Saturday, September 11, 2010

२३. दु:खाची परी

झेपेले इतकंच दु:ख तो आपल्याला देतो,
दिलेले द:ख संपले की आपल्यालाच नेतो...
असं कवी चंद्रशेखर गोखले आपल्या चारोळीत लिहितात ते खरेच आहे. आयुष्य म्हणजे सुख आणि दु:खाची एकसलग अशी साखळी. दिवस आणि रात्रीसारखी एकामागोमाग एक जोडलेली.
इथे प्रत्तेकाला सुख-दु:ख नेमून दिलेले आहे. आपण आपल्याला नेमून दिलेल्या सुखापेक्षा दु:खावरच जास्त खुष असतो. पहा ना, आपण प्रत्तेकाला आपले दु:ख अगदी उलघडून उलघडून दाखवितो. अगदी परक्या माणसासमोर सुध्दा आपण आपले दुख: व्यक्त करतो, पण आनंद व्यक्त करायला मात्र आपल्याला फक्त आपली जवळचीच माणसं लागतात.
याचे कारण कदाचीत वपू म्हणतात तसे असेल. वपू म्हणतात सुखाची परी जरी सर्वांसाठी सारखीच असली तरी दुखाची परी (?) प्रत्तेकासाठी वेगवेगळेच रूप घेऊन येते. त्यामुळेच कदाचीत प्रत्तेकजन आपल्याला भेटलेल्या दु:खाच्या परीचे वर्णन एकमेकाजवळ करीत असेल.
अश्याप्रकारे सर्वांना वाटल्यामूळे दु:ख कमी होते असेही नाही. खरंतर प्रत्तेकाने आपल्यावाट्याचे दु:ख भोगूनच पार केले पाहीजे. आणि जो भोगतो तो बोलत नाही.
परंतू सर्वच दु:खं भोगून पार करता येण्यासारखी नसतात. काही दु:खांना आदि- अंतच नसतो. काही दु:खांना ना रंग-रुप असते ना आकार. अशी दु:खं भोगून पार करता येत नाहीत. मग अशी दु:खं आयुष्यभर साथ करतात.अगदी अश्वथाम्याच्या जखमेसारखे. जन्मभर जखम भरत तर नाही आणि चिरंजीवीत्वाचा वर पण आहे.
अशी दु:खे सोसणारी मानसं आपल्या भोवती सुध्दा असतील पण त्यांचे दु:ख आपल्याला दिसत नाही आणी ते आपल्याला जाणवू देत नाहीत. ते शब्दात प्रकट करण्यासारखे नसतेच. कधी कधी ते फक्त जाणवते पण दिसत मात्र नाही.
अशी दुखं भोगणारी माणसं बाहेरुन जरी आनंदी दिसत असली तरी आतून अनंत दु:खाने होरफळत असतात. सुर्य नाही का बाहेरून प्रकाशाचा तेज:पूंज दिसतो पण त्यासाठी त्याला स्वत:च्या अस्तित्वाचा कण-कण जाळून घ्यावा लागतो.

2 comments:

  1. लेख छान आहे. परंतु एक सुचवावंसं वाटतं की जरासं शुद्ध्लेखनाकडे लक्ष द्यायला हवं. आणि वरील चारोळी "चंद्रशेखर धर्माधिकारी" यांची नसून "चंद्रशेखर गोखले" यांची आहे!

    ReplyDelete

प्रतिक्रिया