8092031923590822557/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/10/blog-post_11.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/8092031923590822557'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/8092031923590822557'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/10/blog-post_11.html' title='२९. गाव तिथे रित'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-1270428041118911115</id><published>2010-10-07T16:28:00.000+05:30</published><updated>2011-09-28T16:48:46.130+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लोभी कुत्रा'/><title type='text'>२८. लोभी कुत्र्याची गोष्ट आणि आपण</title><content type='html'>इयत्ता पाचवी-सहावीमध्ये असताना आपल्याला मराठी विषयाच्या पेपरमध्ये शेवटी निबंध लेखन, गद्य आकलन असे प्रश्न असायचे. त्यामध्येच आणखी एक प्रश्न म्हणजे दिलेल्या अपुर्ण वाक्यांवर अधारीत कथा लिहायची आणि त्या कथेला योग्य नाव द्यायचे. त्याप्रकारात सर्वात जास्तवेळा "लोभी कुत्रा" नावाची कथा मी लिहील्याचे आठवते. ती कथा साधारणपणे अशी होती.&lt;br /&gt;एक कुत्रा आपल्या तोंडात भाकरी घेउन रस्त्याने जात असतो. वाटेत त्याला एक नदी किंवा ओढा लागतो. त्या नदीच्या पाण्यात त्या कुत्र्याला आपले प्रतिबिंब दिसते. प्रतिबिंबामध्ये दिसणा-या कुत्र्याच्या तोंडातील भाकरी आपल्याला मिळावी असा लोभ त्या कुत्र्याला होतो आणि तो भुंकू लागतो. भुंकताना त्याच्या तोंडातील भाकरी पाण्यात पडते व त्याला भाकरीशिवाय रहावे लागते.&lt;br /&gt;अशाप्रकारे लोभापायी त्या कुत्र्याचे नुकसान होते.&lt;br /&gt;पुढे त्या कुत्र्याला पश्चाताप होतो अशी ओळ बहुदा त्यावेळी कुणाला सुचली नसती.&lt;br /&gt;ही कथा आपण सर्वांनी कधी ना कधी, कुठे ना कुठे ऐकली वा वाचली असेल व आपण त्या कुत्र्याच्या लोभीपणामुळे त्या कुत्र्याबद्दल वाईट मत बनवले असेल.&lt;br /&gt;पण मला असे वाटते की बोलून चालून तो एक कुत्राच होता आणि ही गोष्ट प्रत्यक्षात घडली असेलच असे नाही. आपण त्या कुत्र्याच्या नावाने ही कथा लिहितो आणि पुन्ह:पुन्हा वाचतो, सांगतो. पण त्यात त्या कुत्र्याबद्दल वाईट मत करण्याचे किंवा त्याला लोभी म्हणणे चुकीचे आहे असे मला वाटते.&lt;br /&gt;भाकरी पाण्यात पडल्यावर त्या कुत्र्याला त्याचा पश्चाताप होईल की नाही हे माहीत नाही पण आपल्याकडून असे घडले असते तर आपल्याला पश्चाताप नक्कीच झाला असता. तेव्हा ही कथा पुन्हा पुन्हा सांगून आपण आपले भाकरीवरचे प्रेम किंवा लोभच दर्शवीत असतो.&lt;br /&gt;ही कथा ज्याने लिहीली तोच एक नंबरचा लोभी असावा आणि त्यातही त्याने आपला लोभीपणा लपविण्यासाठी कुत्र्याला बळीचा बकरा बनविले आहे ते वेगळेच.&lt;br /&gt;भाकरी पाण्यात पडल्याचे दु:ख ज्याला होते तोसुधा लोभीच असणार, नाही का?&lt;br /&gt;भाकरी पाण्यात पडल्यावर वाईट आपल्याला वाटते व लोभी असे विशेषन आपण कुत्र्याला लावतो. फारतर वेंधळा कुत्रा, धांदरट कुत्रा असे म्हटले असते तर जरा जास्त बरे झाले असते.&lt;br /&gt;बघा पटतय का?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-1270428041118911115?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/1270428041118911115/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/10/blog-post.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1270428041118911115'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1270428041118911115'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/10/blog-post.html' title='२८. लोभी कुत्र्याची गोष्ट आणि आपण'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-9004011229126724481</id><published>2010-09-20T11:11:00.002+05:30</published><updated>2011-09-28T16:48:35.393+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बालकांचे मानसशास्त्र'/><title type='text'>२७. बालकांचे मानसशास्त्र</title><content type='html'>काही वर्षापुर्वी सुप्रसिध्द विनोदी लेखक बाळ गाडगीळ यांनी लिहीलेल्या बालकांचे मानसशास्त्र या विषयावरील पुस्तकातील कांही उतारे एका जुन्या दिवाळी अंकात छापून आले होते. त्यातील दोन प्रसंग मला खुप आवडले.&lt;br /&gt;प्रसंग - १ ला.&lt;br /&gt;एका शहरात एक कृषीप्रदर्शन भरलेले होते. त्यामध्ये शेतीविषयक औजारे, बी-बियाणे, खते इ. स्टॉल लागलेले होते.&lt;br /&gt;ते पहायला एक शहरी, सुशिक्षीत जोडपे आपल्या एकुलत्या एका मुलग्याला घेउन आलेले असते.&lt;br /&gt;प्रदर्शनाच्या सुरवातीसच एक पाणी उपसण्याचा पंपसेटचा स्टॉल असतो तेथे हे तिघे पोहोचतात. तिथला सेल्समन त्या पंपाची सर्व माहीती देतो. तो पंपसेट पाहील्याबरोबर तो मुलगा हा आपल्याला पाहीजेच म्हणून हट्ट करु लागतो. त्याचे मम्मी-पप्पा त्याला खुप समजावून सांगतात,"अरे हा नेऊन आपण कुठे लावणार आपल्याकडे विहीर आहे का?"&lt;br /&gt;" विहीर खोदुया" तो मुलगा.&lt;br /&gt;"अरे विहिर कशी खोदणार आपल्याकडे जागा कुठे आहे? आपण तर दुस-या मजल्यावर राहतो ना ?"&lt;br /&gt;"मग दुस-या मजल्यावर विहिर खोदु, ऍ~"&lt;br /&gt;असा त्यामुलग्याने एक्च धोशा लावला. आपाल्याला तो पंप पाहीजे म्हणजे पाहीजेच असा हट्ट तो काही केल्या सोडेना. रडून ओरडून दंगा सुरु केला. तेव्हा तो सेल्समन म्हनाला तुम्ही त्याला इथेच सोडा आणि बाकीचे प्रदर्शन पाहून या, मी त्याला व्यवस्थीत समजावून सांगतो.&lt;br /&gt;ते जोडपे त्याला सोडून पुढे गेले. जोडपे दिसेनासे झाल्यावर त्या सेल्समनने त्या मुलग्याला विचारले," कारे तुला पंपसेट कशाला पाहीजे? तुझी काय विहिर आहे काय? "&lt;br /&gt;" नाही, मला पाहीजेच ऍ ..."&lt;br /&gt;’थाड्ड’. त्या सेल्समनने एक कानाखाली दिली आणि मग विचारले," काय रे बाळ तुला पंपसेट हवा काय?"&lt;br /&gt;गाल चोळतच तो म्हणाला "नको मला काही नकॊ"&lt;br /&gt;’थाड’ " पुन्हा मागशील का?"&lt;br /&gt;"नाही"&lt;br /&gt;मम्मी पप्पा जेव्हा परत आले तेव्हा तो मुलगा पळत जाऊन त्यांना बिलगला व म्हणाला " आपल्याला कशाला हवा पंपसेट, आपल्याकडे तर विहिरच नाही"&lt;br /&gt; &lt;br /&gt;तात्पर्य: नेहमीच लाडाचा उजवा हात न वापरता कधीकधी डावा हातही वापरावा लागतो.&lt;br /&gt; &lt;br /&gt;प्रसंग - २ रा.&lt;br /&gt;हा प्रसंग ग्रामीण भागातील आहे.&lt;br /&gt;रस्ताकडेला एक पिंजराची गाडी उलटलेली असते. त्या शेजारीच एक लहान मुलगा रडत बसलेला असतो.&lt;br /&gt;रस्त्याने जाणा-या एका सदगृहस्ताला त्या मुलाग्याची दया आली त्यांनी त्याला उचलून आपल्या खांद्यावर घेतले आणि आपल्या घरी घेऊन जाऊ लागले.&lt;br /&gt;वाटेत त्या मुलाचे," बाबा आआआ" असे रडणे सुरुच होते.&lt;br /&gt;वाटेत एक दुकान लागले तेव्हा त्यांनी त्या मुलाला काही चॉकलेट घेऊन दिली ती त्या मुलाने एकामागोमाग एक खाउन संपविली आणि परत " बाबा आआ" असा सूर धरला.&lt;br /&gt;घरी गेल्यावर त्यांनी त्याला कांही बिस्कीटे दिली ती खाऊन झाल्यावर पुन्हा त्याने " बाबा" असा सूर धरला.&lt;br /&gt;त्या सदगृहस्ताला कांही कळेना. या मुलाला काय द्यावे म्हणजे हा शांत होईल हे त्यांना कळेना. तो आपले " बाबा" काय सोडेना.&lt;br /&gt;शेवटी त्यांनी परोपरीने विचारले,"बाळ तुझे बाबा कूठे आहेत?"&lt;br /&gt;मग तो मुलगा आनखीनच रडू लागला. शेवटी त्या मुलानेच सांगीतले की माझे बाबा त्या पिंजराच्या ढिगा-या खाली आहेत म्हणून.&lt;br /&gt;तात्पर्य: खाणे हेच सर्वस्व नसते त्यापलीकडेही मुलांना आपल्या आईवडीलांची काळजी असते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-9004011229126724481?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/9004011229126724481/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_20.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/9004011229126724481'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/9004011229126724481'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_20.html' title='२७. बालकांचे मानसशास्त्र'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-2164042677595774263</id><published>2010-09-17T15:43:00.000+05:30</published><updated>2011-09-28T16:48:18.764+05:30</updated><title type='text'>२६. प्रामाणिकपणा</title><content type='html'>कांही कथा मनात घर करुन राहतात.&lt;br /&gt;भले दुस-याला त्या तितक्याच आवडतील अशा नसतील किंवा त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावर तितकासा होणार नाही. पण या कथा नेहमी स्मरणात राहाव्यात असे मात्र वाटते.&lt;br /&gt;यापैकीच एक रघूवंश मधील राजा दिलीपची ही कथा. ही कथा मी दहाबारा वर्षापुर्वी कदाचीत वी.स.खांडेकरांच्या क्रौंचवधमध्ये वाचली होती पण अजुनही लक्षात आहे.&lt;br /&gt;त्याकाळी रघूवंशातील राजा दिलीप हा अयोध्येवर राज्य करत होता. तो रघुवंशाला शोभेल असाच खुप पराक्रमी, प्रजाहितदक्ष असा असतो. त्याच्या राज्यात राहणारे एक ऋषी कोणतातरी यज्ञ करणार असतात व त्यांना त्या यज्ञासाठी सात लक्ष सुवर्णमोहरांची गरज असते.&lt;br /&gt;आपल्या यज्ञासाठी लागणारे धन उपलब्ध करण्यासाठी शेवटी तो ऋषी राजा दिलीपकडे आपल्या एका शिष्याला धाडतात.&lt;br /&gt;तो शिष्य राजाच्या दरबारात येऊन आपल्या गुरुचा निरोप कथन करतो. यज्ञासाठी गरजेच्या सात लक्ष सुवर्णमोहरा देण्याचा निर्णय राजसभा घेते.&lt;br /&gt;पण त्याचवेळी प्रधान अधिकारी एक समस्या उपस्थित करतात ती म्हणजे राज्याचा खजिना रिकामा झालेला असतो व देण्य़ासाठी म्हणून एकही सुवर्ण मोहर शिल्लक नसते. तेव्हा आपल्या दारावर आलेला याचक परत जाता कामा नये व एकदा देण्याचा निर्णय झाल्यावर तो मागे घेणे चुकीचे आहे हे जाणून राजा दिलीप स्वर्गातील कुबेराच्या खजीन्यावर चाल करुन जायचे ठरवतो.&lt;br /&gt;राजा दिलीपच्या पराक्रमाची महती अगोदरच कुबेराला असल्यामुळे तो वरुनच सुवर्णमोहरांची वृष्टी करतो.&lt;br /&gt;स्वर्गातून पडलेल्या त्या सर्व सुवर्णमोहरा आपण नेऊन त्या ऋषींना द्याव्यात अशी सादर विनंती राजा दिलीप त्या शिष्याला करतो. पण तो शिष्य म्हणतो की गुरुंची आज्ञा आहे की फक्त सात लक्षच मोहरा आणाव्यात तेव्हा बाकीच्या मोहरा तुम्ही ठेवून घ्या.&lt;br /&gt;अशाप्रकारे बाकीच्या मोहरा कुणी घ्याव्यात ही मोठी समस्या उत्पन्न झाली.&lt;br /&gt;राजाचे म्हणने की सर्व सुवर्णमोहरा ह्या ऋषींच्याकरीता आहेत तर शिष्याचे म्हणने की फक्त सात लक्षच मोहरा गुरुंना हव्या आहेत बाकीच्याशी माझा काही संबंध नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रामाणिकपणा यालाच म्हणत असावेत.&lt;br /&gt;धन्य तो राजा, धन्य तो ऋषी आणि धन्य त्याचा शिष्य.&lt;br /&gt; &lt;br /&gt;रघुवंशात अजुनही अशा खुप सुंदर सुंदर कथा असतील एकदा वाचलाच पाहीजे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-2164042677595774263?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/2164042677595774263/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_17.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/2164042677595774263'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/2164042677595774263'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_17.html' title='२६. प्रामाणिकपणा'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-8409208920171377917</id><published>2010-09-15T16:44:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:48:06.573+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चैतन्य महाप्रभू'/><title type='text'>२५. हेची दान देगा देवा</title><content type='html'>कथा क्रमांक-१&lt;br /&gt;चंदूलालने एकदा एक एक रुपयाची दोन लॉटरी तिकीटे काढली होती. एकाचे काही खरे नाही म्हणून दुस-या गठ्ठ्यातील एक अशी दोन लॉटरी तिकीटे घेऊन तो मंदीरात पोहोचला.&lt;br /&gt;देवासमोर साष्टांग दंडवत घालून नंतर हात जोडून उभा राहीला. देवाला अगदी विनवणीच्या सुरात म्हणतो कसा," देवा, इतकी वर्षे मी मनोभावे तुझी सेवा केली. दररोज बाजारात जाताना असो वा पेपर किंवा दुध आणावयाचे असो मी तुझे दर्शन केल्याशिवाय पुढे गेलो नाही. ऊन म्हटले नाही पाऊस म्हटले नाही मी तुझे दर्शन चुकविले नाही कोणतेही महत्वाचे काम मी तुला भेटल्याशिवाय केले नाही. आताच मी ही लॉटरीची तिकीटे काढून आलो आहे तेव्हा या भक्ताचे नशिब कसे उघडायचे ते आता तूच ठरव." असे म्हणून चंदूलाल पुढे दुध आणायला गेला.&lt;br /&gt;चंदुलालची ही प्रार्थना देवाने खरोखरच ऐकली होती.&lt;br /&gt;दुस-या दिवशी वर्तमानपत्रात वाचल्यानंतर चंदुलालला कळले की त्याला २५ लाखाची लॉटरी लागली आहे. बातमी कळाताच लोक त्याचे अभिनंदन करायला जमू लागले. चंदूलाल तर एकदम नाचायलाच लागला पण नाचता नाचताच तो एकदम थांबला आणि डोके बडवून घ्यायला लागला. असे का ? असे विचारल्यावर तो म्हणाला," देवाला जर मला लॉटरी जिंकून द्यायची होती तर दोन्ही तिकीटे का नाही लागली, एक तिकीट तर वायाच गेले." असे म्हणून तो पाय आपटत देवळाकडे गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कथा क्रमांक -२.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही कथा मला कुठे ऐकायला मिळाली ते आता मला आठवत नाही.&lt;br /&gt;नेहमीप्रमाणे चैतन्य महाप्रभू देवाच्या भजनात गुंग होऊन आपली फाटलेली गोधडी शिवत बसले होते.&lt;br /&gt;असे ते किती वेळ बसले होते याचा त्यांना विसरच पडला होता. तोंडाने देवाचे नामस्मरण करत करत हाताने एक एक टाका घालत होते. जणू त्यांना एकप्रकारची चलसमाधीच लागली होती.&lt;br /&gt;ते ज्याचे नामस्मरण करत होते तो परमेश्वर स्वत:च तेथे पोहोचला होता आणि त्यांचे हे भजन ऐकत व विनकाम पहात कितीतरी वेळ उभा होता. परमेश्वराला त्यांच्या भजनात अडथळा आणता येईना आणि त्यांना न भेटता पुढेही जाता येईना.&lt;br /&gt;ब-याच वेळाने त्यांच्या सुईतील दोरा संपला आणि ते नवीन दोरा ओवन्याचा प्रयत्न करु लागले तेव्हा त्यांचे लक्ष जवळच उभा असणा-या देवाकडे गेले. त्यांनी उठून देवाचे पाय धरले व वाट पहायला लागल्याबद्दल क्षमायाचना केली. नंतर जेव्हा निरोपाची वेळ आली तेव्हा परमेश्वराने त्यांना कांही मागण्याविषयी विनंती केली. चैतन्य महाप्रभूंनी देवाचे आभार मानले व म्हणाले जे द्यायचे ते तू आम्हाला दिलेच आहेस. काम करायाला हातपाय आहेत. तुझ्या नामस्मरणासाठी लागणारी वाचा आहे. आता फक्त तुझे हे गोड नाव आमच्या मुखी सदासर्वदा राहूदे व तुझ्या भजनातचे हे आयुष्य संपू दे आणि बाकी काही नको.&lt;br /&gt;परमेश्वराने त्यांना आनखी काही मागण्याविषयी सांगीतले तेव्हा त्यांनी वारंवार नकारच दिला.&lt;br /&gt;खुप वेळ परमेश्वर सांगत राहीला शेवटी तो म्हनाला की जोपर्यंत तू कांही मागत नाहीस तोपर्यंत मी जाणार नाही.&lt;br /&gt;तेव्हा नाईलाजाने चैतन्य महाप्रभू म्हणाले,"आता आलाच आहेस आणि हट्टच करतो आहेस तर हा दोरा घे आणि या सुईत ओवून दे" परमेश्वराने ते काम आनंदाने केले व आपल्य़ा वाटेला लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चैतन्य महाप्रभू यांना महाप्रभू का म्हणतात याचे उत्तर या कथेतून आपल्याला मिळाले असेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-8409208920171377917?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/8409208920171377917/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_15.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/8409208920171377917'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/8409208920171377917'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_15.html' title='२५. हेची दान देगा देवा'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-233703780276331834</id><published>2010-09-13T17:43:00.003+05:30</published><updated>2011-09-28T16:47:55.121+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='समर्पण'/><title type='text'>२४. समर्पण</title><content type='html'>लग्नाच्या अगोदर काही दिवस मी निपाणीला गेलो होतो.&lt;br /&gt;एसटी स्टॅंड जवळ गेल्यावर आमचा मामा भेटतो का म्हणून शोधू लागलो.&lt;br /&gt;जरा इकडे तिकडे पाहिल्यावर माझे लक्ष चहाच्या टपरीजवळ जमलेल्या घोळक्याकडे गेले आणि मी ओळखले मामा तेथेच असणार.&lt;br /&gt;लाकडी बाकावर ऐसपैस मांडी घालून स्वारी बसली होती. आजूबाजूला चहा पिणारे, न-पिणारे, नुकतेच पेपर वाचणारे, एसटीची वाट पाहणारे असे सगळे जमलेले होते. या सर्वांच्या मध्ये आमचा मामा बसून आपले अध्यात्मिक डोस सगळ्यांना पाजत होता. लोकही चहाच्या घोटाबरोबर ते चवीने पित होते.&lt;br /&gt;मी दिसल्यावर मामा हात दाखवून म्हणाला," ये ये बस. अरे तुझ्याच फायद्याचा विषय आहे. अरे चमनलाल एक स्पेशल चहा घे इकडे." शेवटचे वाक्य ज्या चमनलालला उद्देशून होते तो खरोखरच चमनगोटावाला होता.&lt;br /&gt;मामाने मला तिथेच बसवून दैनिक सकाळमध्ये छापून आलेली एक बोधकथा वाचून दाखविली. ती कांहीशी अशी होती.&lt;br /&gt;कोणे एके काळी एका आश्रमात एक ऋषी आपली ज्ञानसाधना करीत असतो. त्याच्यासोबत त्याची पत्नी हीच एकमेव दुसरी व्यक्ती त्या आश्रमात राहत होती. पतीने ध्यानधारणा करावी, समाधी लावावी, चिंतन मनन यात रमून जावे आणि पत्नीने आजूबाजूच्या जंगलातून फळफळावळ गोळा करावी गायींचे दुध काढावे, जवळच असणा-या शेतावर कष्ट करावे व अन्न पिकवून ते शिजवावे आणि पतीला वाढावे. अशा प्रकारे पतीच्या ज्ञानसाधनेत त्या ऋषीकुलोत्पन्न स्त्रीचे अनमोल योगदान होते. आपल्याला कराव्या लागणा-या काबाडकष्टाची तिला कोणतीच तमा नव्हती. याच्या पुढेही जाऊन सांगाय़चे म्हणजे ऋषी कधीही तिच्याशी बोलत नसत. त्यांचे अखंड मौन व्रत होते. कोणताही शब्द न उच्चारता तिने वेळच्यावेळी जेवनाचे ताट नेऊन त्यांच्या समोर ठेवावे आणि त्यांनी ते कोणत्याही प्रतिक्रियेविना खावावे. लग्नानंतर त्यांनी एकदाच तिला सांगितले होते की जेवना सोबत नेहमी एका भांड्यात पाणी व एक सुई द्यावी व जेवन करत असताना तेथे थांबू नये. त्या भल्या स्त्रीने कधीही यात खंड पडू दिला नाही.&lt;br /&gt;कालांतराने अगदी जीवनाचा शेवट जवळ आल्यावर एके दिवशी तिने त्यांच्याकडे एक मागणे मागीतले. ती म्हणाली मला आता बाकी कांही नको. तुमच्याबरोबरचा हा संसार सोडून जाण्याची वेळ आली आहे. मला आतापर्यंत सर्व काही मिळाले आहे. काही तक्रार नाही की काही मागणे नाही. फक्त एकच सांगा आपण त्या सुईचे आणि पाण्याचे काय करत होता?&lt;br /&gt;खरंतर हा प्रश्न तिच्या तोंडून लग्नानंतरच्या पहिल्या दिवशीच यायला हवा होता, पण आला नाही. येणारच नाही त्याचेच नाव तर आहे ’समर्पण’. पतीने सांगावे व पत्नीने ते करावे. का? असा प्रश्नच नाही. किंवा कुतुहल म्हणून दारा आडून पाहणे नाही. (मला तर वाटते शेवटीसुध्दा हा प्रश्न तिने विचारला नसावा. कथाकाराने तो स्वत:च घुसडला असावा. त्याशिवाय ते कोडेही सुटले नसते म्हणा.)&lt;br /&gt;ऋषींनी तिला उत्तर दिले. ते म्हणाले," मला याची जाणीव होती की लग्नानंतरचा तुझा प्रत्येक दिवस जणू माझ्यासाठीच उगवत होता. पहाटे सुरु होणारा दिवस आणि दिवसाचा प्रत्तेक क्षण तू फक्त माझ्याबरोबरच्या संसारासाठीच खर्च करत होतीस. त्यामुळे तू वाढलेला अन्नाचा प्रत्तेक कण न कण मी खुप प्रेमाने व आदराने खाल्ला. जे शीत ताटातून खाली पडते होते ते मी त्या सुईने उचलीत होतो आणि दिलेल्या पाण्य़ात धुवून खात होतो. तुझ्या कष्टातून मिळालेल्या अन्नाचा कण आणि कण मी माझ्या चिंतनात झिजवला तुझे कष्ट मी असे वाया कसे घालवू?"&lt;br /&gt;एवढे वाचून मामा कपाळाला हात जोडुन म्हणाला, "धन्य तो ऋषी आणि धन्य त्याची पत्नी. आणि आत्ताच्या या बाया बघ, नवरा दररोजच्या नियमाने जरी कामाला निघाला तरी हजार प्रश्न विचारणार. कुठे चालला, कधी येणार, कशाने जाणार, कशाने येणार, बरोबर कोण आहे इ. इ. धन्य या बाया."&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-233703780276331834?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/233703780276331834/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_13.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/233703780276331834'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/233703780276331834'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_13.html' title='२४. समर्पण'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-2206048641054019663</id><published>2010-09-11T14:19:00.002+05:30</published><updated>2011-09-28T16:47:40.956+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marathi blogs'/><title type='text'>२३. दु:खाची परी</title><content type='html'>झेपेले इतकंच दु:ख तो आपल्याला देतो, &lt;br /&gt;दिलेले द:ख संपले की आपल्यालाच नेतो...&lt;br /&gt;असं कवी चंद्रशेखर गोखले आपल्या चारोळीत लिहितात ते खरेच आहे. आयुष्य म्हणजे सुख आणि दु:खाची एकसलग अशी साखळी. दिवस आणि रात्रीसारखी एकामागोमाग एक जोडलेली.&lt;br /&gt;इथे प्रत्तेकाला सुख-दु:ख नेमून दिलेले आहे. आपण आपल्याला नेमून दिलेल्या सुखापेक्षा दु:खावरच जास्त खुष असतो. पहा ना, आपण प्रत्तेकाला आपले दु:ख अगदी उलघडून उलघडून दाखवितो. अगदी परक्या माणसासमोर सुध्दा आपण आपले दुख: व्यक्त करतो, पण आनंद व्यक्त करायला मात्र आपल्याला फक्त आपली जवळचीच माणसं लागतात.&lt;br /&gt;याचे कारण कदाचीत वपू म्हणतात तसे असेल. वपू म्हणतात सुखाची परी जरी सर्वांसाठी सारखीच असली तरी दुखाची परी (?) प्रत्तेकासाठी वेगवेगळेच रूप घेऊन येते. त्यामुळेच कदाचीत प्रत्तेकजन आपल्याला भेटलेल्या दु:खाच्या परीचे वर्णन एकमेकाजवळ करीत असेल.&lt;br /&gt;अश्याप्रकारे सर्वांना वाटल्यामूळे दु:ख कमी होते असेही नाही. खरंतर प्रत्तेकाने आपल्यावाट्याचे दु:ख भोगूनच पार केले पाहीजे. आणि जो भोगतो तो बोलत नाही.&lt;br /&gt;परंतू सर्वच दु:खं भोगून पार करता येण्यासारखी नसतात. काही दु:खांना आदि- अंतच नसतो. काही दु:खांना ना रंग-रुप असते ना आकार. अशी दु:खं भोगून पार करता येत नाहीत. मग अशी दु:खं आयुष्यभर साथ करतात.अगदी अश्वथाम्याच्या जखमेसारखे. जन्मभर जखम भरत तर नाही आणि चिरंजीवीत्वाचा वर पण आहे.&lt;br /&gt;अशी दु:खे सोसणारी मानसं आपल्या भोवती सुध्दा असतील पण त्यांचे दु:ख आपल्याला दिसत नाही आणी ते आपल्याला जाणवू देत नाहीत. ते शब्दात प्रकट करण्यासारखे नसतेच. कधी कधी ते फक्त जाणवते पण दिसत मात्र नाही.&lt;br /&gt;अशी दुखं भोगणारी माणसं बाहेरुन जरी आनंदी दिसत असली तरी आतून अनंत दु:खाने होरफळत असतात. सुर्य नाही का बाहेरून प्रकाशाचा तेज:पूंज दिसतो पण त्यासाठी त्याला स्वत:च्या अस्तित्वाचा कण-कण जाळून घ्यावा लागतो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-2206048641054019663?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/2206048641054019663/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_11.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/2206048641054019663'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/2206048641054019663'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_11.html' title='२३. दु:खाची परी'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-7826336500039841170</id><published>2010-09-09T15:30:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:47:25.542+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marathi blogs'/><title type='text'>२२. बोलण्याच्या त-हा</title><content type='html'>एकेकाची बोलन्याची स्वत:ची अशी खास स्टाईल असते.&lt;br /&gt;त्यांची स्टाईल त्यांना शोभतेही. आपण त्याची स्टाईल वापरु शकत नाही. ती एका दिवसात आत्मसातही होत नाही त्याला वर्षानुवर्षे सराव असावा लागतो.&lt;br /&gt;आमच्या गल्लीत राहणारा आबा कधीही आपले गाव सोडून बाहेर गेला नाही. तरुणपणात त्याच्या बैलाने त्याच्या एका पायाच्या मांडीत शिंग घुसविले होते त्यामुळे त्याला आता कुबडीशिवाय चालताही येत नसे. पण "तुम्हाला सांगतो" अशी सुरवात करत आबाची गाडी दाबात सुटत असे. आबाची गाडी एकदा सुटली म्हणजे गल्लीतून दिल्लीपर्यंत धावत असे. कधी कधी ती जार्ज बुश यांच्या इराक धोरणापर्यंत जाऊन पोहोचत असे. दररोज नियमाने वर्तमानवर चर्चा आणि चौकात, पारकट्यावर उठबस या आपल्या अभ्यासावर आबाच्या बाता रंगत असत. आजूबाजूला कोण बसले की आबाची टकळी सुरु. कधीकधी त्या इतक्या रंगत की आजूबाजूला बसलेले लोक आपली कामं विसरुन तिथेच बसून राहत असत. पण त्यामध्ये नेहमीचे लोक असले की ते कधी उठून गेलेले आबाला कळतच नसे. त्याचे आपले "तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगतो" सुरुच असायचे. एकदा तर आबा म्हणाला," तुम्हाला सांगतो, तेव्हा आम्ही जहाजावर कामाला होतो." " कधी, कॊणत्या हे प्रश्न विचारणे चुकीचेच होते पण तरी पण एकाने विचारलेच तर आबा म्हणाला," तेव्हा तुम्ही लहान हुतासा. जहाज वाटंत बंद पडले की ते ढकलायचं काम आम्ही करीत हुतो. तेव्हा जहाजावर लय मजा केली." आबानं त्याच्या कारकिर्दीत गावातील ९५१८ नंबरची सारखी बंद पडणारी गाडी पाहीली होती त्यावरून त्याने ही कथा जोडून पुढे सांगायला सुरु केलेली असायची.&lt;br /&gt;गावातील आनखी एक आसामी दौलती पाटील. हे गावातील प्रगतीशील शेतकरी आहेत व त्यांची तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या गावाला (त्यांच्या शब्दात) दिवसाला डेली येजा असते. कधी बाजाराच्या निमित्ताने तर कधी इतर कारणाने ते नेहमी बिझी असतात व त्यांची आसपासच्या पंचक्रोशीतील गावात बरीच ओळखपाळख आहेत. कार्यालयीन कामे असोत लाईटबोर्डतील कामे असोत ते पुढे होऊन ही कामे लोकांना करुन देतात. या त्यांच्या बिझी दैनंदिनीमुळे त्यांच्या वापरात बरेच विंग्रजी शब्द आले होते व त्यांनी त्या शब्दांना आपल्या पध्दतीने आपल्या बोलण्यात समाविष्ट केले होते. त्यांचे बोलणे आधीच आघळपघळ त्यात या विंग्रजी शब्दांचा भरणा त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकणारावर छाप पाडायचे.&lt;br /&gt;एकदा त्यांनी एकेठीकाणी ऐकले ते वाक्य बहुदा असे असावे " त्या अमक्यातमक्याला काही ’सेंन्स’च नाही." त्यातील सेंन्स हा शब्द दौलतीकाकांना खुप भावला व तो त्यांनी उचलला. त्याच्या अर्थापर्यंत जाण्याची तसदी काकानी घेतली नाही. त्यांनी आपल्या परीने त्या शब्दाला न्याय दिला. " काय काका कुठे बाजारात गेलता काय?" या प्रश्नाला काकांचे मार्मिक उत्तर मिळत असे," काय तेच्या आयला त्या बाजाराच्या ! आजकाल बाजारात काय "सेक्स"च राहीला नाही." काकाने सेन्स हा शब्द सेक्स असा घेतला होता. पुढे लग्नातून परतल्यावर काका म्हणे," काय त्या नवरी म्हनना-या पोरगीला सेक्सच नाही." खरतर त्यांना "सेन्स" हा शब्द लक्षात राहीला नाही आणि जो शब्द लक्षात राहीला तो "सेक्स" त्याचा अर्थही काकांच्यापर्यंत पोहोचला नाही. मग काकानी सेक्स हा शब्द ब-याच विशेषनांसाठी समानार्थी शब्द म्हणून वापरायला सुरवात केली. राजकारनाला सेक्स नाही, बायकोला सेक्स नाही, धंद्याला सेक्स नाही इ. इ. बरे काकांना हे चुकतय हे सांगण्याची सोय नाही. सांगणा-याच्या बाचं बारसं काकांनी जेवलेलं असते. या काकाला बोलन्याचा काय सेन्सच राहीला नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-7826336500039841170?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/7826336500039841170/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_09.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/7826336500039841170'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/7826336500039841170'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_09.html' title='२२. बोलण्याच्या त-हा'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-297376786416233751</id><published>2010-09-07T14:36:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:46:57.227+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निवडूंग'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='nivadung'/><title type='text'>२१. निवडूंग</title><content type='html'>"निवडूंग" हा चित्रपट मी पहिल्यांदा इयत्ता सहावी किंवा सातवीत असताना पाहीला होता. त्या काळात दुरदर्शनवर रविवारी किंवा शनिवारी लागणारा चित्रपट हा सिनेमा पाहण्याचा एकमेव उपलब्ध स्त्रोत होता. चित्रपटातील बाकीचे काही लक्षात राहीले नाही पण डोक्यावर गोल टोपी घालून नी मैने प्यार कियाच्या सलमान खान प्रमाणे हावभाव करुन गाने म्हणणारा नायक मराठीत आहे एवढच लक्षात राहीले." तू हिरवी कच्ची .... " ह्या त्या वयात बे-अर्थी वाटणा-या गाण्याच्या ओळीही मनात कोठेतरी घुमत होत्या.&lt;br /&gt;त्यानंतर जवळजवळ पंधरा-सोळा वर्षांनी मला तो सिनेमा पुन्हा" सह्याद्री" वाहीनीवरच पहायला मिळाला. आपल्या मनात कुठेतरी घर करुन बसलेला सिनेमा तो हाच या गोष्टीचा मला प्रथम खुप आनंद झाला. चित्रपटाचे नाव जसे समजले तसे मी त्याची गाण्याची कॅसेट मिळवली. मला या चित्रपटाबद्दल काय सांगू नी काय नकॊ असे झाले आहे.&lt;br /&gt;पुढे जाण्याअगोदर प्रथम याच्यातील गाण्यांविषयी बोलायला मला आवडेल.&lt;br /&gt;ग्रेस, सुरेश भट, शांता शेळके, आरती प्रभू अशा कविंनी लिहिलेल्या कवितांना पंडित -हदयनाथ मंगेशकरांनी खुप सुरेख असे संगीत दिले आहे. घर थकलेले संन्याशी, ती गेली तेव्हा, वा-याने हलते रान ही गाणी ऐकल्यावर एक गूढ आणि हवेहवेसे वाटणारे वातावरन आपल्या मनात तयार होते. केव्हा तरी पहाटे, लवलव करी पातं, तू तेव्हा तशी, ना मानोगे तो ही गाणी तशी चित्रपटाच्या कथेनुरुप येतात. यातील गाणी पहिल्यांदा ऐकल्यावर तितकीशी लक्षात राहत नाहीत आणि आवडतील अशीही नाहीत पण दुर-यांदा तिस-यांदा ऐकल्यावर त्याची खरी खोली लक्षात येते आणि आवडल्याशीवाय राहणार नाहीत.&lt;br /&gt;कथानायक दामू एक नाटकसंस्थेत पडेल ती काम करणारा असा इमेज असणारा पण तरतरीत, नाटकात काम करण्याची उर्मी बाळगून असलेला युवक असतो. हा युवक रविंद्र मंकणीनी खुप मन लावून रंगविलेला आहे. नायकाच्या वडीलांकडून नाटकाचे व्यसन पुढे त्याच्याकडे आलेले असते. कोकणातील एका सुंदर गावात साध्या घरात एकटीच राहुन आपल्या नव-याच्यापश्चात उरलेला फाटका तुटका पण नेकीचा संसार सांभाळणा-या त्याच्या आईला हे माहीत नसते व तो नाटकाकडे वळू नये हीच तीची इच्छा असते. नाटकाच्या शौकाखातर आपल्या संसाराची झालेली धुळधान तीने सोसलेली असते. आपला मुलगा तिकडे शहरात मोठा साहेब म्हणून मिरवतो आहे पण आपल्या आईला विसरलेला नाही या गोष्टीचे तिला अप्रुप असते व ती त्याच खुषीत असते. त्याच्या लग्नाविषयी स्वप्ने पहात राहते.&lt;br /&gt;इकडे नायक दामू मात्र निर्मात्यासह सेटवरच्या सगळ्यांची पडेल ती कामे करत असतो. कधीतरी आपल्याला काम करण्याची संधी मिळेल म्हणून काम करता करता स्वत:ची स्वगते तयार करत असतो. वडीलांची स्वगते म्हणन्याची लकब अभिनिवेश त्याच्यामध्ये जन्मजातच असतो. एकीकडे दुर्दम्य इच्छाशक्तीने भरलेली स्वगते म्हणायची व दुसरीकडे इतरांकडून हेटाळणीची बोलणी ऐकायची त्यामुळे तो एकाद्या निवडूंगासारखा बनलेला असतो. दामू चहा आण, दामू कपडे इस्त्री कर यामध्येच आपले आयुष्य जाणार की काय असे वाटत असतानाच नायिका चित्राची एंट्री होते. नायिका चित्राची भुमिका अर्चना जोगळेकर यांनी केलेली आहे तो त्यांचा पहिलाच चित्रपट असावा.&lt;br /&gt;चित्रा ही एक सुंदर नृत्यपारंगत पण एकूणच जगाच्या व्यवहारांपासून अनभिज्ञ युवती असते. ती आपल्या मावशी म्हणवून घेणा-या नाटक क्षेत्रातील जुन्या कलावंतीनीच्या सहायाने निर्मात्यापर्यंत पोहोचते. तेथेच तीची आणि निर्मात्याचे जोडे उचलणारा दामूची ओळख होते.&lt;br /&gt;काही प्रसंगानंतर त्यांच्यात एक गुढ असे नाते बनते ज्याला प्रेम असे म्हणता येणार नाही. मात्र एका अनपेक्षीत वळणाने ते दोघेही दामूच्या गावातील घरी पोहोचतात. तेथे आईसमोर त्यांना नवरा बायको असल्याचे नाटक करावे लागते. नाटक करता करता चित्रा खरोखरच दामूच्या प्रेमात पडते व त्याच्याबरोबर नेहमीसाठी राह्ण्याची इच्छा दर्शवीते. पण दामू त्याला नकार देतो व हे फक्त नाटकच असल्याचे तिला सुनावतो. स्वत:ला सिध्द केल्याशिवाय किंवा जिंकल्याशिवाय चित्राचा स्विकार करणे त्याच्या स्वाभिमानी मनाला रुचत नाही.&lt;br /&gt;चित्रपटाचा शेवट गोडच आहे पण त्यापुर्वी एकून एक सर्वच रस रंगांत हा चित्रपट गुंफलेला आहे.&lt;br /&gt;चित्रपटातील सर्वांच्याच अभिनयाला १०० पैकी १०० गुण द्यावे लागतील. शं. ना. नवरेंची उत्कृष्ठ कथा, त्याला लाभलेले महेश सातोसकर यांचे प्रगल्भ दिग्दर्शन यामूळे चित्रपटाची उंची खुपच वरच्या दर्जाची वाटते. बाकी सर्व विसरले तरी मुलावर भरभरुन प्रेम करणारी आई कधी काळी विसरली जाईल असे मला तरी वाटत नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-297376786416233751?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/297376786416233751/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_07.html#comment-form' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/297376786416233751'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/297376786416233751'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_07.html' title='२१. निवडूंग'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-3425390788285421723</id><published>2010-09-05T16:00:00.002+05:30</published><updated>2011-09-28T16:45:23.213+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='छंद'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आमचे गुरुजी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='क्रिकेट'/><title type='text'>२०. एकेकाचे छंद</title><content type='html'>इयत्ता तिसरीपासून आम्हाला क्रिकेटचा नाद लागला.&lt;br /&gt;तेव्हा आम्हाला मानकापुरेगुरुजी शिकवत होते. होय आम्ही गुरुजींना गुरुजी ब बाईंना बाई असेच म्हणत असू. आजकाल प्राथमिक शाळेतील शिक्षक स्वत:ला ’सर”मॅडम’ असे म्हणवून घेतात. (आता डि.एड. इयत्ता बारावीनंतर झाले आहे व खर्चही खुप होतो)&lt;br /&gt;आमच्या गुरुजींना क्रिकेटचा खुप नाद होता आणि रेडिओवर क्रिकेटचे समालोचन ऐकणे हा त्यांचा छंद होता. आमच्या घरात जुना डर्बी कंपनीचा रेडिओ होता. ( कंपनीचे नाव मला इयत्ता सहावी किंवा सातवीत आल्यावर वाचायला आले आणि तोपर्यंत रेडीओ उत्तम स्थितीत कार्यरत होता) आमचे घर शाळेपासून जवळ होते, त्यामुळे गुरुजी मला कधीकधी घरुन रेडीओ आणायला लावत असत. रेडिओ कानाला लावून ते त्यावरील गोंगाटाने भरलेले समालोचन ऐकत असत. वेंगस्कर (की वेंगसरकर) व मोहिंदर अमरनाथ नुकतेच खेळपट्टीवर थोडे स्थिरावले असून ते पाहून्या संघाच्या गोलंदाजीचा मुकाबला खुपच चांगल्यारितीने करत आहेत. आणि हा चेंडू डाव्या यस्टीपासून थोडा दुर जाणारा त्याला फटकाविले आहे ते गली आणि स्लिपच्या मधून, आणि भारताच्या खात्यावर जमा होत आहेत त्या दोन धावा. अशाप्रकारचे समालोचन आम्हालाही कधीकधी ऐकायला येत असे. एका कानाला रेडिओ लावून गुरुजी आम्हाला बे एक्के बे इत्यादी पाठ करुन घेत.&lt;br /&gt;काही वेळेला ते उमेशला व मला पोष्टात पाठवत असत. सोबत एक चिठ्ठी देत बहुदा कोरीच असायची व ती पोष्टमास्तरांना देण्याविषयी सांगितलेले असायचे.&lt;br /&gt;पोष्टमास्तर नेहमी कामात असायचे त्यामुळे ती चिठ्ठी आम्ही त्यांच्याकडे देवून जवळच त्यांच्या घरी टिव्हीवर क्रिकेटची मॅच पाहत असू. ब-याच वेळाने त्यांना जेव्हा वेळ मिळेल किंवा आठवन होईल तेव्हा ते त्या चिठ्ठीवर काहीबाही लिहून देत व ते घेवून आम्ही शाळेत परतत असू. दरम्यान आमच्या क्रिकेटच्या ज्ञानात व वेडात थोडी थोडी भर पडलेली असायची. त्या चिठ्ठीवर लिहीलेला मजकूर म्हणजे क्रिकेटचा स्कोअर असायचा हे आम्हास उशीरा कळाले.&lt;br /&gt;त्यावेळी आजच्यासारखे कोणी शाळेसाठी टिव्ही घेवून दिला नाही ना रेडीओ. त्यामुळे त्यांना आपली आवड व हौस अशीच पुरवावी लागायची. तेव्हा हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करुन शाळाबाह्य भेटी वा केंद्रशाळेकडे जातॊ अशी कारणे सांगून शाळेला दांडी मारण्याची पध्दतच नव्हती. तेव्हाचे शिक्षक बाहेर कमी व शाळेतच जास्त भेटत असत. रविवारीसुध्दा आम्ही शाळेजवळ खेळायला भ्यायचो कारण कोणते ना कोणते गुरुजी शाळेकडे येऊन जात असत. बहुदा त्यांना शाळेशिवाय करमतच नसावे. असे गुरुजी आणि असा त्यांचा छंद.&lt;br /&gt;आमच्या या क्रिकेटवेडाला आनखी पाठबळ दिले ते चौथीत शिकवायला आलेल्या बाईंनी. मुळात आमच्या आवडत्या मानकापुरे गुरुजींची बदली होऊन त्याजागी आल्यामुळे त्या आम्हाला सुरवातीस आवडत नसत. या बाईंचे मला व उमेशला दर चारआठ दिवसांनी एक ठरलेले काम असायचे. गावात जावून सोनार आहे का ते पाहणे. आम्ही हे काम घेउन शाळेतून बाहेर पडायचो आणि थेट ग्रामपंचायतीच्या टिव्हीसमोर पोहोचत असू. त्यामुळे आमचे क्रिकेटविषयी प्रेम आनखी वृध्दिंगत झाले. बाईंनी सांगीतलेल्या सोनाराचे नाव आता मला आठवत नाही आणि त्यावेळीही शेवटपर्यंत आम्ही त्याचे घर शोधन्याची उठाठेव केली नाही. आम्हाला वर्गात अभ्यास करायला सांगून बाई स्वत: सोनाराकडे गेल्या नाहीत, त्यामूळे बाईंची सोने खरेदी राहून गेली असावी.&lt;br /&gt;सोने सोनार यापेक्षा पॅट्रीक पॅटरसन, रिचर्डसन, बून, जोन्स, हूपर, गावस्कर, किरन मोरे, गुंडाप्पा विश्वनाथ, गॅटींग, गुच्छ, इम्रान खान यांच्यातच आम्हाला खरा रस होता.&lt;br /&gt;आम्हाला सोनाराच्या घरपेक्षा क्रिकेटमध्ये जास्त रस होता आणि बाईंनापण सोने खरेदीपेक्षा शाळेतील उपस्थीती व शिकवणे यातच जास्त रस होता.&lt;br /&gt;अशा बाई आणि अशी त्यांची आवड.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-3425390788285421723?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/3425390788285421723/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_05.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3425390788285421723'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3425390788285421723'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post_05.html' title='२०. एकेकाचे छंद'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-344788294006003034</id><published>2010-09-03T16:48:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:45:10.195+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='हास्यप्रवास'/><title type='text'>१९. हास्यप्रवास- सुपरफास्ट मावशीबाई</title><content type='html'>बस क्रमांक ४४८७ बेळगाव-कोल्हापूर ही बस समोरच्या प्लाटफार्मवर उभी आहे, . . . अशी अनाउंसमेंट ऐकतच बसमध्ये चढलो.&lt;br /&gt;कागल बसस्थानकावर कोल्हापूरला जाण्यासाठी माझ्याबरोबर आणखी दोनतीन प्रवासी व एक उतारवयाची मावशीबाई होती. पैकी आम्हा कोणालाच बसण्यासाठी बाक उपलब्ध झाला नाही. मावशीबाईंनी मात्र आपल्या बोलक्या स्वभाचा फायदा करून घेत जागा पटकावली. एसटीचा दरवाजा पूढच्या बाजूने असल्यामूळे आम्ही पूढच्याबाजूने चढलो व पूढेच उभा राहीलो. मावशीबाईंची सीट मात्र अगदी मागच्या कडेला होती. मागच्या कडेला सीट असून देखील त्या बाईंनी आपल्या बाजाराच्या व काहीबाई भरलेल्या दोन पिशव्या अगदी निर्धोकपणे सोबत नेल्या होत्या. कंडक्टरने जाग्यावर बसूनच आम्हाला तिकीटे दिली. कदाचीत तो जागेवरून उठल्यावर आमच्यापैकी कोणी त्याची जागा पटकावेल याची त्याला भीती वाटली असेल. कंडक्टरने जाग्यावरूनच पण जरा कमावलेल्या आवाजात "आणखी कोणी तिकीटाचं राहीलयं काय?" असा दमदार सवाल केला. तो बहूदा मागच्या सीटपर्यंत ऐकू गेला असावा. कारण कांही वेळाने मागच्या बाकावरून तिकीटासाठी कोणीतरी पैसे पाठवले होते. हाफ तिकीटावरून ते तिकीट मावशीबाईचेच असल्याचे माझ्या द्यानात आले.&lt;br /&gt;एम आय डी सी चा स्टाप घेउन एसटी पूढे निघाली तेवढ्यात मागच्या बाजूने हाक ऐकू आली, " कंडक्टरसाहेब उजळाईवाडीला गाडी थांबवा."&lt;br /&gt;आवाजावरूनच ओळखले की हा त्या मावशीबाईचाच आवाज.&lt;br /&gt;कंडक्टरनेपण त्याच सूरात सांगितले " उजळाईवाडीला गाडी थांबत नाही."&lt;br /&gt;हे ऐकूण मावशीबाई लगोलग उठून आपल्या दोनदोन पिशव्या सांभाळत पूढच्या बाजूला आल्या आणि त्यांनी आपला ठेवणीच्या सूरात विचारले " का हो कंडक्टरसाहेब, उजळाईवाडीला गाडी का थांबत नाही?"&lt;br /&gt;" ही गाडी सूपरफास्ट हाय, अधीमधी कुठंबी थांबत नाही?"&lt;br /&gt;"आदी.. मदी.. कुठबी नाही?"&lt;br /&gt;"नाही"&lt;br /&gt;"म्हंजे, उजळाईवाडीला गाडी थांबनार नाही?"- मावशीबाई&lt;br /&gt;"आता मावश्ये काय कानडी भाषेत सांगू का कागदावर लिहून देउ?" कंडक्टरचा पारा चढला.&lt;br /&gt;"कंडक्टरसाहेब, उजळाईवाडीला गाडी थांबलीच पाहीजे?"&lt;br /&gt;"का?"&lt;br /&gt;" नाही म्हंजे उजळाईवाडीला एवढंमोठ्ठं इमान थांबतय आणि ह्यो लाल डब्बा थांबत नाही म्हंजे काय?"&lt;br /&gt;गाडीत एकच हश्याचा लोट उठला. ऐकणारा प्रत्तेकजण हसत होता. तोच डायलाग पून्ह:पून्हा सांगून सांगून जो-तो हसत होता. हास्याच्या लाटा पूढच्या बाजूपासून मागच्या कडेपर्यंत पोहोचल्या.&lt;br /&gt;वातावरण निवळले.&lt;br /&gt;मावशीबाईचं म्हणणे खरे होते.&lt;br /&gt;उजळाईवाडीजवळच कोल्हापूरसाठीचे विमानतळ आहे.&lt;br /&gt;तिथे विमान थांबते हे तिला माहीत होते. पण तेथे विमान ’उजळाईवाडीला’ उतरावे म्हणून कंडक्टरने बेल दिलेली नसते हे तिला कसे कळणार ?&lt;br /&gt;पण झालेल्या विनोदामूळे वातावरणात एकदम बदल झाला आणि कंडक्टरसाहेबांनी उजळाईवाडीला गाडी थांबवली. सगळ्या एसटीने मावशीबाईंना हास्यपूर्ण निरोप दिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवासात जर आपणही असा हलकाफुलका स्वभाव धारण केला तर प्रत्तेक प्रवास असाच होईल व आपण ही आपल्या ’उजळाईवाडीला’ मजेमजेत पोहचू.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-344788294006003034?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/344788294006003034/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/03/blog-post_25.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/344788294006003034'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/344788294006003034'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/03/blog-post_25.html' title='१९. हास्यप्रवास- सुपरफास्ट मावशीबाई'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-8124333196138220104</id><published>2010-09-01T14:37:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:44:56.612+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अमृतवलय'/><title type='text'>१८. हरीची इच्छा</title><content type='html'>वि.स. खांडेकरांची "अमॄतवलय" वाचून मला आता कमीतकमी पंधरा वर्षे झाली असतील.&lt;br /&gt;कादंबरीत सुरवातीलाच एका नवयुवकाचा अपघाती मृत्यू होतो. जो एका विमानाचा वैमानिक असतो . त्याचे एका सुंदर मुलीशी लग्न ठरलेले असते जिच्यावर त्याचे खुप प्रेम असते. तो एका आईचा एकुलता एक पुत्र असतो.&lt;br /&gt;ही आई एक देवभोळी साधी स्त्री असते. तिला संसारापलिकडचे कांही माहीत नसते. आपले लहानसे कुटूंब हेच तीचे जग असते. आणि त्यापलिकडे राहीलेले असेल ते म्हणजे तुळशीवृंदावनात रमणारा तो तीचा श्रीकृष्ण परमात्मा ज्याला ती " हरी" असे संबोधत असे.&lt;br /&gt;तीला ही हृदयद्रावक घटना कोण व कशी सांगणार हा प्रश्न घरातील प्रत्तेकाला पडलेला असतो. आपल्या एकुलत्या मुलाच्या लग्नाच्या स्वप्नात ती रममान आहे तीला त्याच मुलाच्या मॄत्यूची बातमी कशी सांगणार?&lt;br /&gt;पण जेव्हा तीला ही घटना समजली तेव्हा ती फक्त इतकेच म्हणाली," हरीची इच्छा".&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या दोनच शब्दांनी तीच्यावरच्या दु:खाची लाट परतावून लावली. रडणे नाही की किंचाळणे नाही. "नहीं, ये नही हो सकता" हा फिल्मी डायलाग नाही. फक्त दोनच शब्द आणि बात खल्लास.&lt;br /&gt;काय त्या दोन शब्दांची ताकत असेल.&lt;br /&gt;ताकत त्या शब्दात नाही.&lt;br /&gt;ताकत आहे त्यामागच्या व्यक्तीच्या भावनेची,&lt;br /&gt;श्रध्देची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परमेश्वरावरील अतुट श्रध्दाच असे असहनीय दु:ख सहन करण्यास बळ देते. जे काय होते ते त्याच्याच इच्छेने यावर ज्याची श्रध्दा असेल तो उगाच रडत विव्हळत बसणार नाही. आणि जो जीवनातील साधारण गोष्टीसाठी नशिबाला व इतरांना दोष देतो, परमेश्वराला दोष देतो, तो कसला भक्त?.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी तर म्हणेन ज्याला पावसाळ्यात पाऊस व उन्हाळ्यात ऊन आवडत नाही तोही भक्त नाही. भक्त तोच जो स्वाभाविकपणे जगतो जे काही मिळेल त्याबद्दल त्याच्या मनात परमेश्वराबद्दल आभारच उत्पन्न होईल. त्यालाच श्रध्दा असे म्हणायला हवे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रध्दा काय असते म्हणून कोणी विचारले तर मी हीच घटना त्याला सांगेन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(अजूनतरी कोणी मला विचारलेले नाही. कदाचीत श्रध्दा हा विषय दुर्मिळ बनत आहे)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-8124333196138220104?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/8124333196138220104/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/8124333196138220104'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/8124333196138220104'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/09/blog-post.html' title='१८. हरीची इच्छा'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-2808348886375226357</id><published>2010-08-29T14:33:00.003+05:30</published><updated>2011-12-19T14:50:36.287+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marathi blogs'/><title type='text'>१७.काय भुललासी वरलीया रंगा</title><content type='html'>प. पु. श्रीकृष्णमहाराज देशमुख हे मुरगुड येथील सुप्रसिध्द हरी-भक्त-परायन प्रवचनकार असून अमेरीकेतही त्यांची प्रवचने झाली आहेत असे ते स्वत: सांगतात. काही दिवसांपुर्वी त्यांचा खुप मोठा सत्कार समारंभही करण्यात आला.&lt;br /&gt;पुढील घटनेला आता बरीच वर्षे झाली असतील.&lt;br /&gt;प.पु.श्रीकृष्णमहाराज देशमुख हे आमच्या गावात हरीनाम सप्ताहात प्रवचनाकरीता आले होते. प्रवचन सुरु असताना बोलता बोलता विषय आला होता, "प्रभूची लिला अगाध आहे". प्रभूची लिला अगाध आहे हे पटवून देण्यासाठी त्यांनी आपल्याच जीवनातील दाखले देण्यास सुरवात केली.एकदा ते म्हणे आदमापूरजवळच्या एका खेड्यात प्रवचनाकरीता चालले होते व वाटेत त्यांची कार बिघडली ( म्हणजे महाराज नेहमी कारने प्रवास करतात हे सर्वांना समजले पाहीजे). प्रवचनाच्या ठिकाणी त्यांना पोहचण्यास वेळ झाला. समजा हेच जर अमेरिकेत घडले असते तर ते पर्यायी वाहनाने वेळेवर पोहोचले असते हे सांगायला ते विसरले नाहीत. ( त्याशिवाय आम्ही अमेरिकेला गेलो होतो हे जनतेला कधी कळणार?) प्रवचनाच्या ठिकाणी जेव्हा ते पोहोचले तेव्हा तेथे खुद्द विठ्ठल परमात्मा स्वत: प्रवचन देत होता आणि तेही प. पु. श्रीकॄष्णमहाराजांच्या रुपात. अशानासे आणि अशान असे. खरोखर परमेश्वराची लिला अगाध आहे. मी ही गोष्ट खोटी आहे किंवा असे घडणे अशक्य आहे असं म्हणणार नाही कारण जो परमेश्वर भक्ताच्या ह्ट्टाखातर सुईच्या नाकातून हात्ती पार करु शकतॊ तो स्वत: प्रवचन करुन भक्तांचे कान तॄप्त करण्याची संधी सोडेल कसा? पण महाराजांनीही या गोष्टीतून स्वत:चा ढोल स्वत: बडवून घ्यायची संधी सोडली नाही. महाराजांच्या भक्तीच्या महीमेपुढे विठलाचा महीमाही थोडा कमीच पडल्याचा भास माझ्यासह सर्व श्रोत्यांना झाला. महाराजांच्या मागे एखादे तेजोवलय फिरत असल्याचा भास होवू लागला. प्रवचनात आणखी अनेक दाखले ऐकायला मिळाले ज्यातून लोकांचा परमेश्वराच्या अगाध लिलेवर विश्वास द्रुढ झाला. त्याही पेक्षा जास्त महाराजांचा महीमा अधोरेखित झाला.&lt;br /&gt;प्रवचन संपल्यावर मी महाराजांचे दर्शन घेण्याकरीता गेलो.&lt;br /&gt;मी त्यांना म्हणालो, "महाराज, मला तुमचे प्रवचन आवडले. तुम्ही आपल्य़ा प्रवचनांमध्ये ओशोंनी सांगितलेल्या छोट्याछोट्या कथा सांगत जा त्यांच्यामुळे लोकांपर्य़ंत आपले ज्ञान पोहचविणे सोपे जाईल." ओशोंचे नाव ऐकल्यावर महाराजांना अंगावर पाल पडल्याप्रमाने वाटले ते म्हणाले," छे छे, मला त्या नावाचीच ऍलर्जीच आहे मी त्या मानसाचा तिरस्कार करतो."&lt;br /&gt;मला महाराजांच्या प्रतिक्रियेचे आश्चर्य वाटले नाही. मी म्हणालो, "महाराज, आपण तर व्यवसायाने डॉक्टर आहात, तेव्हा आपल्याला हेही माहीत असेल की ऍलर्जी हा प्रत्तेकाचा आंतरीक दोष आहे, त्यासाठी त्या स्पेसिफिक पदार्थाला वा वस्तूला दोष देण्यात काय अर्थ नाही, आपल्याला असलेली ऍलर्जी दुर करुन स्वत: दोषमुक्त होणे कधिही चांगले, नाही का?"&lt;br /&gt;ऒशोंना नावे ठेवण्यात काय अर्थ आहे. त्यांच्या प्रवचनातील चांगल्या चांगल्या कथा दाखले वापरायला काय हरकत आहे. आपल्या संत चॊखामेळाने म्हंटल्या प्रमाणे " ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी व्ररलीया रंगा..." व्यक्ति कोणीही असो लहान-थोर, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अडाणी, भक्त, अस्तिक-नास्तिक त्याचा विचार महत्वाचा त्याच्याकडून मिळणारे ज्ञान महत्वाचे आहे मानले पाहीजे असं मला वाटतं.&lt;br /&gt;कबीर म्हणतात,&lt;br /&gt;" जाती न पुछो साधुकी पुछ लीजीये ज्ञान,&lt;br /&gt;मोल करो तलवारका पडी रहन दो म्यान"&lt;br /&gt;&lt;br /&gt;(टीप: महाराजांचे अनेक शिष्यगण आहेत त्यांना ही कथा किंवा घटना नवीन असेल व त्यामुळे ते विचलीत वा दुखावले असतील तर त्याचे मला वाईट वाटेल. पण वास्तव सांगितल्याचा आनंदही होईल.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-2808348886375226357?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/2808348886375226357/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/08/blog-post_29.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/2808348886375226357'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/2808348886375226357'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/08/blog-post_29.html' title='१७.काय भुललासी वरलीया रंगा'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-6354623268634866381</id><published>2010-08-27T13:15:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:44:25.951+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marathi blogs'/><title type='text'>१६. जिंदगी अभी और यहीं ...</title><content type='html'>आपण जसा विचार करतो, तसेच आपण बनतो.&lt;br /&gt;आणि आपल्या जीवनात त्याच गोष्टी घडतात ज्यांची आपण कधीतरी इच्छा केलेली असते. असं मला नेहमी वाटते.&lt;br /&gt;कधी त्या घटना विचार केल्या नंतर लगेचच घडतात तर कधी उशीरा घडतात.&lt;br /&gt;आपण जेव्हा खुप बिझी असतॊ तेव्हा आपण म्हणतो की मला जरा स्पेस हवा आहे, थोडा निवांतपणा हवा आहे. आणि कालांतराने जेव्हा असा निवांतपणा मिळतो तेव्हा आपण त्याला लगेचच कंटाळून काही काम शोधू लागतो. कोणत्याही कामाशिवाय, हेतूशिवाय आपण राहूच शकत नाही. आपल्याला सुट्टी हवी असते पण तीही कामाच्या दोन दिवसांच्या मध्ये आली असली पाहीजे. आपण स्वत:ला नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. काही न करता राहणे हे आपल्याला केवळ अशक्य झालेले आहे कारण आपण सवयींचे गुलाम बनलेलो आहे.&lt;br /&gt;मला कोणीतरी एकदा झाडाखाली झोपलेल्या माणसाची गोष्ट सांगीतली होती.&lt;br /&gt;एका निर्जन जंगलात एक साधारण कपड्यातला मनुष्य़ एका जांभळाच्य़ा झाडाखाली निवांत झोपलेला असतो. जवळून जाणा-या पायवाटेवरुन एक व्यापारी त्याला असा निवांत पडलेला पाहून थांबतो. थोडावेळ थांबून निरीक्षण केल्यावर त्या व्यापा-याला या मनुष्याविषयी दया येते.  चार समजुतीच्या व खुप महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी त्याला तो उठवून जागे करतो. तो मनुष्य नाइलाजाने उठून बसतो तेव्हा हा व्यापारी त्याला म्हणतो,"अरे अक्कलशुन्य मनुष्या, मानवजातीला जन्माला येउन हा असा निवांतपणे पडला आहेस त्यापेक्षा काही काम का करत नाहीस?" मग तो मनुष्य विचारतो," काम केल्याने काय होईल?" व्यापारी म्हणतो," तुला खुप पैसा मिळेल, ज्यापासुन तुला बंगला गाडी खरेदी करता येईल, मस्त गाद्या वगैरे खरेदी करता येतील व मस्त आराम करता येईल, तू सुखी होशील." मग तो मनुष्य म्हणतो," महाशय खुप काम करुन खुप पैसा कमवून मग त्यानंतर सुखी होण्यापेक्षा व आराम करण्यापेक्षा मी आत्ताच सुखी आहे. आता आणि इथेच. आणि तुम्हाला पण तसेच सुखी होता येईल." असे म्हणून तो मनुष्य सुखाने पुन्हा आडवा झाला. व्यापा-याजवळ आता थांबायला वेळच नव्हता त्याला भविष्यातील आरामासाठी व सुखासाठी खुप पैसा कमवायचा होता व त्यासाठी खुप कष्ट करायचे होते. तो लेगेचच तेथुन मार्गस्त झाला.&lt;br /&gt;त्या व्यापा-याच्या विचारांप्रमाने आज आपली स्थिती आहे. आपण आजमध्ये कधी जगूच शकत नाही. आपण फक्त उद्यामध्येच जगू शकतो. आपण धावत आहोत कशाच्यातरी मागे आणि आपला "आज" जगायचाच राहून जातो. आपल्या हे लक्षात येत नाही की ज्या उद्यासाठी आपण आज धावत आहोत तो उद्याही जेव्हा येईल तेव्हा तो ’आज’च्याच रुपात येईल आणि आपण तेव्हाही त्याला जगायचे 'मिस' करू.&lt;br /&gt;तेव्हा आपण आजमध्येच जगायला शिकले पाहीजे. आत्ताचाच क्षण खरा म्हणायला हवा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"क्योंकी, जिंदगी अभी और यहीं है."&lt;br /&gt;&lt;br /&gt;हरी ओम तत्सत&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-6354623268634866381?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/6354623268634866381/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/08/blog-post_27.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/6354623268634866381'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/6354623268634866381'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/08/blog-post_27.html' title='१६. जिंदगी अभी और यहीं ...'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-8258921903430862536</id><published>2010-08-25T16:54:00.002+05:30</published><updated>2011-09-28T16:43:53.710+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बबन्या'/><title type='text'>१५. बबन्या</title><content type='html'>बबन्या हे आमच्या गावचे आनखी एक पात्र आहे.&lt;br /&gt;त्याला लोक आदराने "इद्दरकल्याणी बबन्या" असे म्हणतात पण त्याबद्दल त्याला कसलाही अहंकार नाही.&lt;br /&gt;बबन्याच्या अनेक करामती गावात प्रसिध्द आहेत.&lt;br /&gt;याला प्राण्यांबद्दल भलतेच आकर्षण आहे. तशी गावातल्या खुप कमी मानसांच्याबरोबर त्याची गट्टी जमते. कारण बबन्यानं सांगितलेल्या कान्या सगळ्य़ांच्या पचनी पडतीलच असे नाही. त्यासाठी आपला ऐकण्याचा कोटा जाम पाहीजे.&lt;br /&gt;बबन्याने म्हणे एकदा मासा पाळला होता. तो फक्त पाण्यात राहणारा व कालांतराने मरून जाणारा साधा मासा नव्हता. बबन्याचा मासा बबन्याबरोबर बोलतही असे. बबन्याच्या सुख- दुखा:त सामील होत असे. बबन्या जर कधी थकून काही न करता गप्प बसला असेल तर त्याला आनखी करामती करन्यास हा मासाच प्रोत्साहन देत असे.&lt;br /&gt;त्या माशाचे पुढे काय झाले रे बबन्या असे विचारल्यावर बबन्याचे डोळे आजही भरुन येतात. एकदा तो मासा आजारी होता. बबन्या म्हणे त्या माशाला घेऊन फिरायला गेला होता. फिरत फिरत ते नदीच्या पुलावर पोहोचले. बबन्याने माशाला स्वत:ला सांभाळण्या विषयी सुचना केली पण दुर्दैव. अचानक घसरून तो मासा नदीच्या पाण्यात पडला व बुडून मेला. बिच्चारा मासा !.&lt;br /&gt;पुढे या घटनेतून सावरल्यावर बबन्याने एक पांढरे शुभ्र मांजर पाळले होते.&lt;br /&gt;बबन्याच्या लाडाने लाडावल्यामुळे ते मांजर भलतेच गुबगुबीत झाले होते. ते मांजर बबन्याच्या गैरहजेरीत गल्लीत फिरुन सगळ्यांची दुधाची भांडी तपासत होते.&lt;br /&gt;एक दिवस मी काहीतरी आणायला दुकानात चाललो होतो तर बबन्या आपल्या मांजराला मन लावून साबनाने धूत होता. मी विचारले तेव्हा म्हणाला कसा," अहो, पिसवांनी भरलय नुसतं कुठल्या मांजरीकडं जावून गुण उधळून आलय कुणाला ठावं? रंग पार विटल्यागत झालाय "&lt;br /&gt;"मग असं धुवून काय होणार?"&lt;br /&gt;"असं म्हणजे, मी त्याला तासभर त्या एरीयलमध्ये भिजत घातला होता. सारखं बाहेर येत होतं म्हणून गळ्यात एक धोंडाच बांधल्याला, मग गप्पगार बसलं हुतं."&lt;br /&gt;"आरं पण ते मरल अशानं"&lt;br /&gt;" मरतयं कशानं, जावा आपला धंदा बगा मला ग्यान शिकवू नका" असं म्हणून त्यानं जोरान त्याला बादलीत घुसळून काढला.&lt;br /&gt;एकंदर मागील अनुभव पाहता, मी त्याला काही सांगण्याच्या भानगडीत पडलॊ नाही.&lt;br /&gt;मी दुकानातून परत मागे येत होतो तेव्हा बबन्या मांजराला धरुन रडत बसल्याला.&lt;br /&gt;"कारे बबन्या आता का रडतोस ? सांगितल्यालं पटत नव्हतं, मांजराला असं धुवू नकॊ म्हणून"&lt;br /&gt;बबन्यानं डोळे पुसलं आणि रागानं म्हणालं," धुतानं नाही, पिळून तारेवर वाळत घालतानं मेलं" आणि पुन्हा, "माझा बोकाआआआ" असं म्हणून रडायला लागलं.&lt;br /&gt;आनखी एकदा बबन्या सकाळी सकाळी नळाखाली जाळी धरुन बसल्यालं दिसलं.&lt;br /&gt;मी विचारलं, "काय करतोस रे बबन्या हे जाळी धरुन?"&lt;br /&gt;तर म्हणाला," मासं धरतोय".&lt;br /&gt;मी म्हणालो,"अरे वेडा आहेस काय? नळाच्या पाण्यात कधी मासं सापडत्यात काय?" तरी काही न बोलता तो तसाच बसून राहीला.&lt;br /&gt;थोड्य़ा वेळाने मी पुन्हा तिथे आलो तेव्हा बबन्या चौकात पोरांसंगे गप्पा मारत बसला होता.&lt;br /&gt;मी त्याला विचारले," कायरे किती मासे सापडले नळाच्या पाण्यात?"&lt;br /&gt;तेव्हा तो मोठ्यांदा हसू लागला, पाठोपाठ सगळेच हसू लागले. मग हसू आवरुन बबन्या मलाच म्हणाला,"अरे वेडा आहेस काय? नळाच्या पाण्यात कधी मासं सापडत्यात काय?" &lt;br /&gt;&lt;br /&gt;आनखी बबन्या पुन्हा कधीतरी.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-8258921903430862536?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/8258921903430862536/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/08/blog-post_25.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/8258921903430862536'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/8258921903430862536'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/08/blog-post_25.html' title='१५. बबन्या'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-3608360407952716133</id><published>2010-08-19T15:09:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:43:40.278+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marathi blogs'/><title type='text'>१४. भक्त देवाचा की फक्त मानाचा</title><content type='html'>आमच्या गावात दरवर्षी महाशिवरात्रीच्या अगोदर ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताह साजरा केला जातो. त्या दरम्यान दररोज नामवंत लोकांचे प्रवचन किर्तनाचे कार्यक्रम होत असतात. गावातील हौसे-गवसे-नवसे लोक त्याचा लाभ घेतात. कोण सायंकाळी प्रवचन ऐकायला जातो तर कोण रात्री किर्तनाचा आनंद घेतो. कांही नेहमीचेच माळकरी-वारकरी व नवीन विद्यार्थीवर्गातील मुले, तरुण, तरूणी ज्ञानेश्वरी पारायणाकरीता जमतात.&lt;br /&gt; &lt;br /&gt;सातशे वर्षापुर्वी निर्मीत झालेल्या ज्ञानेश्वरीचे आजही त्याच भक्तिभावाने वाचन केले जाते. दरवर्षी नवनवीन लोक या कार्यक्रमात भाग घेतात. मीही दोनवेळा ज्ञानेश्वरी पारायण केले आहे. पण मला त्यादरम्यान काही गोष्टी लक्षात आल्या त्या अशा. जे लोक पारायणाला बसतात ते ज्ञानेश्वरीच्या अर्थापर्यंत कधीही पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत. ज्याला त्याला सात दिवसात ज्ञानेश्वरी वाचून पुर्ण करणे हेच महत्वाचे वाटते. त्यातील अनुभवी लोक तर फास्ट वाचनाची चढाओढ करतात व नवीन लोकांना आपले कसब दाखवीन्याचा प्रयत्न करतात. पण त्यापैकी कोणाला दुसरा अध्याय कशा विषयी आहे या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही.&lt;br /&gt;वाचनाच्या मध्ये एक ब्रेक असतो त्या दरम्यान हे वाचक लोक एकमेकांच्या टींगला करण्यात गुंतलेले असतात. आपण येथे आहोत म्हणजे आपण पुण्यवंत आहोत असाच कांहीसा त्यांचा व्यवहार असतो.&lt;br /&gt;इतकेच काय येणारे प्रवचनकारही त्याच वर्गातील असतात. प्रवचनाच्या ओवीत किंवा अभंगात निंदा करु नये, मानसा-मानसात भेदभाव करु नये असे असले तर ते खुप विस्ताराने पटवून सांगतात. आणि वर येथे आपले प्रवचन ऐकायला आलेले श्रोते हे पुण्यवान आहेत व बाकी सारे पापी आहेत हे अगदी किळसवान्या भाषेत सांगतात. येथे न आलेल्यांची निंदा नालस्ती करताना ते आपल्या प्रवचनाचा विषयही विसरतात.&lt;br /&gt; &lt;br /&gt;मुळातच या लोकांचा या कार्यक्रमाकडे पाहण्याचा दृष्टीकोण चुकीचा आहे असं मला वाटते. फक्त कार्यक्रमाबद्दलच नव्हे तर त्यांचे भक्तीमार्गाकडे वळणेच चुकीचे आहे असे वाटते.&lt;br /&gt; &lt;br /&gt;ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, भगवदगीता, रामविजयकथासार यांचे पारायण करण्यामागचा उद्देश त्यातून पुण्य मिळविणे हे नसून त्यांच्या वाचनातून व त्याच्या अनुनयातून आपल्या जीवनात बदल करणे हा आहे असं मला वाटतं. असत्त्याविरुध्द सत्त्याचा विजय दुर्गुनावर सदगुनांचा विजय यावर विश्वास दृढ व्हावा म्हणून हे ग्रंथ वाचाले पाहीजेत. आपल्या रोजच्या जीवनात चालण्याबोलण्यात योग्य तो बदल व्हावा म्हणून हे ग्रंथ हवेत. आपल्या बारीक सारीक निर्णयावर घटनांवर या ग्रंथांचा प्रभाव पडावा म्हणून हे ग्रंथ वाचले पाहीजेत.&lt;br /&gt; &lt;br /&gt;पण जर हे लोक स्वत:ला मुळातच आदर्श व्यक्ती म्हणवून घेत असतील तर मग हे बदल कसे होणार? आपण दिवसातून एकदा मंदीरात जातॊ म्हणजे आपण इतरवेळी कांहीही करायला मोकळे असंही काही जणांना वाटतं. खुपदा हे लोक मंदीरात उभाराहून एकमेकांच्या आई-वडीलांचा उध्दारसुध्दा करतात. यांना हे अधिकार कोणी दिले? मला वाटते त्यांचे त्यांनीचे हे मानून टाकले आहे की आपण देवाचे लाडके आहोत आणि काही करायला मोकळे आहोत.&lt;br /&gt; &lt;br /&gt;गुर्जिएफ नावाचा एक संत म्हणा किंवा एक महात्मा म्हणा होऊन गेला. त्याच्या आश्रमात प्रवेश करणा-यांना तो एक प्रश्न विचारत असे," तू स्वत:ला सज्जन समजतोस की दुर्जन?"&lt;br /&gt;" सज्जन" असे उत्तर आले की तो त्या माणसांना हाकलून लावत असे. तो म्हणे की सज्जनांचे इथे काय काम ? इथे दुर्जनांनाच प्रवेश मिळेल. इथे येऊन स्वत:ला दुर्जन समजणारांचेच सज्जन माणसात रुपांतर होईल. सज्जनांनी आपआपल्या संसाराच्या किंवा स्वत:च्या मार्गाने चालावे त्यांचे इथे काय काम नाही कारण ते तर अगोदरच सज्जन आहेत.&lt;br /&gt;तात्पर्य काय स्वत:ला कमी समजणारेच स्वत:ला बदलायला तयार असतात. हे आमचे लोक स्वत:ला अगदी पोहोचलेलेच समजतात मग ते कसे बदलनार. ते फक्त तोंडाने घोकंपट्टी करणार " हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी". हा हरीपाठाचा अभंगसुध्दा ते स्वत:साठी म्हणत नाहीत तर तेसुध्दा दुस-यालाच मार्गदर्शन केल्याप्रमाने म्हणतात ," अरे, हरी चे नामस्मरण कर त्यामध्ये भरपूर पुण्य आहे." स्वत:साठी हा अभंग जर एकदाही म्हंटला असता तर दुस-याच्या बांधाचे गवत किंवा ऊस कुणी चोरुन कापला नसता, दुधात पाणी मिसळले नसते. ज्याच्या मुखी अखंड हरीचे नाम आहे तो वाईट काम करूच शकत नाही. जर तुम्ही भक्तिमार्गातले असाल तर ते तुमच्या प्रत्तेक कृतीतून चालण्याबोलण्यातून दिसते. एकदातर कोणत्या प्रवचनकारांना आमंत्रण द्यायचे यावरून चर्चा सुरु होती. तेव्हा अमुक एकाला बोलवू नका ’तो रांडचा लई ताटतोय’ अशा भाषेत त्यांची आरती करण्यात आली. पुढे तेच प्रवचनकार जेव्हा आले तेव्हा हेच लोक त्यांच्या पायावर डोके ठेवायला पुढे. हे आता बस्स झाले. आपण लोकांना मुर्ख बनवता बनवता स्वत:लाही मुर्ख बनवत आहोत हे या लोकांना कधी समजणार देवच जाणे.&lt;br /&gt;(टीप: आमच्या गावातील सर्वच भक्तिमार्गातील लोकांविषयी वरील निरीक्षण खरे ठरेल असं नाही. कांही लोक आहेत ज्यांच्या भक्तिविषयी वा चांगुलपणा विषयी मनात शंकाही नाही पण मला मुख्यत: विसंगतीतच जास्त रस असल्यामुळे मी त्याबद्दल लिहीले आहेत.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-3608360407952716133?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/3608360407952716133/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/08/blog-post_19.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3608360407952716133'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/3608360407952716133'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/08/blog-post_19.html' title='१४. भक्त देवाचा की फक्त मानाचा'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-1114352112504501684</id><published>2010-08-17T13:30:00.000+05:30</published><updated>2012-01-03T16:07:19.608+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marathi blogs'/><title type='text'>१३. देवाचीये द्वारी उभा क्षणभरी</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;येशु ख्रिस्तांनी एके ठिकाणी एक खुपच सुंदर गोष्ट सांगितली होती.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ती गोष्ट मी ओशोंच्याकडुन ऐकली. मला ती खुपच आवडली, तुम्हालाही आवडेल.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;येशु ख्रिस्तांनी, भगवान बुध्दांनी अशा खुप लहान लहान कथा सांगितल्या होत्या ज्याद्वारे आपल्याला कांही इशारे (सिग्नल) दिले होते. ते इशारे धरुन आपण पुढे जायला हवे होते. त्यांनी बोटांनी चंद्र दाखविला, चंद्राकडे इशारा केला पण आम्ही त्यांचे बोटच पकडुन राहीलो. चंद्राचे सौंदर्य आपल्या ध्यानातच आले नाही. आपण त्यांचे बोटच धरले व आपल्याला चंद्र मिळाला असे म्हणू लागले. ओशॊ म्हणतात येशूने बायबलमधून किंवा पर्वतावरील भाषणांमधून दिलेले सिग्नल आपण पकडलेच नाहीत. आपण त्यांपेक्षा सोपे असे बायबल पकडून राहीलो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आपल्याकडेसुध्दा अनेक संतानी अनेक जाती-धर्मामध्ये जन्म घेतला व मोक्ष मिळविला. अनेक संतानी अभंग, ओव्या, भारुडे रचली आपल्याला मार्ग दाखवीण्याचा प्रयत्न केला. अनेक भाषेत अनेक प्रकारचे सिग्नल आजही मिळत आहेत पण आपण ते पकडत नाही. आपण त्याच त्या पंडितांनी किंवा भटा-बामणांनी सांगितलेल्या, परंपरेने आलेल्या, &amp;nbsp;सत्यनारायणाच्या , वैभवलक्ष्मीच्या, &amp;nbsp;चाली-रितीच्या व्यर्थ गोष्टीत अडकलेलो आहोत.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;कथा खुपच सुंदर आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;एकदा एक शहरात एक सधन जमिनदार राहत असतो, ज्याची शेती आसपासच्या ब-याच खेड्यात असते. जमीनदार वंशपरंपरागत सधन व सुखी असतो पण आपल्या व्यापात गुंग असतो. त्यामुळे इच्छा असुनही त्याला आपल्या शेतीसाठी खुपसा वेळ मिळत नाही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;सुगीच्या काळात एके दिवशी तो आपल्या एका शेतावर गेला. शेतावर पोहोचताच त्याला लक्षात आले की आपले पिक कापणीस आले असून ते लवकरच कापुन घ्यायला हवे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;त्याने आपल्या दिवानजीला बोलावून लगेचच सांगीतले की गावातील मिळतील तेवढी मजूर घेउन आलेले पीक कापून घे. दिवानजीने त्याच दिवशी गावात सर्वांना हा निरोप दिला.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;जमीनदार हा खुपच दानशुर म्हणुन प्रसिध्द होता त्यामुळे गावातील खुपशे लोक कापणीसाठी सकाळी लवकर पोहोचले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;काही लोकांना ही खबर उशीरा पोहोचली ते थोडे उशीरा पोहोचले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;काहींना आणखी दुसरे काम होते ते थोडे अधीक उशीरा, कांही अगदी संध्याकाळी कामावर पोहोचले. तर कांही काम संपल्यावर पोहोचले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;काम एका दिवसातच संपले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;काम संपल्यावर जमीनदार मोबदला वाटण्यासाठी उभा राहीला. त्याने सरसकट सर्वांना एकाच मापाने पण भरभरुन धान्य वाटले. लोकांकडे न्यायला साधने कमी पडली पण देण्यात कमतरता आली नाही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;वाटप संपल्यावर दिवाणजीने जमीनदाराला विचारले की प्रत्तेक मजुराच्या कामावर पोहोचण्याच्या वेळा वेगवेगळ्या असूनही आपण सर्वांना एकाच मापाने वाटप केलेत, असं का?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तेव्हा जमीनदार म्हणाला," दिवानजी तुम्हालाही हे कळू नये याचे मला आश्चर्य वाटते, जर मला सर्वकांही वाटून टाकायचे आहे तर मला त्यांच्यामध्ये भेदभाव करण्याची गरजच काय? " माझ्याकडे इतके आहे की मला ते वाटताना कमी-जास्त करावयाची गरजच नाही."&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ही कथा इशारा करते परमेश्वराच्या उदारतेकडे, त्याच्या कृपाप्रसादाकडे, त्याच्या न्यायाकडे. त्यामध्ये कधी कोणत्याही प्रकारचा भेदभाव होईल असे मला तरी वाटत नाही. एक साधा जमीनदार जर देताना भेदभाव करत नाही तर तो तर सा-या जगाचा राजा आहे तो कशाला करेल?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;जर तो भेदभाव करत नाही मग इथे आपण कशाला भेदभाव करतो. मी दररोज देवळात जातॊ, मी एवढे उपवास केले, मी एवढे नारळ फोडले, &amp;nbsp;मी अस्तिक आहे, &amp;nbsp;तो नास्तिक आहे. असा टेंभा मिरवण्याची कोणी गरज नाही. &amp;nbsp;मी माळकरी आहे, मी अमुक पंथाचा आहे, मी साधक आहे मी फकीर आहे हा टेंभा आता पुरे झाला. मी ओम शांती मंडळात जातॊ, मी ब्रम्हाकुमारी मधे आहे नी मी स्वामी समर्थाच्या आरतीला जातो हा दंभ आता सोडला पाहीजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;हिंदू-मुसलमान, ख्रिस्त-जैन, भारतीय-अमेरिकन, शाकाहारी-मांसाहारी, दारुडा-बेवडा, हरीभक्तपरायन, आस्तिक-नास्तिक, गरिब-श्रीमंत, ब्राम्हण-योगी, ध्यानी-त्यागी, संसारी-परमार्थी हे सर्वच जण तेथे पोहोचणार आहेत, कारण पोहचण्याची दुसरी जागाच नाही. सर्वांचीच झोळी भरणार आहे. देणारा देत आहे.&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तर मग उशीर झाला असला तरी हरकत नाही, कधीही त्याच्यासमोर झोळी पसरा, देणारा तयारच आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;" देवाचीये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या."&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-1114352112504501684?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/1114352112504501684/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/08/blog-post_17.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1114352112504501684'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1114352112504501684'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/08/blog-post_17.html' title='१३. देवाचीये द्वारी उभा क्षणभरी'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-9067676290556169672</id><published>2010-08-14T13:18:00.000+05:30</published><updated>2011-09-28T16:43:12.829+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marathi blogs'/><title type='text'>१२. कुत्ता है तो भोकेगाही !</title><content type='html'>आपण रोजच्या जीवनात पाहतो की प्रत्तेकजन दुस-याला काही ना काही उपदेश देतच असतो.&lt;br /&gt;यापैकी एकतरी सुचना-उपदेश ऐकल्याशिवाय आपला दिवसच संपत नाही.&lt;br /&gt;पहाटे लवकर उठून थोडातरी व्यायाम करावा, निदान चार सुर्यनमस्कार तरी घालावेत.&lt;br /&gt;मांसाहार वर्जच करावा किंवा टाळलेलाच बरा.&lt;br /&gt;दारु, सिगारेट, तंबाखु इ पासुन दुरच रहावे.&lt;br /&gt;दातात काडी घालू नये.&lt;br /&gt;गाडी सावकाश चालवावी.&lt;br /&gt;बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत.&lt;br /&gt;सारखा टिव्ही पाहू नये.&lt;br /&gt;इत्यादी इत्यादी.&lt;br /&gt;या सर्व सुचना आपण पुर्वी ऐकलेल्या असतातच पण आपण प्रयत्न करुनही नेहमी त्या पाळु शकत नाही.&lt;br /&gt;उपदेश करणा-याचे काम सोपे असते ते म्हणजे फक्त उपदेश करायचा. तो स्वत: अमलात कितपत आणतो हे कोण लक्षात घेत नाही.&lt;br /&gt;पहाटे लवकर उठावे असा सल्ला देणारे स्वत: ८ वाजता उठत असतात किंवा पहाटे उठून दुस-याच्या साखरझोपेचे खोबरे करतात व दुपारी तासभर मस्त ताणुन देतात.&lt;br /&gt;तात्पर्य काय उपदेश करणा-याची जबाबदारी ही उपदेश करण्यापुर्तीच मर्यादीत असुन, उपदेश पाळणे हे कोणावरच बंधनकारक नसते.&lt;br /&gt;सिगारेट किवा गुटख्याच्या व्यसनाप्रमाणे उपदेश देणे हे काही उपदेश करणा-यांचे एक व्यसनच बनलेले असते. त्यांना उपदेश केल्याशिवाय चैनच पडत नाही.&lt;br /&gt;आमच्या एका सरांच्या घराचे काम चालू होते. सरांना उपदेश देण्याचे सरकारी परमीट अगोदर होतेच पण स्वत:च्या घराचेच काम सुरु असल्यामुळे हक्काचे साधनच उपलब्ध झाले होते. कामावरचे गवंडी बिचारे त्यांच्या ताब्यात सापडले.&lt;br /&gt;ते अगदी वर्गावर येण्याचे चुकवून त्या आपल्या नव्या शिष्यांना शिकवू लागले. ही वीट चांगली , ती नाही. ती वीट तिथे बसवा ही वीट इथे बसवा. असं त्यांना अगदी वीट येईतो उपदेश केला.&lt;br /&gt;ते शिष्य या शिकवणीमुळे बिथरुन गेले काही दिवसांनी त्यांनी काम तिथेच ठेउन या शाळेला दांडीच मारली. मग सरांचे डोळे उघडले.&lt;br /&gt;पंधरावीस दिवसांनी त्या गवड्यापैकी एकजन सरांना भेटला. तेव्हा त्याने सरांना म्हणाला "सर, तुम्हाला इतकी सगळी माहीती आहे तर मग तुम्ही स्वत:च का ते घर बांधत नाही?" सरांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तात्पर्य काय ज्याचे काम त्यानेच करावे. प्रत्तेकजन आपपल्यापरीने विचार करतच असतो व काळजीही घेत असतो.&lt;br /&gt;दुसरे व्यसन एखादेवेळेस सुटेल पण उपदेश देण्याचे व्यसन कधीही सुटत नाही. दुस-या व्यसनाच्या बाबतीत व्यसनी मानसाच्या मनामध्ये एक कमीपणा किंवा पश्चातापाची किंवा चुकलेपणाची भावना असते पण उपदेश करणारा हा उपदेश करणे हे स्वत:चे कर्तव्य व हक्कच समजत असतो. त्याबद्दल त्याच्या मनात कोठेही शंका उत्पन्न होत नाही.&lt;br /&gt;ओशोंनी याचसंबंधाने एक चुटका सांगितला होता.&lt;br /&gt;एका शहरात कुत्र्य़ांची संख्या खुप असते आणि या वाढलेल्या संखेमुळे आता त्या कुत्र्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत असे. कधी कधी त्यांच्यामध्ये भांडणे होत असत. एका गल्लीतील कुत्री एकत्र येउन दुस-या गल्लीतील कुत्रांच्याबरोबर भांडत असत. ही भांडणे सॊडवण्यासाठी एक दादाही त्यांच्यामध्ये असतो. हा दादाकुत्रा वयाने जेष्ठ व ताकदवान तसेच नितीवान असतो. तो कधीही कुठल्या कुत्रीमागे फिरताना कुणी पाहीला नाही. तो आजीवन ब्रम्हचारी आहे असं म्हणतात. तो मेलेली जनावरे पण खात नाही. असा हा कुत्रा म्हणजे एक आदर्श संतच होता. तो नेहमी चौकात उभा राहून बाकीच्या कुत्र्यांना ज्ञान, अध्यात्म इ. विषयावर काही ना कांही भाषण देत असे. हे भाषण मुख्यत: रात्रीचे असावयाचे आणि या अध्यात्मिक भाषणाचा तिथे राहणा-या इतर नास्तिक मनुष्यवर्गास खुप त्रास होत असे. कधी कधी हा त्रास वाढत गेल्यामुळे तेथिल लोकांनी या अध्यात्मीक कार्यात विघ्नेही आणली.&lt;br /&gt;कालांतराने या दादाकुत्र्याचा शिष्यवर्गही वाढू लागला. ते शिष्यही मग आपआपल्या चौकात उभा राहून हे आध्यात्मिक कार्य करु लागले. त्यांच्या प्रवचनांमध्ये नेहमी ब्रम्हचर्य, ध्यान, नैतिकता इ. गोष्टींचा पुरस्कार असे. इतर कुत्री हे प्रवचन मन लावून एकत असत तसेच त्याला दाद देता देता स्वत:ही त्या कार्यात सामील होत असत.&lt;br /&gt;आतातर कुत्र्यांच्या या सामुहीक अध्यात्मिक क्रांतीचा त्या सबंध शहराला त्रास जाणवू लागला.&lt;br /&gt;संध्याकाळ होताच एखाद्या चौकातून कुत्र्याचे ओरडणे सुरु होई पाठोपाठ सर्वच चौकातून त्याला अनुमोदन मिळायला सुरु होई. सर्व शहरच या कुत्र्यांच्या ओरडण्यामुळे दणाणुन जात असे.&lt;br /&gt;सर्वत्र वाढत जाणा-या या प्रवचनकार व अनुयायांच्यामुळे होणारा गोंगाट आता दादाकुत्र्यालाही असहनीय झाला. या अशा सिच्युएशनमध्ये हे असेच सुरु राहणे पुर्ण कुत्रासमाजाच्या उन्नतीस अडचणीचे ठरणार आहे हे फक्त दादाकुत्र्याच्या ध्यानात आले.त्याने ताबडतोब एक सभा बोलाविली व सभेत एक ठराव केला जो सर्व कुत्र्यांना बंधनकारक होता. त्या ठरावानुसार कोणत्याही कुत्र्याला रात्री सात वाजल्यानंतर ओरडता येणार नव्हते. ठराव पास झाला कारण सभा भर दुपारी घेण्याते आली होती. पण संध्याकाळ होताच सर्वांची पंचाईत झाली. सात वाजताच चूळबूळ वाढू लागली.&lt;br /&gt;प्रत्तेक कुत्र्याला ऒरडावेसे वाटू लागले पण ठरावामुळे व दादाकुत्र्याच्या दहशतीमुळे सर्वजन गप्प होते. जणू रात्रीचे ओरडणे म्हणजे अधार्मिक कृत्यच होते, नीतीमत्तेला सोडून होते. इतक्यात कुठुनतरी कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याला कोणीतरी साथ दिली आणि पाठोपाठ सर्व कुत्री पुन्हा भुंकू लागली. ओरडण्यामुळे सारे शहर गोंगाटाने भरुन गेले.&lt;br /&gt;दुस-या दिवशी त्या पहिल्यांदा ओरडणा-या कुत्र्याला पकडून पाच दिवस न खाजवता चौकात बसुन राहण्याची जाहीर शिक्षा देण्यात आली. त्यामुळे सर्व कुत्र्यांनी पुन्हा न ओरडण्याचे गांभिर्याने ठरवले.&lt;br /&gt;दिवसभर काही नाही झाले तरी संध्याकाळ होताच सर्व कुत्र्यांना आपल्या घशात कांहीतरी अडकल्याची भावना व्हायची. काही झाले तरी ओरडावेच असे वाटायचे.&lt;br /&gt;दुस-या दिवशीही रात्र होताच पुन्हा येरे माझ्या मागल्या असेच झाले. एक कुत्रा भुंकला पाठोपाठ सर्वजण ओरडू लागले. तिस-या दिवशीही काही कुत्र्यांना अगोदरपेक्षाही जबर शिक्षा सुनावण्यात आल्या. दादाकुत्र्याने पुन्हा सगळ्यांना आपल्या आधिकारवाणीने धमकविले व चार नीतीच्या गोष्टी सांगितल्या.&lt;br /&gt;तिस-यादिवशी संध्याकाळी सर्व कुत्र्यांनी तोंडाला कुलुपच लावले. रात्री आठ वाजले नऊ वाजले तरी कुठुनही आवाज आला नाही. प्रत्तेक कुत्र्याला खवखवू लागले, काही करुन ओरडावे असे वाटू लागले. पण शिक्षा खुपच कडक व नितीच्या विरुध्द जाउन ओरडण्याचे धाडस कोणाला होईना. रात्रीचे अकरा वाजले तसे सर्वच कुत्र्यांची पंचाईत झाली अगदी दादा कुत्र्याचीपण. कारण आतापर्यंत इतर कुत्र्यांच्या गोंगाट सुरु होताच हा दादाही अंधाराच फायदा घेउन आपला घसा साफ करुन घेत असे. आज सर्वात जास्त त्याचीच पंचाईत झाली कारण प्रवचन देणे उपदेश करणे ही त्याची सर्वात जुनी सवय होती. आणि कुत्रा हा सवयीचा गुलाम असतो. फार वेळ त्याला कढ निघाला नाही शेवटी अंधारात जाऊन त्या दादा कुत्र्यानेच पहीली आरोळी ठोकली. पाठोपाठ त्याचे अनुयाई भुंकू लागले पुन्हा शहर दुमदुमु लागले. मगच सर्व कुत्र्यांना समाधान वाटले.&lt;br /&gt;कुत्रा आणि भुंकत नाही म्हणजे काय? दिवसाचे ठीक पण रात्री ? केवळ अशक्य "कुत्ता है तो भोकेगा जरुर !"&lt;br /&gt;त्याच प्रमाणे या उपदेशपर प्रवचन देणा-यांचे आहे. दिसला मानुस की दे प्रवचन. सर्व प्राणीमात्रांच्या ठाई एकच परमेश्वर आहे असे प्रवचन देणारा कोणता प्रवचनकार कासवछाप मच्छर अगरबत्ती वापरत नाही? भुंकणारा कुत्रा दिसताच कोण दगड हातात घेत नाही?&lt;br /&gt; &lt;br /&gt;तात्पर्य काय तर " आदमी अगर कुत्ता है तो भोकेगा जरुर!"&lt;br /&gt;आपण मनुष्य आहोत तर मानवाप्रमाणेच वागणार. चूका करणार, खोटे बोलणार, आळस करणार, कामे टाळणार इ. इ.&lt;br /&gt;मला वाटते प्रत्तेकाने मशिनप्रमाने अचूक सरळ रेषेत राहण्यापेक्षा स्वाभाविकपणे वागावे जे जास्त जिवंतपणाचे लक्षण आहे. कधी थोडा आळस करावा कधी लवकर उठुन व्यायाम करावा. कधी भर रस्त्यावरुन गाडी सुसाट सोडावी कधी सिगारेटी मागून सिगारेट ओढाव्यात तर कधी तमाश्याला जाऊन दंगा करावा. भडक कपडे घालावेत तर कधी धोतर नेसावे.&lt;br /&gt;नाहीतर मग संदीप खरेंच्या कवितेसारखे म्हणावे लागेल, "मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही मी निषेधसुध्दा साधा कधी नोंदवलेला नाही. .... मी मनातसुध्दा माझ्या कधी दंगा केला नाही. "&lt;br /&gt;आयुष्य़ संपुन जाईल आणि मग जगायचेच राहून जाईल.&lt;br /&gt;हा पण एकप्रकारचा उपदेशच झाला, माफ करा.&lt;br /&gt;आज इतकेच . . .&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-9067676290556169672?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/9067676290556169672/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/08/blog-post.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/9067676290556169672'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/9067676290556169672'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/08/blog-post.html' title='१२. कुत्ता है तो भोकेगाही !'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-6260937538269730247</id><published>2010-06-03T16:11:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:42:57.658+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='हेडमास्तर'/><title type='text'>११. हेड्मास्तरांची गम्मत</title><content type='html'>कशाला फुकटची भाषणं ऐकवतो आहेस?&lt;br /&gt;असं आपण एकमेकाला म्हणत असतो पण व्यासपीठावर जाउन किंवा गर्दीसमोर भाषण देणे किती आवघड आहे हे तुम्हालाही माहीत आहेच किंवा तुम्ही मागील पोष्टमध्ये वाचले असेलच.&lt;br /&gt;या भाषण देण्याच्या प्रकारातून अनेकदा असे विनोद घडत असतात.&lt;br /&gt;एकदा एक मध्यम वयाचे वक्ते भाषण संपवून खाली उतरले. त्यांना भेटायला त्यांच्याच वयाची एक महीला आली होती. त्यांनी त्या बाईंना अभिप्राय विचारला. बाई म्हणाल्या," बाकी सगळं ठीक होतं, पण तुम्ही बोलताना मधेमधे तुमची विजार वर ओढत होता, ते अजिबात चांगले दिसत नव्हते!"&lt;br /&gt;तेव्हा ते वक्ते म्हणाले, " मी विजार ओढणं बंद केले असते तर ते अधिकच वाईट दिसले असते कारण माझ्या विजारीची नाडी सुटली होती."&lt;br /&gt;आणखी एके ठीकाणी एका वक्त्य़ाचे भाषण खुपच लांबले होते. खरंतर भाषणाचा विषयच तसा होता " जागो भारत जागो".&lt;br /&gt;ते इतके लांबले होते की सभागृहातले लोक केव्हाच निघुन गेले होते फक्त एकटाच श्रोता तेथे उरला होता. भाषण संपताच त्या वक्त्याने त्या श्रोत्याचे आभार मानायचे ठरवले. ते स्टेजवरुन खाली त्याच्याजवळ जाऊन पाहतात तर तो डाराडूर झोपला होता. त्यांनी सहज त्याला जागे केले तर त्याने शिव्याच हासडायला चालू केल्या. तो म्हणाला, "घरी ढेकून झाल्यात म्हणून इथं येउन झोपलो होतो, तर भिकनिशे निवांत झोपूपण देत नाहीत." असं म्हणून तो पुन्हा झोपला.&lt;br /&gt;एका वक्त्याला भाषणाला उभा राहील्यावर वारंवार पाणी पिण्याची सवय होती. त्यासाठी एका तांब्यात पाणीभरुन व त्यावर एक वाटी पालथी घालून त्यांच्याजवळ ठेवलेली असायची. तर एकदा या महाशयांचे भाषण खुपच लांबले. तांब्यातील पाणीही संपले पण त्यांनी आपली सवय मोडली नाही त्यांनी रिकामाच तांब्या दोनतीनदा उपडा करुन वाटीत पाणी घेतल्या सारखे करुन पिऊन टाकले.&lt;br /&gt;आणखी एका वक्त्यांना शर्टच्या बटनांशी चाळा करण्याची सवय होती. त्या महाशयांनी तर बोलता बोलता आपल्या शर्टची दोन बटणेच तोडून टाकली होती. नंतरच्या कार्यक्रमात ते दोन्ही हातांनी शर्ट धरुनच सगळीकडे फिरत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या एका हेडमास्तरांसही अशीच सवय होती. आपल एक हात मागे ठेउन हातातील अंगठी फिरवत ते पल्लेदार भाषणे ठोकत असत. स्टेजवर असोत की वर्गावर, रस्त्यात असोत की घरी ते बोलताना नेहमी हीच पोझ असत असे.&lt;br /&gt;असं म्हणतात की, एकदा त्यांच्या परसात उकिरडा उपसण्याचे काम सुरु होते. दोन-तीन गडी माणसं आपलं काम लवकर आवरण्याच्या दृष्टीने झपाझप काम करत होते. तेथे आमचे हे हेडमास्तर थांबले होते, नेहमीचीच पोझ. असं करा तसं करा असं एकसारखं टुमणं यांनी त्या माणसांच्या मागे लावले होते त्यामुळे ती मानसही वैतागुन गेली होती.&lt;br /&gt;बोलता बोलता यांच्या हातातील ती सुप्रसिध्द अंगठी त्या उपसलेल्या ढिगा-यावर कुठेतरी पडली. या साहेबांनी कुणाला याची खबरच केली नाही. थोडीफार वरवर शोधाशोध केली आणि बाजूला जाऊन थांबले.&lt;br /&gt;अंधार पडल्यावर ती मानसं आपापल्या घरी गेली. मग या महोदयांनी दिवा लावून ब्याटरी घेऊन आपलं शोधकार्य सुरु केलं. आपल्या पडलेल्या अंगठीची वाच्यताकरणे जाणीवपुर्वक टाळले होते. कदाचीत दुस-या कोणाला सापडल्यास कोण आपल्याला ती परत देईल की नाही याबद्दल त्यांना शंका होती. दुस-या दिवशी सकाळी ती मानसं कामावर आली तेव्हा त्यांना सगळा मैला, शेण, राख, आणि इतर नाना तर्हेचा मौल्यवान कचरा एस्तत: पसरलेला दिसला.&lt;br /&gt;आमचे सर रात्रभर एकटेच ती अंगठी शोधत होते. जागरणामुळे डोळे चोळत बाहेर आले तेव्हा त्यांना त्या विस्कटलेल्या खताबद्दल विचारले. आमच्या हेडसरांनी सगळी कहाणी आपल्या रिकाम्या बोटांवरुन बोटे फिरवत सांगितली. ती शोधाशोध सांगताना सरांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.&lt;br /&gt;सरांची ही सगळी सविस्तर कहाणी ऐकून ते लोक हसु लागले.&lt;br /&gt;त्यांच्यापैकी एकाने ती सुप्रसिध्द अंगठी आपल्या खिशातून काढून सरांच्या हातावर ठेवली आणि म्हणाला," सर, ही अंगठी आम्हाला कालच सापडली होती आणि ती तुमची आहे हे पण आम्हाला माहीत होतं पण आम्ही तुमची जरा गम्मतच केली, कशी वाटली.... गम्मत?"&lt;br /&gt;ती अंगठी सरांनी आपल्या बोटात चढवली व नेहमीच्या सरावाने फिरवली, मिस्किल हसत निघून गेले ते काम संपेपर्यंत परत आलेच नाहीत.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-6260937538269730247?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/6260937538269730247/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/06/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/6260937538269730247'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/6260937538269730247'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/06/blog-post.html' title='११. हेड्मास्तरांची गम्मत'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-5451491477162692682</id><published>2010-05-29T16:36:00.001+05:30</published><updated>2011-09-28T16:41:50.393+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्टेज डेअरींग'/><title type='text'>१०. स्टेज डेअरींग- म्हणजे चेष्टा नाही.</title><content type='html'>वक्तृत्व ही एक कला आहे, काहीजण ती प्रयत्नाने आत्मसात करतात तर काहीजनांना ही दैवी देणगी जन्मजातच असते.&lt;br /&gt;वक्तृत्व म्हणजे सभाधीटपणा आलाच. चांगला वक्ता हा चांगला विचारवंत असेलच असे काही नाही पण तो चांगला सभाधीट असतोच. सभेसमोर गर्दीसमोर उभा राहून बोलायचे हे येरागबाळ्याचे काम नोहे. भल्याभल्यांची धोतरे सुटण्याची वेळ येते. येरवी हजारो लोकांना एका काठी व शिट्टीच्या जोरावर हाताळू शकणारा पोलिससुध्दा भाषण म्हंटले की चार पाय मागे सरकतो.&lt;br /&gt;भाषणकलेच्या पुढचा भाग म्हणजे नाटकात काम करणे. नाटकात काम करणे हे तर हातात जिवंत विंचू धरुन न हालचाल करता उभा राहण्यासारखे आहे.&lt;br /&gt;काही लोक हे सुध्दा अगदी सहजच करु शकतात. त्यांचा स्टेजवरचा वावर अगदी सहजसुंदर असतो, अगदी घरच्यासारखा.&lt;br /&gt;पुर्वी आमच्या गावात गणेश उत्सवात विविध मंडळातर्फे स्टेजवर विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम खुपच जोरात असत होते. त्यामध्ये अगदी पौराणिक व अगदी नविन अशी नाटके, गाणी अशी सादर केली जायची.&lt;br /&gt;जे जन्मजात कलाकार होते त्यांना हे कार्यक्रम म्हणजे धमाल आकर्षण होते तर काहींच्यासाठी ही एक नसती ब्याद होती. पण मंडळांच्या सभासदमर्यादेमुळे या कार्यक्रमांमध्ये सर्वांनाच भाग घ्यावा लागायचा. प्रत्तेकजण आपापली जबाबदारी पार पाडायचा .&lt;br /&gt;आमच्या हनुमान तालीम मंडळाने त्यावर्षी जाणता राजा हे शिवचरित्रावर आधारीत नाटक बसविले होते. शिवाजींच्या मुख्यभुमिकेत प्रसिध्द शाहीर सदाशिव निकम हे होते तर दगडू घराळ, मधु येवलूजे, अशोक पोवार हे नेहमीचे यशस्वी कलाकार इतर पार्ट वटवणार होते.&lt;br /&gt;गेले कितीतरी दिवस नाटकाच्या तालमी चालू होत्या, नाटक अगदी जमले होते.&lt;br /&gt;उद्या कार्यक्रम असल्यामुळे आजच स्टेजची उभारणी चालली होती मंडळाचा घरचा सुतार म्हणजे पुंडलिक लोहार शिवाजींचे आसन तयार करत होता. पण कोठेतरी माशी शिकली, ऐन नाटकाच्या दिवशी शाहीर गैरहजर राहणार होते. शाहिरांना दुरच्या जिल्ह्यात कार्यक्रमाचे शासकीय निमंत्रण आले होते.&lt;br /&gt;आता शिवरायांची भुमिका कोण करणार हा खुप मोठा प्रश्न उभा राहीला होता. खुप गोंधळानंतर व चर्चेनंतर शिवाजीची भुमिका दुसरे कोणतरी करेल व त्याला स्टेज खालून प्राम्टींग करु असे ठरले. पण प्रत्त्यक्ष भुमिका कोण करणार हा प्रश्न अनुत्तरीतच होता. त्यासाठी नावांची चर्चा सुरु झाली. कोणाचेच नाव फायनल होत नव्हते, कोण अगदी बुटके तर कोण काळे, कोण जाड तर कोण अगदी किरकोळ असे झाले होते. शेवटी कोणीतरी पुंडलीकच्या नावाची घोषणा केली तेव्हा धाडकन आवाज झाला. वरती पडदे मारणारा पुंडलिक दचकून खाली पडला व गयावया करु लागला. काय वाट्टेल ते काम सांगा पण स्टेजवर तेवढे यायला सांगू नका असे म्हणू लागला.&lt;br /&gt;आमच्या कुंडलिकचेपण बरोबर होते जन्मात त्याने कधी लोकांच्या जमावासमोर स्टेजवर पाय ठेवला नव्हता. स्टेजवर आले की त्याचे हातपाय लटपटू लागत होते. तोंडातून शब्दच काय आवाज पण बाहेर येउ शकत नव्हता. काहीकेल्या तो या कामाला तयार होईना. पण आता नाइलाज होता सर्वांनी त्याची मनोमन विनवणी केली प्रसंगाचे गांभिर्य समजावून दिले तेव्हा तो कसातरी तयार झाला. पण त्याने काही अटी घातल्या शिवाजी महाराज एका जागेवरच बसून राहतील ते उठणार नाहीत व चालणारही नाहीत. त्याच्या सगळ्या अटी मान्य करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते.&lt;br /&gt;तो दिवस उगवला. नाटकाची वेळ झाली. स्टेजसमोर प्रेक्षकांची गर्दी झाली होती. शो हाउसफुल्ल होता. पडदे अजुन बंद होते. शिवाजी अगोदरच आपल्या सिंहासनावर बसले होते. त्या सिंहासनाखाली एकजण त्याला प्राम्टींगसाठी बसला होता. बाहेर अनाउंसमेंट सुरु होती. इकडे शिवाजीची घालमेल सुरु होती. एकदोनवेळ पळून जाण्याचा प्रयत्नसुध्दा असफल झाला होता. अंग घामाने डबडबले होते. पाय लटपटत होते. आणि पडदा उठला. सिन सुरु झाला.&lt;br /&gt;तानाजी मालुसरे शिवबांना भेटायला आला होता. शिवबांनी त्याला आपल्या धीरगंभीर आवाजात सांगावयाचे होते की " हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा!".&lt;br /&gt;सिंहासनाखालून प्रांम्टींग करणारा सांगू लागला " महाराज बोला, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा!".&lt;br /&gt;महाराजांचे एक नाही न दोन नाही तेव्हा त्याने आनखी एकदा सांगितले" महाराज बोला, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा!".&lt;br /&gt;पण इकडे समोरची गर्दी पाहून महाराजांना कापरे भरले होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सिंहासनाखालून प्रांम्टींग करणारा पुन्हा पुन्हा सांगू लागला पण महाराज गप्पच. एव्हाना प्रेक्षक चुळबुळ करु लागले.&lt;br /&gt;महाराजांचा चेहरा रडवेला झाला होता. ते आता उठुन पळतील की काय असे वाटत होते. सगळेच हैरान झाले होते. कोणाला काय झाले हे कळेना. महाराज का बोलत नाहीत हे कुणालाच कळेना.&lt;br /&gt;प्रेक्षकांची चुळबुळ वाढत जाउन आता गोंगाट सुरु झाला, प्रेक्षकांना शांत राहण्याचे आव्हान करुनही दंगा सुरुच झाला. शेवटी मंडळातेर्फे नाटक रद्द झाल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त करण्य़ात आली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पडदे झाकण्यात आल्यावर सगळे शिवाजीवर तुटून पडले, बोलला का नाहीस? काय झाले? बोलला का नाहीस बोल?&lt;br /&gt;&lt;br /&gt;गोंधळ शांत झाला तेव्हा कुंडलिकने शांतपणे उत्तर दिले," एवढी मानसं बघितली, काय बोलू आणि काय सांगू मी चड्डितच हागलोय !" त्याच्या या उत्तरावर सगळे आपले नाक मुठीत धरुन हासू लागले. प्रांम्टींग करणा-यावर भर रात्री विहिरीवर अंघोळ करायला जायची वेळ आली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर असा हा स्टेज डेअरींगचा अनुभव. असा अनुभव पुन्हा कोणाच्या वाट्याला नको रे बाबा!!!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-5451491477162692682?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/5451491477162692682/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/05/blog-post_29.html#comment-form' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/5451491477162692682'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/5451491477162692682'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/05/blog-post_29.html' title='१०. स्टेज डेअरींग- म्हणजे चेष्टा नाही.'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-6451407716011033882</id><published>2010-05-19T15:41:00.002+05:30</published><updated>2011-09-28T16:41:35.906+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marathi blogs'/><title type='text'>९. पुन:श्च हरी ओम !</title><content type='html'>आज जगात जवळपास सर्वच धर्मांची वाताहत झाली आहे. एका नवीन धर्माची निर्मीती होणे खुप गरजेचे झाले आहे. नवीन धर्म जो प्रत्तेकासाठी सुटेबल असेल. नवीन धर्म हा आतापर्यंतच्या धर्मांसारखा सार्वजनिक नसेल तर नवीन धर्म पुर्णत: वैयक्तिक स्वरुपाचा असेल. त्यामध्ये नवीन मंदिराची गरज भासनार नाही, नवीन देव निर्माण होणार नाही, नवीन पंथ निर्माण होणार नाहीत, उच्च-नीच असा भेदभाव नसेल, पुजारी, भट, पंडित नसणार. नवीन धर्माची फक्त एकच दिक्षा असेल एकच संदेश असेल तो म्हणजे "आनंदी रहा".&lt;br /&gt;आनंदी राहणे खुप सोपं आहे.&lt;br /&gt;आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण खुष होतो, आनंदी होतो. त्या आनंदी राहण्याला कोणतेही कारण नव्हते. आनंदी राहण्यासाठी कोणतेही कारण लागत नाही. कारण आनंद हा आपला स्थाईभाव आहे. जसजसे आपण मोठे होत आलो तसतसे आपण दु:खी होत गेलो कारण आपण दु:खी राहण्यासाठीची कारणे शोधु लागलो. आणि या दु:खी राहण्यालाच धर्माचे नाव दिले गेले. आपल्याकडे पैसा नाही म्हणून दु:खी, अमुक कंपनीची कार नाही म्हणून दु:खी, आपण काळे आहोत म्हणून तर कोण आपण बुटके आहोत म्हणून, कोणाला घर पाहीजे कुणाला पद प्रतिष्ठा पाहीजे म्हणून दु:खी. या सर्वाच्या उलट आपले धर्माचे तत्वज्ञान पैसा सोडा, पद सोडा, त्याग करा इ.इ. मग आपण आनंदी कसे राहू. परमेश्वराने आपल्याला जन्माला घातले आहे ते असे दु:ख करत बसण्यासाठी नक्किच नाही. त्याने अगदी गवताच्या फुलापासून हत्ती सारख्या महाकाय प्राण्यापर्यंत सर्वांच्यासाठी हे जग निर्माण केले आहे व त्या जगात सर्वांच्या गरजांची काळजी घेतली आहे.&lt;br /&gt;" रख्खा है पास रहने में क्या, रख्खा है आस रखने में क्या,&lt;br /&gt;एक आदतसी पड गयी है, वरना रख्खा है उदास रहने में क्या!"&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्याला उदास राहण्याची सवय लागलेली आहे. आपण दु:खाला सोडण्यास तयार नाही. आपण आपल्या दु:खांना ग्लोरिफाय करत आहोत. म्हणून आपल्या देशात तथाकथित साधेपणावर भर दिला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकदा चंदूलाल मारवाडी आयुष्याभर पैसा कमावून (पै ला पै जोडून) सरतेशेवटी दुनिया पहायला लंडनला गेला होता. तिथे सात बंगला टाइपची एकाला लागुन एक अशी सात गगनचुंबी इमारतींची रांग पहात असताना चंदुलालचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. या इमारती बांधण्यासाठी किती पैसा खर्च झाला असेल. तो पैसा कधी साठवला असेल. आपल्या आयुष्याची सारी जमापुंजी एकत्र करुनसुध्दा या इमारतीमधील एखादी खोलीतरी खरेदी करु शकू का? हा विचार करत असताना त्याने एका फिरंगी मानसाला एका पाठोपाठ एक अशा सिगार ओढताना पाहिले. तो इंग्लिश जंटलमन आपल्याच आनंदात गुंग होता. तीन-चार सिगार संपल्यानंतर चंदुलालची सहणशीलता संपली. त्याने विचार केला हा मनुष्य किती मुर्ख आहे आपला पैसा या शुल्लक सिगार फुकण्यासाठी वाया घालवतो आपण त्याला काही चांगले प्रगतीचे ज्ञान शिकवायला हवे. साधेपणाचे महत्व पटवून द्यायला हवे. चंदुलाल त्याला म्हणाला "महोदय, मी बराचवेळ आपले निरिक्षण करतोय आणि माझा असं ध्य़ानात आलं आहे की आपण सिगार ओढण्यासाठी खुपच पैसा खर्च करता, जर हाच पैसा आपण जमा केला असता तर या इमारती पैकी एकतरी इमारत आपली झाली असती." त्यावर तो जंटलमन उत्तरला की या सर्व इमारती मी स्वत: उभा केल्या आहेत, व त्या माझ्याच मालकीच्या आहेत. तुमच्या मालकीच्या किती इमारती आहेत?, तुम्ही आतापर्यंत किती पैसा साठविला आहे?" हे ऐकून चंदुलालचा चेहरा पाहण्यासारखा झाला.&lt;br /&gt;आपल्य़ाकडे हे असंच होतं. आपली गरीबी आपण आपल्या स्वनिर्मित तत्वज्ञानाच्या खाली लपवू पाहत असतो. पण आतून आपण दु:खीच असतो. पैसेवाल्यांचा द्वेषच करत असतो. फक्त वरच्या मनाने म्हणायचे की जग भौतिक सुखाच्या मागे लागले आहे पण आम्ही अध्यात्मिक सुखाची अनुभुती घेत आहोत. हे लोक आपल्याच चक्रव्युहात अडकलेले आहेत. त्यांच्याकडे ना पैसा आहे ना आध्यात्म आहे. ते ना विज्ञानाला मानतात ना त्यांना अध्यात्माचा गंध आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोल्हापूरला काही वर्षापुर्वी एक जैन प्रवचनकार आले होते. त्यांना जैन लोक खुप मानायचे त्यांना क्रांतीकारी संत म्हंटले जाते. ते जैन धर्माचे कट्टर अनुयायी आहेत असं लोक म्हणतात. त्यांच्या सेवेला आमदार, खासदारपासुन क्लासवन अधिकारी लहान थोर असे हजारो लोक हजर होते. ते अंगावर कोणतेही वस्त्र वापरत नाहीत, कंगवा वापरत नाहीत, केस कापत नाहीत, चपला वापरत नाहीत (बहूतेक पादुका वापरत असावेत), फक्त एकदाच अन्न म्हणून काहीतरी प्राशन करतात, एकभुक्त आहेत इ. इ. अशा या महापुरषाला एक आजार झाला तेव्हा मात्र डाक्टरकडे धावाधाव झाली. डाक्टरांनी त्या महात्म्यांना एका शस्त्रक्रियेचा सल्ला दिला व शस्त्रक्रियेशिवाय तरणोपाय नाही असे सांगितले. तेव्हा या महाशयांच्या समोर यक्षप्रश्न उभा राहीला. आपण तर शरिरापेक्षा आत्म्याचा पुरस्कार करणारे, भौतिक सोडून आध्यात्माकडे लोकांना वळवणारे, आपण एवढे मोठे त्यागमुर्ती, त्यागाविषयी एवढी प्रवचने दिली, आपली साधी राहणी ज्यामुळे एतके लोक आपल्याला मानतात मग ही शस्त्रक्रिया करणे म्हणजे शरिराला म्हणजेच भौतिकालाच आपण महत्व दिल्यासारखे झाले असे त्यांना जानवू लागले. यावर त्या त्यागमुर्ती क्रांतिकारी संताने एक महिण्याचा लांबलेला आपला मुक्काम गुंडाळून लगोलग मुंबई गाठली.&lt;br /&gt;काही दिवसांचे सोबती असणारे हे मुनी आजही टीव्ही चैनलवर आपले क्रांतीकारी विचार ऐकवत असतात. परवा ते एका प्रवचनात कैकयी ही कौशल्यापेक्षा कशी महान होती हे सांगत होते. कैकयी ही युध्दामध्ये आपल्या करंगळीने रथाचे चाक पकडून दशरथासाठी कसा त्याग करते, आपल्या शरिरापेक्षा त्यागाला कसे महत्व देते हे ते पटवून देते होते आणि समोर हजारो लोक ते ऐकुन धन्य होत होते. आणि कदाचीत या प्रवचनासाठीच या महोदयांनी आपल्या कित्तेक वर्षांची तपश्चर्या सोडून शस्त्रक्रिया करुन घेतली असेल. किती मोठा त्याग?&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सगळं सोडण्याची वेळ आता आली आहे.&lt;br /&gt;आता कोण किती त्याग करतो हे पहायचं बंद केले पाहीजे. आपला पुरानकाळ सोडला पाहिजे, राम, कृष्ण, अर्जुन, बुध्द, महावीर या आपल्या पुर्वजांचा वारसा सांगणे आता बंद केले पाहीजे. ते या देशात कधीकाळी जन्मले होते हे आता आमच्याकडे पाहून कोणालाही पटनार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता वेळ आली आहे नवी सुरवात करण्याची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुन:श्च हरि ओम !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-6451407716011033882?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/6451407716011033882/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/05/blog-post_19.html#comment-form' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/6451407716011033882'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/6451407716011033882'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/05/blog-post_19.html' title='९. पुन:श्च हरी ओम !'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-403614074645034804</id><published>2010-05-10T16:03:00.000+05:30</published><updated>2011-09-28T16:41:23.563+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='marathi blogs'/><title type='text'>८. ते असंही असू शकतं....</title><content type='html'>सावधान धर्माचे राज्य येणार आहे- याचा पहिला भाग लिहिला पुढे याच विषयावर खुप काही लिहायचे असे प्रयोजन होते. मनात खुप सारे विचार होते. पण अचानक पुढे लिहीण्याचे बंद करावे असे वाटू लागले. मला पुढे काय करावे असा प्रश्न पडला. विषय तर सुरु केला होता त्याला व्यवस्थित उत्तरार्धापर्यंत नेणे महत्वाचे होते.&lt;br /&gt;पण पुढे जाताना मला दुसरेच विचार सतावू लागले. मी जसा विचार करतो तसा लिहू शकतो का? कारण विचार करणे आणि ते कागदावर/स्क्रिनवर उतरवणे या भिन्न प्रक्रिया आहेत. आपले विचार दुस-यापर्यंत पोहचवणे हे खुप अवघड काम आहे. आपण जे जे व्यक्त करु ते ते असत्य होवून जाते. आपण सांगतो एक आणि समोरचा ऐकतो दुसरेच. संत ज्ञानेश्वरांनी सांगितले " हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा , पुण्याची गणना कोण करी" लोकांनी ऐकले काय तर पुण्याची गणना कोणी करत नाही तर हरीचे नाव कशाला घ्या. ते ज्ञानेश्वरांचेच सांगणे पुढे पास करतात की "हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा , पुण्याची गणना कोण करी" आपण हरीचे नाव घ्यावे असं कोणाला वाटत नाही. तर आपण घेतलेले हरीचे नाव दुस-याला ऐकू कसे जाईले याचीच जास्त चिंता लागून राहते. आपण कसे हरीभक्त आहोत हे दुस-याला पटवून सांगण्याकडेच सर्वांचा ओढा असतो. मग आपण ज्या मार्गातून भक्ती करतो तोच कसा श्रेष्ठ हे दाखवले जाते. आपला पंथ वाढवण्यासाठी कष्ट घेतले जातात. मोठमोठे जाणकार आणून त्यांची छाप आजूबाजूच्या लोकांवर पाडली जाते. पण हरीचे नाव घ्यावे आणि आपले काम नेकीने करावे असे कोणास वाटत नाही.&lt;br /&gt;या लोकांना आत्ताची चिंता नाही हे आत्ता सुखी आहेत. पंढरपुरला जातात, अक्कलकोटला जातात, वैष्णोदेवीला जातात, कैलास, अमरनाथ, काशीला जातात. पण एक गरीब मनुष्य आर्थिक विवंचणेतला मनुष्य अशा यात्रा करेल काय? आणि यात्रेला जाउन काय मागायचे? आणखी पैसा? एवढ्या दूर यात्रेला गेलेला कोण " पसायदान" तर मागणारच नाही. ते आपल्या हक्काचे पुण्यच मागतील. हे लोक इथले सर्व सुख सोडायला तयार आहेत पण त्यांना स्वर्गात स्थान हवे आहे. इथल्या रुपयाच्या बदल्यात त्यांना स्वर्गातील चलन हवे आहे. म्हणून दान-धर्म, पुजा-पाठ, मंत्र-यज्ञ सर्व काही. हे लोक दान जरी केले तरी दानाची रक्कम मोजून ठेवणार आणि प्रत्तेकाला ती सांगत सुटणार. जर एखादा म्हणाला की मी या मंदीरासाठी एक लाख रु. दिले. तर त्याने ते दिलेलेच नाहीत. जर ख-या अर्थाने दिले असते तर तो हे लगेच विसरुन गेला असता. तो हे विसरत नाही आणि कुणाला विसरुही देत नाही. तो संगमरवरी दगडावर नाव कोरुन ठेवू इच्छितो की अमूक या महान दानशूराने एक लाख रु. देवासाठी दिले. असे लोक काही दान वगैरे देत नाहीत ते फक्त एक्सचेंज करतात. फ़ोरेक्स सारखे रुपयाच्या बदल्यात पुण्य प्लस प्रसिध्दी मान इ. इ.&lt;br /&gt;संत ज्ञानेश्वरांना याची कल्पना होती म्हणूनच ज्ञानप्राप्ती होवूनही ते प्राप्त झालेले ज्ञान शब्दबध्द करण्यास तयार नव्हते. स्वत: गुरु निवृत्तीनाथांनी त्यांना आदेश दिल्यावरच ते गितेवर मराठीतून भाष्य करण्यास तयार झाले.&lt;br /&gt;कोणताही ज्ञानी पुरुष आपले ज्ञान दुस-या पर्यंत शब्दरुपाने पोहचवू शकत नाही. ते फक्त इशारे करु शकतात आणि शिष्यानी ते इशारे पकडून त्यानुसार जायचे असते.&lt;br /&gt;गौतम बुध्द जेव्हा बुध्दत्वाला प्राप्त झाले तेव्हा ते कितीतरी काळ मौनातच होते. प्रत्तेक्ष देवांनी त्यांची विनवणी केली की हजार हजार वर्षातून एखादा बुध्द जन्मतो तेव्हा आमच्यावर कृपा करा व काही उपदेश करा. तेव्हा कुठे बुध्द उपदेश करण्यास तयार झाले.&lt;br /&gt;तात्पर्य काय, आपले विचार शब्दबध्द करणे हे अगदी अशक्यप्राय काम आहे.&lt;br /&gt;त्या ज्ञानवंतांची ही गोष्ट तर मजसारख्या पामराची काय कथा ?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-403614074645034804?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/403614074645034804/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/05/blog-post_10.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/403614074645034804'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/403614074645034804'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/05/blog-post_10.html' title='८. ते असंही असू शकतं....'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-1950436214793100522</id><published>2010-05-03T17:36:00.002+05:30</published><updated>2011-09-28T16:40:42.575+05:30</updated><title type='text'>७. सावधान धर्माचे राज्य येणार आहे! भाग-शेवटचा</title><content type='html'>या पुर्वीच्या भागात व्यक्त केलेल्या विचाराप्रमाणे आपल्या आतील जनावर हे नेहमी आपल्यावर वर्चस्व गाजवू पाहत असते. आपली सदसदविवेकबुध्दी जोवर जागी असते, शक्तिशाली असते तोवर हे माकड थोडे कमी ताकतवान असते. पण जेव्हा आपली सदसदविवेकबुध्दी कमजोर होते तेव्हा हे माकड लगेचच उडी मारुन पृष्ठभागावर येते.&lt;br /&gt;आजकाल सर्वत्र हेच होत आहे. जो-तो हेच बोलतो की "काय वाईट वेळ आली आहे ?" "कलियुग आले आहे". जिथे तिथे हेच बोलले जाते. याचा अर्थ एवढाच की माझ्यावर काय वाईट वेळ आली आहे? कारण मी माझ्या सदसदविवेकबुध्दीच्या नुसार निर्णय घेउ शकत नाही. आपण स्वत: सदसदविवेकबुध्दीला बाजूला करु इच्छीत आहोत आणि माकडाला बळ देत आहोत मग त्या माकडाचे काय आयतेच फावले.&lt;br /&gt;हळूहळू आपण मानवाच्या नीती-अनीती, पाप-पुण्य या व्याख्यांनी युक्त अशा व्यवहाराला धर्म असे नाव दिले व माकडांच्या किंवा जनावरांच्या व्यवहाराला अधर्म असे नाव दिले.&lt;br /&gt;जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्माचे वर्तन वाढेल अनीती वाढेल तेव्हा तेव्हा धर्माचे रक्षण करण्यास व धर्माचे राज्य स्थापन करण्यास देव स्वत: जन्म घेतो किंवा आपल्या दूताला पृथ्वीवर पाठवून देतो. माझा भगवदगीतेतील या श्लोकावर पूर्ण विश्वास आहे.&lt;br /&gt;जेव्हा जेव्हा पृथ्वीतलावर अधर्माचा अंधार पसरू लागला तेव्हा तेव्हा देव धावून आला. कधी रामाच्या रुपाने तर कधी कृष्णाच्या, कधी गौतम बुध्दाच्या रुपाने तर कधी भगवान महावीरांच्या, कधी येशु ख्रिस्ताच्या रुपाने तर कधी महम्मद पौगंबराच्य़ा रुपाने, कधी आचार्य शंकराचार्य तर कधी गुरु गोविंदसिंह. असे अनेक विविध रुपाने अनेक वेळा विविध ठीकाणी तो आला आणि आपले वचन त्याने पूर्ण केले.&lt;br /&gt;ते आले त्यांनी आपल्याला मार्ग दाखविला. स्वत: आचरलेला मार्ग त्यानी आपल्याला दिला.&lt;br /&gt;पण आपण एवढे हुशार निघालो की त्यांनी ज्या बोटाने रस्ता दाखविला तेच बोट आपण पकडून बसलो आणि रस्ता विसरून गेलो. आपल्याला त्या रस्त्यावर चालायचे आहे हेच विसरुन गेलो. त्यांनी आम्हाला चंद्राच्या दिशेने बोट दाखविले पण आपण त्यांचे बोटच पाहत बसलो. चंद्राकडे मान उंचावण्याचे भान आपण ठेवले नाही.&lt;br /&gt;एकदा मुल्ला नसरुद्दिन बाजारात मिठाई आणायला गेला होता. त्या मिठाईवाल्याकडे परत देण्यासाठी सुट्टे पैसे नव्हते. तेव्हा तो मिठाइवाला त्याला म्हणाला की खानसाब पैसे आपण पुन्हा कधीतरी घेउन जा. पैसे कुठे जात नाहीत फक्त आमचा पत्ता ठिकठिक लक्षात ठेवा म्हणजे झाले. मुल्ला काहीशा नाराजीने तेथून बाहेर पडला पण बाहेर पडताना दुकानाची खुण म्हणून लक्षात ठेवण्यासाठी त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याला दुकानासमोर एक उंट बसलेला दिसला, त्याने तेवढेच लक्षात ठेवले. पुन्हा कधीतरी तो परत बाजारात आला तेव्हा उंट एका न्हाव्याच्य़ा दुकानासमोर बसला होता. मुल्ला आपल्य़ा पैशासाठी त्या न्हाव्याबरोबर भांडू लागला. तो म्हणाला मी अगदी व्यवस्थीत खुण लक्षात ठेवली होती म्हणून बरे, आजकाल दिवस वाईट आलेत माझ्या सुट्य़ा पैशासाठी तुम्ही तुमचा धंदा बदलाल हे मात्र तुम्ही अगदी वाईट केलेत, मुकाट्याने माझे पैसे टाका.&lt;br /&gt;आपलेही असेच झाले आहे, आपणही उंटाचीच खुण लक्षात ठेवली. राम, कृष्ण, बुध्द, महावीर, ख्रिस्त, पैगंबर असोत की कबीर, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम असोत. आपण खुण म्हणून चुकीचीच गोष्ट पकडून ठेवली आहे. नाहीतर मग मुर्तीपुजा टाळा असा टाहो फोडूनही जगात सर्वात उंच विशाल मुर्त्या ह्या भगवान महावीरांच्याच उभा राहिल्या नसत्या. अपरिग्रह म्हणजे धनाचा संचय करु नका अशी शिकवन असुनही जैनच सर्वात धनिक बनले. बुध्दांचे अप्प दिपो भव हे कुणाला ऐकूच गेले नाही. शांततेसाठीच्या युध्दात लाखो मुस्लिम, ख्रिस्त लोक विनाकारन मेले नसते. म्हणे जगात शांती स्थापन करण्य़ासाठी आपल्य़ा धर्माचा प्रसार केला पाहीजे. तलवारीच्या जोरावर युध्द आणि युध्दाच्या जोरावर धर्म हा एकप्रकारचा विनोदच आहे.&lt;br /&gt;आपल्या देशात महान मानसांची पुजा होते, त्यांचे पुतळे उभा केले जातात पण ते काय म्हणतात हे कोणीही ऐकत नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता या दुष्टचक्रातून बाहेर पडण्य़ासाठी देवाने आता एक "युनिक अवतार" घेतला पाहिजे. आणि ती वेळ आलेली आहे असे मला वाटते. म्हणून सावधान . . . .&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3628797444622717843-1950436214793100522?l=pradeepspowar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pradeepspowar.blogspot.com/feeds/1950436214793100522/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/05/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1950436214793100522'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3628797444622717843/posts/default/1950436214793100522'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pradeepspowar.blogspot.com/2010/05/blog-post.html' title='७. सावधान धर्माचे राज्य येणार आहे! भाग-शेवटचा'/><author><name>प्रदीप पोवार.  Pradeep Powar</name><uri>http://www.blogger.com/profile/01020998895630109402</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='29' height='32' src='http://2.bp.blogspot.com/_pRRAIgRJVbE/S5tWHDvwC4I/AAAAAAAAAAs/rJKEo9FGmig/S220/Image013(1).jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3628797444622717843.post-8318012164074076192</id><published>2010-04-22T16:40:00.002+05:30</published><updated>2011-09-28T16:40:31.041+05:30</updated><title type='text'>६. सावधान धर्माचे राज्य येणार आहे! भाग-२</title><content type='html'>महोदय कौलिन विल्यम्स यानी आपल्या ’दी आउटसायडर’ या आपल्या विचारग्रंथात उधृत केले आहे की प्रत्तेक मानसाच्या आत एक माकड लपलेले आहे. हे माकड नेहमी अत्रुप्त असते आणि आपल्या नैसर्गीक इच्छा पूर्ण करण्यात मग्न असते. मला वाटते की हे माकड म्हणजे मानव आणि प्राणी यांच्यातील नातेसंबंधाचा पुरावाच आहे. माणसाने वरून कितीही नैतिकतेचा, धार्मीकतेचा किंवा मानवतेचा मुखवटा धारण केला असला तरी हे माकड आतमध्ये आपल्या माकडचेष्टा करीतच असते.&lt;br /&gt;आपल्या आत असणारे हे माकड म्हणजे प्राणी जीवनाचा प्रतिनिधी आहे.&lt;br /&gt;प्राण्यांना फक्त एकच कायदा समजतो, तो म्हणजे जंगलचा कायदा.&lt;br /&gt;आपल्या आत असणारे हे माकड म्हणजे या जंगलच्या कायद्याचा प्रतिनिधी आहे.&lt;br /&gt;जंगलात सर्वकालीन सर्व स्तरावर मानला जाणारा हा जंगलचा कायदा एका म्हणीवर आधारलेला आहे - बळी तो कान पिळी किंवा जिसकी लाठी उसकी भैंस - ताकतवरही हमेशा जितता है!&lt;br /&gt;या प्राण्यांनी आपले कायदे अगदी सुटसुटीत बनव
