एखाद्या वेळेस कांही श्रोत्यांसमोर आपल्याला व्याख्यान देण्याची वेळ आली तर आपण काही गोष्टी लक्ष्यात ठेवायला हव्यात. उदा. १) जेवढे लोक जास्त जेवढी श्रोत्यांची संख्या जास्त तेवढ्या कमी प्रमाणात आपण बुध्दीला ताण देणार्या गोष्टी केल्या पाहीजेत. हे प्रमाण तसे व्यस्तच म्हणावे लागेल कारण जमावाला मेंदू नसतो (पण हात असतात.) जमाव मोठा असेल तर हलक्याफुलक्या विषयावर बोलले पाहीजे. आपण एक हजार लोकांसमोर जर फ्राइडच्या सायकोअनालेसीसवर चर्चा करू लागलात तर १) हळूहळू सर्वसभाग्रह रिकामे होईल. २) लोक लवकरच टाळ्या वाजवू लागतील व आपल्याला व्याख्यान आवरते घ्यावे लागेल. ३) तिसरा पर्याय कोणाच्याही वाट्याला न आलेला बरा. तर सांगन्याचा मुद्दा असा की लोक जास्त तर त्यांच्या मेंदूच्या प्रमाणातच विषयविस्तार हवा. उगाच फापटपसारासुध्दा काही उपयोगी नाही.
२) जमाव मोठा असेल तर असा विषय निवडावा की त्यामूळे काहीतरी क्रियेटीव्ह फोर्स निर्माण होइल ज्याद्वारे काही तरी चांगले काम मार्गी लागेल. उदा. प्रदुषण, विजेचा वापर, उर्जेचा वापर, निसर्गाची संगत, मतदान, इ.इ.
३) विषय निवडताना असा विषयसुध्दा निवडता येइल जो रोजच्या जीवनात सर्वांना येणारा अनुभव असेल पण ज्याविषयी कोणी आजपर्यंत गांभिर्याने विचार केला नसेल. त्या विषयावरील विवेचनामूळे लोकांची विचार करण्याची दिशा बदलून जाइल. उदा. थूंकणे, हास्य, इंतजार, अहंकार, आदर, राग, व्यवसाय, बचत, छंद, इ. इ.
४) आणखी एक छोटीपण महत्वाची गोष्ट आपण ज्या श्रोत्यांसमोर व्याख्यान देत आहात त्यांच्याविषयी आपल्या मनात आदर ठेवा. कारण जरी श्रोत्यांच्यामध्ये बसलेले असले तरीही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असे कितीतरी विद्वान तेथे उपस्थीत असतील.
अगदी आपण एखाद्या शाळेच्या कार्यक्रमात देखील बोलत असलात तरी हे लक्षात ठेवा की हिच लहान मुले पुढे जाउन खुप प्रगल्भ होणार आहेत, विचारांनी आणि अनुभवांनीसुध्दा. अशी मुले आपले व्याख्यान लक्षात ठेवतात. तेव्हा वयाने लहान असोत की मोठे सर्वच श्रोत्यांचा आदर करा व वडिलकीच्या नात्याने बोलण्यापेक्षा मित्रत्वाच्या नात्याने बोला.
तुमचे विचार सांगू नका ते लादल्यासारखे होइल त्यापेक्षा तुमच्यासोबत त्यांना विचार करायला लावा. त्यांना निर्णयात सामिल करून घ्या. तुमचा निर्णय लादू नका. लोक टाळ्या वाजवून निघून जातात पण ऐकलेले काही आचरणात आणत नाहीत असे होता कामा नये. लोकांना आपण मांडलेल्या विषयावर निर्णय घेण्यास भाग पाडा. त्यांनी स्वत: घेतलेल्या निर्णयावरच लोक अम्मल करतात. तुमचा निर्णय काही अंतिम नाही. लोक आपला निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेत. आपण फक्त प्रयत्न करावा की खुपसारे प्रश्न आहेत ज्यावर विचारपूर्वक निर्णय झालेला नाही, त्यावर विचार करायला लावा निर्णय घ्यायला लावा. शतकानुशतके लोक दुसर्याच्या विचाराने दुसर्याच्या निर्णयावर अमल करत आहेत. कोणीतरी खुप वर्षापूर्वी निर्णय घेतले आहेत त्यांचे आता नुतनीकरण झाले पाहीजे.
No comments:
Post a Comment
प्रतिक्रिया